अ‍ॅपशहर

जीना यहाँ मरना यहाँ

स्वत: दु:खी न राहता रंगमंचावर जोकरची भूमिका करत इतरांना हसवत आनंदी राहतो, अशी याची कहाणी आहे. याचवेळी रंगमंचावर हे गाणं जन्म घेतं.

Maharashtra Times 17 May 2017, 3:00 am
एका आगळ्यावेगळ्या आशयाचं कथानक राजकपूरच्या ‘मेरा नाम जोकर’च्या निर्मितीमधून पडद्यावर साकार झालं होतं. सर्कसमधील कलाकाराच्या जीवनावर आधारित असा हा सिनेमा होता. मी अनेकदा पाहिला तो राजकपूरचा अभिनय पाहण्यासाठी. सुंदर अशा कल्पनेतून. सिनेमात जोकरची भूमिका नावीन्यात होती; परंतु जनसमुदायाच्या पसंतीला तो उतरला नाही. जीवनात आलेल्या तीनही प्रेयसी विवाहबद्ध होऊन इतरांबरोबर जातात आणि स्वत: दु:खी न राहता रंगमंचावर जोकरची भूमिका करत इतरांना हसवत आनंदी राहतो, अशी याची कहाणी आहे. याचवेळी रंगमंचावर हे गाणं जन्म घेतं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rajkapoor mera naam jokar jeena yaha marana yaha
जीना यहाँ मरना यहाँ

जीना यहाँ मरना यहाँ
इसके सिवा जाना कहाँ
जी चाहे जब हम को आवाज दो
हम हैं वहीं हम थे जहाँ
अपने यहीं दोनो जहाँ
इसके सिवा जाना कहाँ
आता इथंच जगायचं आणि इथंच मरायचं. हा खेळ सोडून कुठं जाणार? जेव्हा वाटेल तेव्हा बोलवा. आम्ही जिथं होतो तिथंच आहोत. अशा आशयाचं खूपच सुंदर असं हे गाणं आहे. पुढं राजकपूर सांगतो, की...
ये मेरा गीत जीवनसंगीत
कल भी कोई दोहराएगा
जग को हँसाने बहरूपिया
रूप बदल फिर आएगा
स्वर्ग यहीं, नर्क यहाँ
इसके सिवा जाना कहाँ
हे माझं जीवनगीत उद्या नक्की कुणी गात राहील. अशावेळी हा जोकर पुन्हा जगाला हसवण्यासाठी नव्या रूपात तुमच्यासमोर हजर राहील.
कल खेल में हम हो ना हो
गर्दिश में तारे रहेंगे सदा
भुलोगे तुम भूलेंगे वो
पर हम तुम्हारे रहेंगे सदा
रहेंगे यहीं अपने निशान
इसके सिवा जाना कहाँ
उद्या मी या खेळात असेन किंवा नसेनही. आकाशात मात्र तारे सदैव असतील. तुम्ही विसराल ते विसरतील; परंतु मी मात्र तुमचाच राहीन. आपल्या आठवणी राहतील. या सिनेमात राजेंद्रकुमार, मनोजकुमार, धर्मेंद्र, दारासिंग, सिमी गरेवाल, पद्मिनी आणि ऋषी कपूर यांच्या भूमिका उत्तमच होत्या; परंतु इतका मोठा कलाकार असून या सिनेमाला म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. तरीही गीतरचनाकार शैलेंद्र यांनी नेहमीप्रमाणे हृदयाला हेलावणारी बहारदार गाणी या सिनेमात दिली आहेत.
या बाबतीत एकदा स्वत: जयकिशन यांनी शैलेंद्रला गाण्याच्या तालमीच्या वेळी ‘तुला अशी हृदयाला हेलावणारी गाणी सुचतात तरी कशी?’ असं विचारलं होतं. त्या वेळी शैलेंद्र यांनी उत्तर दिलं होतं, की अनुभव, गरिबी, भूक आणि आलेली संकटं हे माणसाच्या जीवनावर प्रभावित होत असतात आणि यातूनच सरस्वतीचं अवतीर्ण होतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज