स्नेहाश्री म्हात्रे
हिंदी चित्रपटसृष्टीतील नव्वदच्या दशकातील सौंदर्यवती म्हणजे आपली मराठमोळी माधुरी दीक्षित. तिने आपल्या अदाकारीने सिनेरसिकांच्या मनावर मोहीनी घातली. साधारण १९८८मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तेजाब' या चित्रपटाच्या प्रचंड यशामुळे ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. त्यानंतर साजन, खलनायक, दिल, रामलखन, प्रेमदिवाने, संगीत इत्यादी चित्रपटातील तिचं सौंदर्य, दिलखेचक नृत्य आणि उत्तम अभिनय खुलत गेलं. ती सर्वांची आवडती झाली. पण मला तिचा प्रथम पदार्पणातील 'अबोध' हा चित्रपट विशेष उल्लेखनीय वाटतो. राजश्री प्रोडक्शनचा आणि १९८४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात तिने अल्लड, नादान अशी गौरी नावाची नववधू साकारली आहे. अबोध म्हणजे निरागस. शीर्षकाप्रमाणेच तिचा यात निरागस अभिनय आहे. यातलं एक गीत माझं मनातलं
गाणं आहे.
घिर आए मेघ परबत पे
बिजूरीया चमके
हो गई दिन में रात
सून मेरे मीत
फिर तेरी याद
आए थमथमके
नैनों से हो बरसात
होने लगी बूंदा बांदी
प्यासी धरती की
प्यास बुझाने को
तुने तो पत्तीया
भी ना दी
मेरी रोती रही आस
तोहे बुलाने को
नादां थी मैं तब
तो समझी हू अब तो
मैंने ही समझी न बात
सुन मेरे मीत
फिर तेरी याद
आए थमथमके
प्राणो से प्राण जुडाए
कोई सुध ना रही
मोहे तनमन की
जाकर देस पराए
तू तो भूल गया
गली बिरहन की
ऐसे तोहे जाना था
मैंने तब जाना था
ओहो धोखा हुआ
मेरे साथ
ही मूळ कथा महान लेखक रविंद्रनाथ टागोर यांची आहे. याच कथेवर आधारीत १९७१ या वर्षी 'उपहार' नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात गौरीची ही बालीश भूमिका अभिनेत्री जया भादुरी यांनी साकारली होती. 'अबोध' हा याच चित्रपटाचा रिमेक आहे. नवोदित कलाकार तपस पाल याने अबोधमध्ये शंकरची भूमिका साकारली आहे. तसंच यात अशोक सराफ यांचीसुद्धा विनोदी भूमिका आहे. या गाण्याला स्वरसाज दिला आहे गायिका हेमलता हिने, जो माधुरीला अगदी साजेसा आहे. शब्द आणि संगीत उत्कृष्ट संगीतकार रवींद्रजी जैन यांचे
आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीतील नव्वदच्या दशकातील सौंदर्यवती म्हणजे आपली मराठमोळी माधुरी दीक्षित. तिने आपल्या अदाकारीने सिनेरसिकांच्या मनावर मोहीनी घातली. साधारण १९८८मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तेजाब' या चित्रपटाच्या प्रचंड यशामुळे ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. त्यानंतर साजन, खलनायक, दिल, रामलखन, प्रेमदिवाने, संगीत इत्यादी चित्रपटातील तिचं सौंदर्य, दिलखेचक नृत्य आणि उत्तम अभिनय खुलत गेलं. ती सर्वांची आवडती झाली. पण मला तिचा प्रथम पदार्पणातील 'अबोध' हा चित्रपट विशेष उल्लेखनीय वाटतो. राजश्री प्रोडक्शनचा आणि १९८४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात तिने अल्लड, नादान अशी गौरी नावाची नववधू साकारली आहे. अबोध म्हणजे निरागस. शीर्षकाप्रमाणेच तिचा यात निरागस अभिनय आहे. यातलं एक गीत माझं मनातलं
गाणं आहे.
घिर आए मेघ परबत पे
बिजूरीया चमके
हो गई दिन में रात
सून मेरे मीत
फिर तेरी याद
आए थमथमके
नैनों से हो बरसात
होने लगी बूंदा बांदी
प्यासी धरती की
प्यास बुझाने को
तुने तो पत्तीया
भी ना दी
मेरी रोती रही आस
तोहे बुलाने को
नादां थी मैं तब
तो समझी हू अब तो
मैंने ही समझी न बात
सुन मेरे मीत
फिर तेरी याद
आए थमथमके
प्राणो से प्राण जुडाए
कोई सुध ना रही
मोहे तनमन की
जाकर देस पराए
तू तो भूल गया
गली बिरहन की
ऐसे तोहे जाना था
मैंने तब जाना था
ओहो धोखा हुआ
मेरे साथ
ही मूळ कथा महान लेखक रविंद्रनाथ टागोर यांची आहे. याच कथेवर आधारीत १९७१ या वर्षी 'उपहार' नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात गौरीची ही बालीश भूमिका अभिनेत्री जया भादुरी यांनी साकारली होती. 'अबोध' हा याच चित्रपटाचा रिमेक आहे. नवोदित कलाकार तपस पाल याने अबोधमध्ये शंकरची भूमिका साकारली आहे. तसंच यात अशोक सराफ यांचीसुद्धा विनोदी भूमिका आहे. या गाण्याला स्वरसाज दिला आहे गायिका हेमलता हिने, जो माधुरीला अगदी साजेसा आहे. शब्द आणि संगीत उत्कृष्ट संगीतकार रवींद्रजी जैन यांचे
आहेत.