राजेश चुरी, डहाणू
गेली दोनवर्षं गंभीरगडावर जायचं असं आम्ही ठरवत होतो. सगळं काही ठरतं. तारीख जवळ येते, तसे एक-एक सदस्य काहीना काही कारणावरून गळतात. मग आमचा प्लॅन रद्द होतो. आता गंभीरगडावर जाऊया का? असं विचारल्यावर कोणीच गंभीरपणे घेत नव्हतं! पण गंभीरगड आम्हाला खुणावत होता. डहाणूपासून ४४ किमी अंतरावर असलेला हा गड २२६० फूट उंच आहे. समीर, सलमान, मलकारी, निखिल, प्रसाद व मी अशा सहा जणांनी जायचा बेत आखला.
सोमवारी गंभीरगडावर चढाई करायचं ठरवलं. सकाळी लवकर आम्ही ठरल्याप्रमाणे निघालो. अर्ध्या तासाच्या अंतरावर एक उंच गड नजरेत आला. गाडी थांबवून चौकशी केली. आमचा अंदाज खरा ठरला. ज्याच्याकडे चौकशी केली त्यालाच आमच्यासोबत येण्याची विनंती केली. तो लगेचच तयार झाला. अशाप्रकारे आम्हाला वाटाड्या मिळाला. ढगाळ वातावरणा त्याच्या मागोमाग चढाई सुरु झाली. गप्पा, हास्यविनोद, भरपूर फोटो काढत आम्ही चढत होतो. उंच मोठाले दगड असलेले सुळके नजरेत आले. चढण्याचा मार्गही अडचणीचा होता. दोन तासांच्या चढाई नंतर आम्ही सुळक्याच्या जवळ पोहोचलो. खूप सुंदर नजारा डोळ्यात साठवून घेतला.
आता आम्हाला खुणावत होतं, आणखीन एक टोक! तिथंही जाण्याचा बेत पक्का झाला. एक तासाच्या चढाईनंतर आम्ही ते टोक गाठलं. भरपूर वारा आणि आजूबाजूच्या वातावरणाने मन प्रसन्न झालं. थोडावेळ थांबून उतरायचं ठरलं. चढाईचा मार्ग अवघड होता, म्हणून त्या वाट्याड्याच्या सांगण्यावरून दुसरा मार्ग निवडला. हा गड तसा दुर्लक्षित असल्याने फार कमी लोक या गडावर येतात. बाबू (वाटाड्या) पायवाट शोधत आम्हाला खाली उतरवत होता. थोड्या अंतरावर एकेठिकाणी डोंगराच्या कपारीत पाणी दिसलं. सर्व भरपूर पाणी प्यायले. एके ठिकाणी बाबूने आमच्यावर बॉम्ब टाकला, समोरच्या डोंगराकडे बोट दाखवून म्हणाला, 'आपल्याला हा डोंगर चढून पलीकडे जावं लागणार आहे'. पुन्हा चढाईचा विचार शक्य नव्हता. पण काय करणार दुसरा कोणताच मार्ग नसल्याने भर उन्हात बाबूच्या मागे जाणं भाग होतं. नव्या जोमाने आम्ही तो डोंगरपार केला. समोरचा रस्ता बघून सर्वांना हायसं वाटलं. इतकं थकल्यानंतरही मागे वळून पाहताना हा वेगळा वाटणारा गंभीरगड मनात घर करून बसला. बाबूचा निरोप घेऊन आम्ही घराकडे निघालो.
गेली दोनवर्षं गंभीरगडावर जायचं असं आम्ही ठरवत होतो. सगळं काही ठरतं. तारीख जवळ येते, तसे एक-एक सदस्य काहीना काही कारणावरून गळतात. मग आमचा प्लॅन रद्द होतो. आता गंभीरगडावर जाऊया का? असं विचारल्यावर कोणीच गंभीरपणे घेत नव्हतं! पण गंभीरगड आम्हाला खुणावत होता. डहाणूपासून ४४ किमी अंतरावर असलेला हा गड २२६० फूट उंच आहे. समीर, सलमान, मलकारी, निखिल, प्रसाद व मी अशा सहा जणांनी जायचा बेत आखला.
सोमवारी गंभीरगडावर चढाई करायचं ठरवलं. सकाळी लवकर आम्ही ठरल्याप्रमाणे निघालो. अर्ध्या तासाच्या अंतरावर एक उंच गड नजरेत आला. गाडी थांबवून चौकशी केली. आमचा अंदाज खरा ठरला. ज्याच्याकडे चौकशी केली त्यालाच आमच्यासोबत येण्याची विनंती केली. तो लगेचच तयार झाला. अशाप्रकारे आम्हाला वाटाड्या मिळाला. ढगाळ वातावरणा त्याच्या मागोमाग चढाई सुरु झाली. गप्पा, हास्यविनोद, भरपूर फोटो काढत आम्ही चढत होतो. उंच मोठाले दगड असलेले सुळके नजरेत आले. चढण्याचा मार्गही अडचणीचा होता. दोन तासांच्या चढाई नंतर आम्ही सुळक्याच्या जवळ पोहोचलो. खूप सुंदर नजारा डोळ्यात साठवून घेतला.
आता आम्हाला खुणावत होतं, आणखीन एक टोक! तिथंही जाण्याचा बेत पक्का झाला. एक तासाच्या चढाईनंतर आम्ही ते टोक गाठलं. भरपूर वारा आणि आजूबाजूच्या वातावरणाने मन प्रसन्न झालं. थोडावेळ थांबून उतरायचं ठरलं. चढाईचा मार्ग अवघड होता, म्हणून त्या वाट्याड्याच्या सांगण्यावरून दुसरा मार्ग निवडला. हा गड तसा दुर्लक्षित असल्याने फार कमी लोक या गडावर येतात. बाबू (वाटाड्या) पायवाट शोधत आम्हाला खाली उतरवत होता. थोड्या अंतरावर एकेठिकाणी डोंगराच्या कपारीत पाणी दिसलं. सर्व भरपूर पाणी प्यायले. एके ठिकाणी बाबूने आमच्यावर बॉम्ब टाकला, समोरच्या डोंगराकडे बोट दाखवून म्हणाला, 'आपल्याला हा डोंगर चढून पलीकडे जावं लागणार आहे'. पुन्हा चढाईचा विचार शक्य नव्हता. पण काय करणार दुसरा कोणताच मार्ग नसल्याने भर उन्हात बाबूच्या मागे जाणं भाग होतं. नव्या जोमाने आम्ही तो डोंगरपार केला. समोरचा रस्ता बघून सर्वांना हायसं वाटलं. इतकं थकल्यानंतरही मागे वळून पाहताना हा वेगळा वाटणारा गंभीरगड मनात घर करून बसला. बाबूचा निरोप घेऊन आम्ही घराकडे निघालो.