तिलोत्तमा लोखंडे
आपल्याला पावसाळ्यात जसं लोणावळा, महाबळेश्वर किंवा माळशेज घाटावर जायचे वेध लागतात तसंच दक्षिण भारतीयांना पोनमुडीला जायचं वेध लागतात. केरळला जाताना दरवेळी ठराविक ठिकाण बघण्यापेक्षा जरा हटके असलेले पोटमुडीला नक्की जावं. त्रीवेंद्रमच्या उत्तरेला ५५.२ किमीवर पश्चिम घाटावर हे ठिकाण आहे.
समुद्र सपाटीपेक्षा फक्त ११००मी उंचीवर म्हणजेच जवळ-जवळ पाचगणी, महाबळेश्वर इतक्या उंचीवर आहे. गाडीने चढ चढताना मात्र २२ वळणं असल्यामुळे दिवसा उजेडी जाणं जास्त मज्जेचं आहे. वाटेत तरूण-तरूणी मोटर सायकलवर बसून पावसाचा मनमुराद आनंद अनुभवताना दिसत होते.
निसर्गाचे विहंगम दर्शन घेत माथ्यावर पोहोचताच एकाच वेळी थंडी, वारा व पाऊस तर होताच पण ढगांनाही येण्याचा मोह आवरला नसावा. कारण पाच फुटांवरचंसुध्दा दिसत नव्हतं. एवढ्या ढगांच्या चादरीत आम्ही लपेटले गेलो होतो. ट्रेकिंग करायला जायला हे उत्कृष्ट ठिकाण आहे. ठिकठिकाणी चहाचे मळे दिसतातच, पण पावसाळ्यातल्या वेलींनी संपूर्ण दरी आच्छादून टाकलेलं दृश्य फक्त आणि फक्त पावसाळ्यातच पहायला मिळतं.
निसर्गाचं असं मनमोहक रूप बघून नक्कीच तरूणाई बरोबर आपलंही वय विसरून 'आज मै जवान हो गई हू, गुल से गुलीस्ता हो गई हू', असं प्रत्येकाला वाटेल हे मात्र नक्की! जेव्हा निसर्गानेच पुढाकार घेतलाच आहे मग आपण का मागे रहायचं? डोंगराच्या तळाशी दऱ्याखोऱ्यांमधून जी कल्लार नदी वाहताना दिसते तिथंही भरपूर लोक पिकनिकसाठी येतात. ही नदी सागरगोट्यांची असल्याचा भास होतो. तिथं घनदाट जंगल असल्यामुळे तेथील पेपरा वाइल्ड लाइफ सेंच्युरीला जाता येतं. तसंच धबधब्यांचा आनंद लुटता येतो. विविध प्रकारच्या पाना फुलांचा अभ्यास करता येतोच तसंच वेगवेगळ्या फुलपाखरांच्या जातीही बघायला मिळतात. केरळला जाणाऱ्यांनी हे सुंदर ठिकाण चुकवू नये.
आपल्याला पावसाळ्यात जसं लोणावळा, महाबळेश्वर किंवा माळशेज घाटावर जायचे वेध लागतात तसंच दक्षिण भारतीयांना पोनमुडीला जायचं वेध लागतात. केरळला जाताना दरवेळी ठराविक ठिकाण बघण्यापेक्षा जरा हटके असलेले पोटमुडीला नक्की जावं. त्रीवेंद्रमच्या उत्तरेला ५५.२ किमीवर पश्चिम घाटावर हे ठिकाण आहे.
समुद्र सपाटीपेक्षा फक्त ११००मी उंचीवर म्हणजेच जवळ-जवळ पाचगणी, महाबळेश्वर इतक्या उंचीवर आहे. गाडीने चढ चढताना मात्र २२ वळणं असल्यामुळे दिवसा उजेडी जाणं जास्त मज्जेचं आहे. वाटेत तरूण-तरूणी मोटर सायकलवर बसून पावसाचा मनमुराद आनंद अनुभवताना दिसत होते.
निसर्गाचे विहंगम दर्शन घेत माथ्यावर पोहोचताच एकाच वेळी थंडी, वारा व पाऊस तर होताच पण ढगांनाही येण्याचा मोह आवरला नसावा. कारण पाच फुटांवरचंसुध्दा दिसत नव्हतं. एवढ्या ढगांच्या चादरीत आम्ही लपेटले गेलो होतो. ट्रेकिंग करायला जायला हे उत्कृष्ट ठिकाण आहे. ठिकठिकाणी चहाचे मळे दिसतातच, पण पावसाळ्यातल्या वेलींनी संपूर्ण दरी आच्छादून टाकलेलं दृश्य फक्त आणि फक्त पावसाळ्यातच पहायला मिळतं.
निसर्गाचं असं मनमोहक रूप बघून नक्कीच तरूणाई बरोबर आपलंही वय विसरून 'आज मै जवान हो गई हू, गुल से गुलीस्ता हो गई हू', असं प्रत्येकाला वाटेल हे मात्र नक्की! जेव्हा निसर्गानेच पुढाकार घेतलाच आहे मग आपण का मागे रहायचं? डोंगराच्या तळाशी दऱ्याखोऱ्यांमधून जी कल्लार नदी वाहताना दिसते तिथंही भरपूर लोक पिकनिकसाठी येतात. ही नदी सागरगोट्यांची असल्याचा भास होतो. तिथं घनदाट जंगल असल्यामुळे तेथील पेपरा वाइल्ड लाइफ सेंच्युरीला जाता येतं. तसंच धबधब्यांचा आनंद लुटता येतो. विविध प्रकारच्या पाना फुलांचा अभ्यास करता येतोच तसंच वेगवेगळ्या फुलपाखरांच्या जातीही बघायला मिळतात. केरळला जाणाऱ्यांनी हे सुंदर ठिकाण चुकवू नये.