>> अजय घोलप, घाटकोपर
कोल्हापूरला मी यापूर्वीही भेट दिली होती,पण बालपणीचे मित्र आणि त्यांच्या कुटुंबासोबत कोल्हापूरला सहलीला जाण्याची मज्जाच और होती. सोमवारी २६ जानेवारीच्या लागून आलेल्या सुट्टीचं औचित्य साधून आम्ही सर्वांनी कोल्हापूर सहलीला जायचं ठरवलं. हॉटेल आणि बसचं बुकिंग झालं आणि आमची स्वारी शनिवारी रात्री कोल्हापूरवारी साठी निघाली. आम्ही सर्व मिळून २३जणं होतो. जेव्हा त्या रात्री प्रवासाला सुरुवात केली तेव्हा आमच्या ध्यानीमनीही नव्हतं की हा प्रवास एवढा साहसी होईल. प्रवास सुरू झाल्यानंतर अवघ्या १० मिनिटांतच आमची बस बंद पडली. यानंतर तीन वेळा बिघाड होऊन बस बंद पडली. थोडावेळ आम्ही दुसऱ्या बसने प्रवास केला. आम्ही एकमेकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत होतो. पण इच्छा असेल तर मार्ग सापडतोच. त्यामुळे इतकं होऊनही रात्री २.३०वाजता आम्ही मुंबईहून कोल्हापूरला निघालो. नियोजित वेळेपेक्षा ४ तास उशीरा पोहोचूनसुद्धा आमचा उत्साह कमी झाला नव्हता. प्रवासात इतकी रखडपट्टी होऊनही आमची धमालमस्ती चालूच होती. राहण्याची सोय पन्हाळगडावर केली होती. प्रवेश करताच समोर 'बाजीप्रभू देशपांडे' यांचा पुतळा दिसला. पहिल्या दिवशी आम्ही ज्योतिबा आणि महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. सगळा क्षीण निघून गेला. मग सगळ्या दोस्तांनी मिळून खूप गप्पा मारल्या, धमाल केली. दुसऱ्या दिवशी सकाळीच पन्हाळगड फिरायला गेलो. सोबत गाइड होतेच. त्यामुळे अतिशय छान माहिती मिळाली. एक एक प्रसंग ऐकताना आणि ती स्थळं पाहताना अंगावर शहारे येत होते. शेवटी महाराजांना आणि त्याच्या वीर मावळ्यांना स्मरून त्यांना एक मानाचा मुजरा करून आम्ही गडाचा निरोप घेतला. संध्याकाळी नरसोबाची वाडी इथे जाऊन दर्शन घेतलं आणि मुंबईच्या प्रवासाला सुरुवात केली. पुन्हा तितकीच मजामस्ती करत पहाटे मुंबईला परत आलो.
कोल्हापूरला मी यापूर्वीही भेट दिली होती,पण बालपणीचे मित्र आणि त्यांच्या कुटुंबासोबत कोल्हापूरला सहलीला जाण्याची मज्जाच और होती. सोमवारी २६ जानेवारीच्या लागून आलेल्या सुट्टीचं औचित्य साधून आम्ही सर्वांनी कोल्हापूर सहलीला जायचं ठरवलं. हॉटेल आणि बसचं बुकिंग झालं आणि आमची स्वारी शनिवारी रात्री कोल्हापूरवारी साठी निघाली. आम्ही सर्व मिळून २३जणं होतो. जेव्हा त्या रात्री प्रवासाला सुरुवात केली तेव्हा आमच्या ध्यानीमनीही नव्हतं की हा प्रवास एवढा साहसी होईल. प्रवास सुरू झाल्यानंतर अवघ्या १० मिनिटांतच आमची बस बंद पडली. यानंतर तीन वेळा बिघाड होऊन बस बंद पडली. थोडावेळ आम्ही दुसऱ्या बसने प्रवास केला. आम्ही एकमेकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत होतो. पण इच्छा असेल तर मार्ग सापडतोच. त्यामुळे इतकं होऊनही रात्री २.३०वाजता आम्ही मुंबईहून कोल्हापूरला निघालो. नियोजित वेळेपेक्षा ४ तास उशीरा पोहोचूनसुद्धा आमचा उत्साह कमी झाला नव्हता. प्रवासात इतकी रखडपट्टी होऊनही आमची धमालमस्ती चालूच होती. राहण्याची सोय पन्हाळगडावर केली होती. प्रवेश करताच समोर 'बाजीप्रभू देशपांडे' यांचा पुतळा दिसला. पहिल्या दिवशी आम्ही ज्योतिबा आणि महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. सगळा क्षीण निघून गेला. मग सगळ्या दोस्तांनी मिळून खूप गप्पा मारल्या, धमाल केली. दुसऱ्या दिवशी सकाळीच पन्हाळगड फिरायला गेलो. सोबत गाइड होतेच. त्यामुळे अतिशय छान माहिती मिळाली. एक एक प्रसंग ऐकताना आणि ती स्थळं पाहताना अंगावर शहारे येत होते. शेवटी महाराजांना आणि त्याच्या वीर मावळ्यांना स्मरून त्यांना एक मानाचा मुजरा करून आम्ही गडाचा निरोप घेतला. संध्याकाळी नरसोबाची वाडी इथे जाऊन दर्शन घेतलं आणि मुंबईच्या प्रवासाला सुरुवात केली. पुन्हा तितकीच मजामस्ती करत पहाटे मुंबईला परत आलो.