अ‍ॅपशहर

...तर लग्न मोडलं असतं

माझ्या मुलीचं २२ वर्षांपूर्वी लग्न झालं, त्यावेळचा हा प्रसंग आहे. आम्ही लग्नाची बरीच तयारी सर्व अंगाने केली होती. कारण वरपक्ष पंजाबी असल्याने खूपच ताण होता. आमच्याकडीलही हे पहिलंच कार्य असल्याने आणि आमचं कुटुंब मोठं असल्याने त्यात गावाकडची मंडळीही बरीच येणार असल्याने त्यांची सर्व व्यवस्था याचाही बराच ताण होता.

Maharashtra Times 28 Nov 2016, 12:28 am
अलका जांबवलीकर, चेंबूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम alka sharing experince of her daughters marriage
...तर लग्न मोडलं असतं

माझ्या मुलीचं २२ वर्षांपूर्वी लग्न झालं, त्यावेळचा हा प्रसंग आहे. आम्ही लग्नाची बरीच तयारी सर्व अंगाने केली होती. कारण वरपक्ष पंजाबी असल्याने खूपच ताण होता. आमच्याकडीलही हे पहिलंच कार्य असल्याने आणि आमचं कुटुंब मोठं असल्याने त्यात गावाकडची मंडळीही बरीच येणार असल्याने त्यांची सर्व व्यवस्था याचाही बराच ताण होता. साखरपुडा आणि इतर सर्व विधी पार पडले. आम्ही लग्न महाराष्ट्रीयन पद्धतीनेच करणार म्हणून ठरवलं होतं. त्याप्रमाणे दुपारचा मुहूर्त काढला अन् संध्याकाळी स्वागत समारंभ होता. दोन्ही वेळच्या खाण्यापिण्याची यथास्थित तयारी आम्ही आमच्या परीने केली होती.
दुपारी लग्न व्यवस्थित पार पडलं. जेवणावळी सुरु झाल्या. आपल्या पद्धतीने सर्व साग्रसंगीत पार पडत होतं आणि एक प्रश्न उद्भवला. त्या लोकांना जेवताना पाण्याऐवजी शीतपेयांची सवय, जी आम्हाला कल्पना नव्हती. कारण आपल्यात हे सर्व स्वागत समारंभावेळी असते. तशी थोड्याफार प्रमाणात व्यवस्था होती. पण ती त्यांना पुरेशी नव्हती. आमच्यापुढे मोठाच प्रश्न उभा राहिला. एकतर त्यांची कसल्याच तडजोडीची तयारी नव्हती. आयत्यावेळी कशी व्यवस्था होणार काही सुचत नव्हतं. लग्नसराईचे दिवस असल्याने थोडं कठीणच होतं. या सगळ्या विचारात असताना एक चमत्कार घडला. हॉलच्या गेटपाशी एक शीतपेयाने भरलेला ट्रक येऊन उभा राहिला आणि ट्रकचालक माल उतरवून घेण्यासाठी आग्रह करु लागला. आम्ही उभयंता बुचकाळ्यात पडलो. त्या माणसाला आमची ऑर्डर नाही आणि कदाचित तिथल्याच जवळच्या दुसऱ्या हॉलची असेल असं सांगितलं. तर त्याने यांच्या नावाची आणि आमच्याच हॉलच्या पत्त्याची पावती दाखवली. मग मात्र यांनी आमच्या श्रीदामबाबानेच (आमचे कुलदैवत) ही सोय केलीय असं मानून माल उतरवून घेतला आणि तो प्रसंग साजरा केला. सांगायची गोष्ट म्हणजे अजूनही तो ट्रक कोणी पाठवला किंवा मागवला हे समजलंच नाही. सर्व सुहृदांना, हितचिंतकांना विचारुन झालं. पण काहीच कळायला पत्ता नाही. आमची तर खात्रीच पटली की, सर्व संकटातून सोडवणाऱ्या श्रीदामोदरानेच आमचे संकट टाळलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज