वीणा प्रभुदेसाई, ठाणे
बऱ्याच दिवसापासून मला व माझ्या यजमानांच्या चारधाम यात्रा करण्याचं मनात होतं. ही यात्रा खडतर असते, ढगफुटीचा धोका असतो, अशा प्रतिक्रिया ऐकल्या. पण आमचा निश्चय पक्का होता. थोडं दडपण होतं, पण सकारात्मक विचारांनी आम्ही यात्रेसाठी एका पर्यटन संस्थेत पैसे भरले. दिल्ली येथून हरिद्वार मार्गे यात्रा सुरु होत असल्याने प्रथम दिल्लीला टूर व्यवस्थापकांना भेटून हरिद्वारला जाण्यासाठी बसमध्ये बसलो. पुढे हरिद्वार ते सायनाचेट्टी असा जवळजवळ बारा तासांचा प्रवास करून रात्री आम्ही सायानाचेट्टी येथे पोहोचलो. हा पूर्ण प्रवास वळणावळणाचा घाटरस्ता होता. या पुढचा सर्व प्रवास हा असाच घाटाचा व धोकादायक असणार आहे, ही कल्पना आमच्या लीडरने दिली होती.
दुसऱ्या दिवशी जमुनोत्रीला जाण्यासाठी प्रथम जानकीचेट्टी येथे बसने गेलो. आमच्यापैकी बारा जणांनी घोडे ठरवले. पण आम्ही दोघांनी चालत जायचं ठरवलं होतं. सुदैवाने आणखी दोघांची साथ मिळाली. पूर्ण चढाचा रस्ता होता. पण आमचा निर्धार पक्का होता. हे अंतर मधला निसर्ग बघत, फोटो काढत आम्ही चार तासात पार पडले. सगळीकडे बर्फाच्छादित शिखरे, खाली दरी, जमुना नदी, धबधबे, हिरवे डोंगर असं ते विहंगम दृश्य होतं. तेथे यमुनोत्री उगम, यमुना नदीचे देऊळ होते व गरम पाण्याचे कुंड होतं. गरम कुंडात पाय धुवून दर्शन घेऊन आम्ही परतीच्या मार्गी लागलो. दुसऱ्या दिवशी गंगोत्रीला जाण्यासाठी उत्तरकाशी येथे पोहोचलो. संध्याकाळी पुरातन असे तेथले शंकराचे मंदिर व ५,००० वर्षं असलेला त्रिशूल बघितला. उत्तरकाशीला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी गंगोत्रीसाठी पाच वाजताच प्रवास सुरु केला. गंगा मंदिर व गंगादर्शन केलं. खळाळता प्रवाह पाहून मन तृप्त झालं. यानंतर केदारनाथला जाण्यासाठी रुद्रप्रयाग येथे निघालो. वाटेत सरस्वती, मंदाकिनी, अलकनंदा नद्यांचा संगम तसंच तेहरी धरण बाहेरून बघितलं. तिसऱ्या दिवशी १३,५०० फुटांवर असलेल्या केदारनाथला जाण्यासाठी बसने हेलिपॅडपर्यंत गेलो. हेलिकॉप्टरमधून जाण्याचा रोमांचकारी अनुभव घेतला. एकोणीस किलोमीटरचे अंतर फक्त पंधरा मिनिटांत पार करून आम्ही केदारनाथला पोहोचलो. देवळाच्या पाठी हिमशिखरे चमकत होती. विहंगम असं दृष्य होतं. नंतर दिवशी सकाळीच हवामान ठीक झाल्याने हेलिकॉप्टरनेच परत रुद्रप्रयाग येथे आलो. आता शेवटचं बद्रीनाथ करायचं होतं. त्यासाठी देवप्रयाग, कर्णप्रयाग, जोशीमठ, तपोभूमी असे पार करत बद्रीनाथ येथे आलो. मंदिरात यथासांग पूजा केली. नंतरच्या दिवशी पहाटेच निघालो व दिल्लीमार्गे ठाण्याला घरी परतलो.
