अ‍ॅपशहर

ये शाम मस्तानी...

सुंदर शब्द, सुरेल आवाज आणि सुरेख ताल यांचा उत्कृष्ट ताळमेळ म्हणजे हे गाणं. या गाण्याला गायलं आहे मधूर सुरावटींचा बादशाह म्हणजेच किशोर कुमार यांनी. किशोरदांचा आवाज म्हणजे निर्मळ झरा! त्यांनी खूप दर्जेदार गाणी गायली.

Maharashtra Times 15 Nov 2016, 12:07 am
नवीन मोरे, रायगड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम song speaks his mind
ये शाम मस्तानी...


ये शाम मस्तानी,

मदहोश किये जाये

मुझे डोर कोई खींचे,

तेरी ओर लिये जाये

सुंदर शब्द, सुरेल आवाज आणि सुरेख ताल यांचा उत्कृष्ट ताळमेळ म्हणजे हे गाणं. या गाण्याला गायलं आहे मधूर सुरावटींचा बादशाह म्हणजेच किशोर कुमार यांनी. किशोरदांचा आवाज म्हणजे निर्मळ झरा! त्यांनी खूप दर्जेदार गाणी गायली. हृदयस्पर्शी गाण्यात त्यांचा दर्दभरा आवाज हृदयाला भिडतो. कधी एखाद्या उडत्या चालीच्या गीतावर ठेका धरायला लावतो तर कधी त्यांची प्रेमगीते ओठांवर आपोआप रेंगाळू लागतात. किशोरदांचं गाणं ऐकायला वेळ-काळाचं बंधन नसतं. कधीही, कुठेही ऐकावी अशी अवीट गोडीची त्यांची गाणी असतात. सतत गुणगुणावं असं त्यांचं हे मनाला भावणारं गाणं माझं अत्यंत प्रिय गाणं आहे. या गाण्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे धुंद करणारी मंजूळ शीळ, जी गाण्याच्या सुरुवातीला आणि शेवटी ऐकू येते.

दूर रहती है तू,

मेरे पास आती नहीं

होठों पे तेरे,

कभी प्यास आती नहीं

ऐसा लगे, जैसे की तू,

हसके जहर कोई पिये जाये

शक्ती सामंता, राजेश खन्ना, राहुल देव बर्मन आणि किशोर कुमार या चार महारथींनी एकत्रितपणे अनेक सुपरहिट सिनेमे हिंदी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यांचाच ७१ सालचा 'कटीपतंग' हा अत्यंत गाजलेला चित्रपट होता. या चित्रपटाची मूळ कथा 'आय मॅरीड अ डेड मॅन' या इंग्रजी कादंबरीवर आधारीत असून हिंदीत ती गुलशन नंदा यांनी लिहिली आहे. त्यातीलच हे सुपरहिट गाणं. अभिनेत्री आशा पारेख आणि सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या कसदार अभिनयाने राहुल देव बर्मन यांच्या सुरेल संगीताने आणि किशोरदांच्या दिलखुलास स्वरांनी रसिकांची मनं जिंकली.

बात जब मैं करु,

मुझे रोक देती है क्यों

तेरी मीठी नजर,

मुझे टोक देती है क्यों

तेरी हया, तेरी शरम,

तेरी कसम मेरे होंठ सिये जाये

एक रुठी हुई,

तकदीर जैसे कोई

खामोश ऐसे है तू,

तस्वीर जैसे कोई

तेरी नजर, बनके जुबा,

लेकिन तेरे पैगाम दिये जाये

प्रेयसीबद्दलचं प्रेम प्रियकराच्या मनातून ओठांवर येऊ लागतं तेव्हा त्याच्या मनातल्या जाणीवा गाण्यातल्या शब्दाशब्दातून व्यक्त होतात. तो जितका तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, ती तितकीच त्याच्यापासून दूर जात असते. तिच्या लाजऱ्या नजरेला पाहून त्याचे ओठ मुके होऊन जातात. तिच्या चित्रमय लावण्यातल्या बोलक्या डोळ्यातून त्याला जणू काही एखादा प्रेमसंदेश मिळतोय. अशा अर्थाच्या या सुंदर कल्पना गीतकार आनंद बक्षी यांच्या लेखणीतून उतरल्या आहेत. या चित्रपटातील सर्व गाणी श्रवणीय आहेत. कित्येक वर्षं लोटूनही रसिकांच्या मनात आजही हे गाणं रुंजी घालतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज