सुनील दत्त निर्मित आणि मोनी भट्टाचारजी दिग्दर्शित ‘मुझे जीने दो’ (१९६३) हा सिनेमा दरोडेखोरांची कथा सांगतो. ठाकूर जर्नेलसिंह (सुनील दत्त) हा चंबळच्या खोऱ्यातला कुप्रसिद्ध दरोडेखोर. एका रात्री एका लग्न समारंभात नाच करणारी चमेली (वहिदा रहमान) ही वारांगना त्याला दिसते. ते एकमेकांकडे आकर्षिले जाऊन त्या ठिकाणाहून पळ काढतात. कालांतरानं त्यांना मुलगा होतो; पण हे प्रेमाचे दिवस फार काळ टिकत नाहीत; कारण जर्नेलसिंह पोलिसांकरवी पकडला जाण्याची परिस्थिती येऊन ठेपते.
आपलं काय होणार याची त्याला पूर्ण कल्पना असल्यानं तो चमेलीला मुलाच्या संगोपनासाठी दुसऱ्या गावात जायला सांगतो. पुन्हा दुर्दैव आड येतं. नेमकी ती ज्या खेड्यात जाते तेथील लोकांचं जर्नेलशी जुनं वैर असतं. त्याचा बदला घेण्यासाठी ते असहाय्य चमेली आणि तिच्या मुलावर हल्ला करतात; पण पोलिस वेळीच येऊन त्यांना वाचवतात.
या सिनेमातलं तेरे बचपन को जवानी की दुआं हे एक अत्यंत अर्थपूर्ण शीर्षकगीत मला फार प्रिय आहे.आपल्या मुलाच्या अधांतरी भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करतानाच त्याला आपल्यासारखं हेटाळणीचं जीवन जगायला लागू नये, म्हणून तळमळणाऱ्या मातेचं मनोगत गीतकार साहिर लुधियानवी यांनी ज्या शब्दांत मांडलं आहे, त्याला तोड नाही. संगीतकार जयदेव यांची चाल मनाला भिडते आणि लताजींनी ते आपल्या स्वरांनी अत्यंत परिणामकारक केलं आहे.
तेरे बचपन को जवानी की दुआं देती हूं
और दुआं देके परेशान सी हो जाती हूं
मेरे मुन्ने मेरे गुलजार के नन्हे पौधे
तुझको हालात की आंधी से बचाने के लिए
आज मैं प्यार के आंचल में छुपा लेती हूं
कल ये कमजोर सहारा भी ना हासिल होगा
कल तुझे काटों भरी राह पे चलना होगा
जिंदगानी की कडी धूप में जलना होगा
तुझ्या बालपणाला तारुण्याचा आशीर्वाद तर देतेय; पण तो दिल्यानंतर मन बेचैनही होतंय. माझ्या बाळा, माझ्या जीवनरूपी बगीच्यातलं तू इवलंसं रोप आहेस. तुझा परिस्थितीच्या वादळातून बचाव करण्यासाठी आज मी तुला माझ्या मायेच्या पदराआड लपवतेय खरी; पण उद्या हा कमकुवत आधारही तुला मिळणार नाही. उद्या तुला काट्याकुट्यातून मार्गक्रमण करायचं आहे. जीवनातल्या कडक उन्हात स्वत:ला पोळून घ्यायचं आहे, असं हे गाणं सांगतं. यापुढचं कडवंही असंच ममत्त्वानं भारलेलं असतं. प्रत्येक ओळीतला भाव आपल्या डोळ्यांत पाणी आणतो.
आपलं काय होणार याची त्याला पूर्ण कल्पना असल्यानं तो चमेलीला मुलाच्या संगोपनासाठी दुसऱ्या गावात जायला सांगतो. पुन्हा दुर्दैव आड येतं. नेमकी ती ज्या खेड्यात जाते तेथील लोकांचं जर्नेलशी जुनं वैर असतं. त्याचा बदला घेण्यासाठी ते असहाय्य चमेली आणि तिच्या मुलावर हल्ला करतात; पण पोलिस वेळीच येऊन त्यांना वाचवतात.
या सिनेमातलं तेरे बचपन को जवानी की दुआं हे एक अत्यंत अर्थपूर्ण शीर्षकगीत मला फार प्रिय आहे.आपल्या मुलाच्या अधांतरी भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करतानाच त्याला आपल्यासारखं हेटाळणीचं जीवन जगायला लागू नये, म्हणून तळमळणाऱ्या मातेचं मनोगत गीतकार साहिर लुधियानवी यांनी ज्या शब्दांत मांडलं आहे, त्याला तोड नाही. संगीतकार जयदेव यांची चाल मनाला भिडते आणि लताजींनी ते आपल्या स्वरांनी अत्यंत परिणामकारक केलं आहे.
तेरे बचपन को जवानी की दुआं देती हूं
और दुआं देके परेशान सी हो जाती हूं
मेरे मुन्ने मेरे गुलजार के नन्हे पौधे
तुझको हालात की आंधी से बचाने के लिए
आज मैं प्यार के आंचल में छुपा लेती हूं
कल ये कमजोर सहारा भी ना हासिल होगा
कल तुझे काटों भरी राह पे चलना होगा
जिंदगानी की कडी धूप में जलना होगा
तुझ्या बालपणाला तारुण्याचा आशीर्वाद तर देतेय; पण तो दिल्यानंतर मन बेचैनही होतंय. माझ्या बाळा, माझ्या जीवनरूपी बगीच्यातलं तू इवलंसं रोप आहेस. तुझा परिस्थितीच्या वादळातून बचाव करण्यासाठी आज मी तुला माझ्या मायेच्या पदराआड लपवतेय खरी; पण उद्या हा कमकुवत आधारही तुला मिळणार नाही. उद्या तुला काट्याकुट्यातून मार्गक्रमण करायचं आहे. जीवनातल्या कडक उन्हात स्वत:ला पोळून घ्यायचं आहे, असं हे गाणं सांगतं. यापुढचं कडवंही असंच ममत्त्वानं भारलेलं असतं. प्रत्येक ओळीतला भाव आपल्या डोळ्यांत पाणी आणतो.