बऱ्याच दिवसापासून मला व माझ्या यजमानांच्या चारधाम यात्रा करण्याचं मनात होतं. ही यात्रा खडतर असते, ढगफुटीचा धोका असतो, अशा प्रतिक्रिया ऐकल्या. पण आमचा निश्चय पक्का होता. थोडं दडपण होतं, पण सकारात्मक विचारांनी आम्ही यात्रेसाठी एका पर्यटन संस्थेत पैसे भरले. दिल्ली येथून हरिद्वार मार्गे यात्रा सुरु होत असल्याने प्रथम दिल्लीला टूर व्यवस्थापकांना भेटून हरिद्वारला जाण्यासाठी बसमध्ये बसलो. पुढे हरिद्वार ते सायनाचेट्टी असा जवळजवळ बारा तासांचा प्रवास करून रात्री आम्ही सायानाचेट्टी येथे पोहोचलो. हा पूर्ण प्रवास वळणावळणाचा घाटरस्ता होता. या पुढचा सर्व प्रवास हा असाच घाटाचा व धोकादायक असणार आहे, ही कल्पना आमच्या लीडरने दिली होती.
दुसऱ्या दिवशी जमुनोत्रीला जाण्यासाठी प्रथम जानकीचेट्टी येथे बसने गेलो. आमच्यापैकी बारा जणांनी घोडे ठरवले. पण आम्ही दोघांनी चालत जायचं ठरवलं होतं. सुदैवाने आणखी दोघांची साथ मिळाली. पूर्ण चढाचा रस्ता होता. पण आमचा निर्धार पक्का होता. हे अंतर मधला निसर्ग बघत, फोटो काढत आम्ही चार तासात पार पडले. सगळीकडे बर्फाच्छादित शिखरे, खाली दरी, जमुना नदी, धबधबे, हिरवे डोंगर असं ते विहंगम दृश्य होतं. तेथे यमुनोत्री उगम, यमुना नदीचे देऊळ होते व गरम पाण्याचे कुंड होतं. गरम कुंडात पाय धुवून दर्शन घेऊन आम्ही परतीच्या मार्गी लागलो. दुसऱ्या दिवशी गंगोत्रीला जाण्यासाठी उत्तरकाशी येथे पोहोचलो. संध्याकाळी पुरातन असे तेथले शंकराचे मंदिर व ५,००० वर्षं असलेला त्रिशूल बघितला. उत्तरकाशीला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी गंगोत्रीसाठी पाच वाजताच प्रवास सुरु केला. गंगा मंदिर व गंगादर्शन केलं. खळाळता प्रवाह पाहून मन तृप्त झालं. यानंतर केदारनाथला जाण्यासाठी रुद्रप्रयाग येथे निघालो. वाटेत सरस्वती, मंदाकिनी, अलकनंदा नद्यांचा संगम तसंच तेहरी धरण बाहेरून बघितलं. तिसऱ्या दिवशी १३,५०० फुटांवर असलेल्या केदारनाथला जाण्यासाठी बसने हेलिपॅडपर्यंत गेलो. हेलिकॉप्टरमधून जाण्याचा रोमांचकारी अनुभव घेतला. एकोणीस किलोमीटरचे अंतर फक्त पंधरा मिनिटांत पार करून आम्ही केदारनाथला पोहोचलो. देवळाच्या पाठी हिमशिखरे चमकत होती. विहंगम असं दृष्य होतं. नंतर दिवशी सकाळीच हवामान ठीक झाल्याने हेलिकॉप्टरनेच परत रुद्रप्रयाग येथे आलो. आता शेवटचं बद्रीनाथ करायचं होतं. त्यासाठी देवप्रयाग, कर्णप्रयाग, जोशीमठ, तपोभूमी असे पार करत बद्रीनाथ येथे आलो. मंदिरात यथासांग पूजा केली. नंतरच्या दिवशी पहाटेच निघालो व दिल्लीमार्गे ठाण्याला घरी परतलो.