नितीन हुले, ऐरोली
आम्ही कंपनीतील मित्र एकत्र बऱ्याच पिकनिकला जायचो. एकदा आपआपल्या कुटुंबासोबत लांबची टूर काढण्याची आम्हा मित्रांना कल्पना सुचली. घरची मंडळीही राजी झाली. काश्मिर वैष्णोदेवी हे ठिकाण पक्कं झालं. आमची टूर कटरावरून सुरु. रेल्वे बुकिंग करायचं होतं, तेव्हा आमचा मित्र हळदणकर याला एक कल्पना सुचली. परस्पर जम्मूला जाण्याऐवजी जाता-जाता अमृतसर, दिल्ली व आग्रा करण्याचं त्याने सुचवलं.
ठरल्याप्रमाणे आम्ही सगळे ट्रेनने निघालो. अमृतसरच्या सुवर्णमंदिरातील स्वच्छता व भव्यता, जालियनवाला बागेतील चाळण झालेली भिंत, आग्र्यातील ताजमहालचे स्वर्गीय सौंदर्य, दिल्लीतील उत्तुंग कुतुबमीनार, देखणा लाल किल्ला, अध्यात्म्याची अनुभूती देणारे लोटस टेम्पल, मनाला भुरळ घालणारे अक्षरधाम मंदिर, जगप्रसिद्ध चांदणी चौक ही सगळी ठिकाणं पाहून आम्ही तिसऱ्या दिवशी सकाळी जम्मूला व तेथून कटराला पोहोचलो.
दुसऱ्या दिवशी सगळे श्रीनगरला रवाना झालो. पुढे गुलमर्गला गेलो. तिथं ‘आप की कसम’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणं चित्रित झालेलं शिवमंदिर पाहिलं व रोपवेमधे बसून सर्वात उंच ठिकाणावर पोहोचलो. संध्याकाळी आमची राहण्याची व्यवस्था दल लेकमध्ये एका लाकडी हाऊसबोट मध्ये केली होती. आम्हा सर्व मित्रांना एकाच बोटीत रूम्स दिल्यामुळे आम्ही खूश झालो. तो अनुभव काही औरच होता. तेथील लोक आपआपले शिकारे घेऊन पाण्यातूनच विविध वस्तू विकायला येतात.
नंतर शिकाऱ्यातून दल लेकमध्ये जाताना म्हटलेली शम्मी कपूर स्टाइलमध्ये ‘कश्मिरकी कली’ची गाणी, रात्री जेवल्यावर हाऊसबोटवर सर्व मित्र व त्यांच्या कुटुंबाबरोबर मारलेल्या मनसोक्त गप्पा, दाल लेकच्या मधोमध असलेले चार चिनार, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सफरचंदाच्या बागा, झेलम नदीवर वसलेले सोनमर्ग, या सगळ्याचा अनुभव घेताना तीन दिवस गेले कसे हे कळलंच नाही. मग आम्ही पुन्हा कटराला आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे वैष्णोदेवीचा डोंगर पायी चढून दर्शन घेतलं. एक दिवस आराम करून परतीच्या प्रवासाला निघालो. या ट्रिपमुळे आम्हा मित्रांच्या कुटुंबांमधे घनिष्ट मैत्री झाली, ती अजूनही टिकून आहे. भविष्यात पुन्हा असा मित्रांबरोबर ट्रीपला जायचा योग येण्याची मी आतुरतेने वाट पाहतोय.
आम्ही कंपनीतील मित्र एकत्र बऱ्याच पिकनिकला जायचो. एकदा आपआपल्या कुटुंबासोबत लांबची टूर काढण्याची आम्हा मित्रांना कल्पना सुचली. घरची मंडळीही राजी झाली. काश्मिर वैष्णोदेवी हे ठिकाण पक्कं झालं. आमची टूर कटरावरून सुरु. रेल्वे बुकिंग करायचं होतं, तेव्हा आमचा मित्र हळदणकर याला एक कल्पना सुचली. परस्पर जम्मूला जाण्याऐवजी जाता-जाता अमृतसर, दिल्ली व आग्रा करण्याचं त्याने सुचवलं.
ठरल्याप्रमाणे आम्ही सगळे ट्रेनने निघालो. अमृतसरच्या सुवर्णमंदिरातील स्वच्छता व भव्यता, जालियनवाला बागेतील चाळण झालेली भिंत, आग्र्यातील ताजमहालचे स्वर्गीय सौंदर्य, दिल्लीतील उत्तुंग कुतुबमीनार, देखणा लाल किल्ला, अध्यात्म्याची अनुभूती देणारे लोटस टेम्पल, मनाला भुरळ घालणारे अक्षरधाम मंदिर, जगप्रसिद्ध चांदणी चौक ही सगळी ठिकाणं पाहून आम्ही तिसऱ्या दिवशी सकाळी जम्मूला व तेथून कटराला पोहोचलो.
दुसऱ्या दिवशी सगळे श्रीनगरला रवाना झालो. पुढे गुलमर्गला गेलो. तिथं ‘आप की कसम’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणं चित्रित झालेलं शिवमंदिर पाहिलं व रोपवेमधे बसून सर्वात उंच ठिकाणावर पोहोचलो. संध्याकाळी आमची राहण्याची व्यवस्था दल लेकमध्ये एका लाकडी हाऊसबोट मध्ये केली होती. आम्हा सर्व मित्रांना एकाच बोटीत रूम्स दिल्यामुळे आम्ही खूश झालो. तो अनुभव काही औरच होता. तेथील लोक आपआपले शिकारे घेऊन पाण्यातूनच विविध वस्तू विकायला येतात.
नंतर शिकाऱ्यातून दल लेकमध्ये जाताना म्हटलेली शम्मी कपूर स्टाइलमध्ये ‘कश्मिरकी कली’ची गाणी, रात्री जेवल्यावर हाऊसबोटवर सर्व मित्र व त्यांच्या कुटुंबाबरोबर मारलेल्या मनसोक्त गप्पा, दाल लेकच्या मधोमध असलेले चार चिनार, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सफरचंदाच्या बागा, झेलम नदीवर वसलेले सोनमर्ग, या सगळ्याचा अनुभव घेताना तीन दिवस गेले कसे हे कळलंच नाही. मग आम्ही पुन्हा कटराला आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे वैष्णोदेवीचा डोंगर पायी चढून दर्शन घेतलं. एक दिवस आराम करून परतीच्या प्रवासाला निघालो. या ट्रिपमुळे आम्हा मित्रांच्या कुटुंबांमधे घनिष्ट मैत्री झाली, ती अजूनही टिकून आहे. भविष्यात पुन्हा असा मित्रांबरोबर ट्रीपला जायचा योग येण्याची मी आतुरतेने वाट पाहतोय.