मन सुद्ध तुझं...
'कुंकु' या चित्रपटातील 'मन सुद्ध तुझं' हे गाणं मला खूप आवडतं. हा चित्रपट १९३७ साली प्रदर्शित झाला. व्ही.शांताराम, राजाराम वानकुन्द्रे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून कथालेखन नारायण हरी आपटे आणि संवादलेखन मुंशी अझीझ यांनी केलं आहे. या चित्रपटाचं संपूर्ण कथन पूर्वीच्या काळात भारतीय स्त्रीवर्ग समाजाला कशी वागणूक देत होते यावर आहे.
Maharashtra Times 19 Dec 2016, 12:53 am
आकांक्षा तोंडवळकर, बोरिवली
'कुंकु' या चित्रपटातील 'मन सुद्ध तुझं' हे गाणं मला खूप आवडतं. हा चित्रपट १९३७ साली प्रदर्शित झाला. व्ही.शांताराम, राजाराम वानकुन्द्रे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून कथालेखन नारायण हरी आपटे आणि संवादलेखन मुंशी अझीझ यांनी केलं आहे. या चित्रपटाचं संपूर्ण कथन पूर्वीच्या काळात भारतीय स्त्रीवर्ग समाजाला कशी वागणूक देत होते यावर आहे.
मन सुद्ध तुझं गोस्त
हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या
भीती कशाची
पर्वा बी कुनाची...
झेंडा भल्या कामाचा
जो घेउनि निघाला
काटंकुटं वाटमंदी
बोचति त्येला
रगत निगंल तरी बि
हसल शाबास त्येची...
जो वळखितसे औक्ष
म्हंजी मोटी लडाई
अन् हत्याराचं फुलावानी
घाव बि खाई
गळ्यामंदी पडंल
त्येच्या माळ इजयाचि...
हे गाणं मास्टर परशूराम यांनी गायलेलं असून गाण्यातील शब्द आहेत शांताराम आठवले यांचे. या चित्रपटाला केशवराव भोळे यांचं संगीत लाभलेलं आहे. या चित्रपटातून शांता आपटे, केशवराव दाते यांच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या गाण्याचा अर्थ खूपच सुंदर आहे. हे गाणं ऐकलं की, जोमाने सर्व कठीण कामं मी योग्यरित्या पार पाडते. माझं मन प्रसन्न होतं आणि कोणतंही काम करायला मला नवा उत्साह येतो. निरुत्साही माणसाला आयुष्यात मार्गदर्शन करण्यासाठी हे गाणं अगदी सकारात्मक आहे. ज्याचं मन शुद्ध आहे, त्याच्या गळ्यात विजयाची माळ नक्कीच पडेल असं थोडक्यात या गाण्याचं वर्णन केलं आहे. मला गायनाची प्रचंड आवड असल्यामुळे मी हे गाणं रोज गाते.
'कुंकु' या चित्रपटातील 'मन सुद्ध तुझं' हे गाणं मला खूप आवडतं. हा चित्रपट १९३७ साली प्रदर्शित झाला. व्ही.शांताराम, राजाराम वानकुन्द्रे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून कथालेखन नारायण हरी आपटे आणि संवादलेखन मुंशी अझीझ यांनी केलं आहे. या चित्रपटाचं संपूर्ण कथन पूर्वीच्या काळात भारतीय स्त्रीवर्ग समाजाला कशी वागणूक देत होते यावर आहे.
मन सुद्ध तुझं गोस्त
हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या
भीती कशाची
पर्वा बी कुनाची...
झेंडा भल्या कामाचा
जो घेउनि निघाला
काटंकुटं वाटमंदी
बोचति त्येला
रगत निगंल तरी बि
हसल शाबास त्येची...
जो वळखितसे औक्ष
म्हंजी मोटी लडाई
अन् हत्याराचं फुलावानी
घाव बि खाई
गळ्यामंदी पडंल
त्येच्या माळ इजयाचि...
हे गाणं मास्टर परशूराम यांनी गायलेलं असून गाण्यातील शब्द आहेत शांताराम आठवले यांचे. या चित्रपटाला केशवराव भोळे यांचं संगीत लाभलेलं आहे. या चित्रपटातून शांता आपटे, केशवराव दाते यांच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या गाण्याचा अर्थ खूपच सुंदर आहे. हे गाणं ऐकलं की, जोमाने सर्व कठीण कामं मी योग्यरित्या पार पाडते. माझं मन प्रसन्न होतं आणि कोणतंही काम करायला मला नवा उत्साह येतो. निरुत्साही माणसाला आयुष्यात मार्गदर्शन करण्यासाठी हे गाणं अगदी सकारात्मक आहे. ज्याचं मन शुद्ध आहे, त्याच्या गळ्यात विजयाची माळ नक्कीच पडेल असं थोडक्यात या गाण्याचं वर्णन केलं आहे. मला गायनाची प्रचंड आवड असल्यामुळे मी हे गाणं रोज गाते.