साधारण १९८७मध्ये एका शनिवारी ऑफिसमधून संध्याकाळी मी आणि बायको रेखा दादरला मामाकडे राहायला गेलो होतो. त्या वेळी आम्ही नालासोपाराला राहायचो. दादरकडून आम्ही सोमवारी संध्याकाळी ऑफिसमधून घरी जाणार होतो.
दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी जेवल्यावर आमच्या गप्पा चांगल्या रंगात आल्या होत्या. अचानक मी रेखाला बोललो, की आता मी घरी जाऊन संध्याकाळी परत येतो. तेव्हा रेखानं आपण उद्या संध्याकाळी घरी जाणार आहोत याची आठवण करून दिली.
तरीही मी दुपारी घरी निघालोच. दुपारी तीनच्या सुमारास घरी पोहोचलो. दार उघडून आत गेलो आणि बघतो तर, काय बाथरूममधून गिझरचा आवाज येत होता, कारण गिझर चालूच होता. फक्त नळ बंद केला होता. लगेच मी गिझर बंद केला आणि मनात म्हटलं, की बरं झालं आज मी घरी आलो. नाहीतर उद्या संध्याकाळी घरी परत येईस्तोवर काय घडलं असतं, याची कल्पनाही करावी वाटत नाही.
संध्याकाळी दादरला मामाकडे परत गेल्यावर रेखाला विचारलं तेव्हा कळलं, की शनिवारी सकाळी पाणी तापल्यावर तिनं नळ बंद केला आणि गिझर बंद करायचा राहून गेला; कारण त्याचवेळी वीज प्रवाह खंडीत झाला होता. त्यामुळे ऑफिसला निघताना रेखाच्या लक्षात आलं नाही. मी ऑफिसला तिच्या आधी निघायचो.
असं होतं कधीतरी. मनातून आपल्याला असुरक्षित वाटतं आणि घरचं सगळं ठाकठीक आहे ना याची खातरजमा करावीशी वाटते. या भावनेमुळेच आमच्या घरातील मोठा अनर्थ टळला.
दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी जेवल्यावर आमच्या गप्पा चांगल्या रंगात आल्या होत्या. अचानक मी रेखाला बोललो, की आता मी घरी जाऊन संध्याकाळी परत येतो. तेव्हा रेखानं आपण उद्या संध्याकाळी घरी जाणार आहोत याची आठवण करून दिली.
तरीही मी दुपारी घरी निघालोच. दुपारी तीनच्या सुमारास घरी पोहोचलो. दार उघडून आत गेलो आणि बघतो तर, काय बाथरूममधून गिझरचा आवाज येत होता, कारण गिझर चालूच होता. फक्त नळ बंद केला होता. लगेच मी गिझर बंद केला आणि मनात म्हटलं, की बरं झालं आज मी घरी आलो. नाहीतर उद्या संध्याकाळी घरी परत येईस्तोवर काय घडलं असतं, याची कल्पनाही करावी वाटत नाही.
संध्याकाळी दादरला मामाकडे परत गेल्यावर रेखाला विचारलं तेव्हा कळलं, की शनिवारी सकाळी पाणी तापल्यावर तिनं नळ बंद केला आणि गिझर बंद करायचा राहून गेला; कारण त्याचवेळी वीज प्रवाह खंडीत झाला होता. त्यामुळे ऑफिसला निघताना रेखाच्या लक्षात आलं नाही. मी ऑफिसला तिच्या आधी निघायचो.
असं होतं कधीतरी. मनातून आपल्याला असुरक्षित वाटतं आणि घरचं सगळं ठाकठीक आहे ना याची खातरजमा करावीशी वाटते. या भावनेमुळेच आमच्या घरातील मोठा अनर्थ टळला.