>> दिगंबर हुसे, ठाणे
माझ्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस काही आगळावेगळा पद्धतीने साजरा करावा असा प्रस्ताव माझ्या मुलांनी आमच्या समोर ठेवला. लग्नाचा पंचविसावा वाढदिवस हा पुन्हा विवाह सोहळ्याच्या रुपानेच साजरा करावा, अशी त्यांची इच्छा त्यांनी मोठया हट्टाने प्रकट केली. हो- नाही- हो करता-करता त्यांनी आमची परवानगी मिळवली. विपुल आणि राधिका यांनी त्यांच्या काका-काकू, आत्या-आत्याजी, मामा- मामी, मावश्या, आज्या, इतर सर्व भावंडं यांना फोन करुन कार्यक्रमाची माहिती दिली आणि वेळेवर येण्याचा आग्रह केला. संगीत रजनी, नाच-गाणी, फोटो-व्हिडीओग्राफी, मेकअप, गेम्स, विनोद, सोबत चटपटीत खाणं-पिणं, डीजे या सगळ्याची जय्यत तयारी केली.
आम्ही दोघांनी आपआपल्या मित्र-मैत्रिणींना बोलवायचं ठरवलं. मी माझ्या १९८० च्या दहावीच्या बॅचच्या सर्व वर्गमित्र-मैत्रिणींना आमंत्रित केलं. बापट मॅडम, भागवत मॅडम या दोन आवडत्या शिक्षिकांनाही आमत्रंण दिलं.
विवाहा पूर्वीचे धार्मिक विधी सुरु झाले आणि अगोदरच्या दिवशी दणक्यात हळदीचा कार्यक्रम मुलांनी केला. ज्यासाठी एवढा मोठा घाट घातला तो दिवस म्हणजे ३० जून २०१६ गुरुवारी आम्ही लग्नाचा २५ वा वाढदिवस आणि विवाह सोहळ्यासाठी सज्ज झालो. सर्व मित्रमंडळी आणि माझे सर्व गणगोत अवतरले. मंगलाष्टक म्हणण्यासाठी बापट मॅडम यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर सुरु झाला मनोरंजनाचा कार्यक्रम. राधिका-विपुल माझ्या मुलांनी नृत्य सादर केलं. त्यात भाचा-भाची, पुतण्या-पुतणी यांनी सहभागी होऊन रंगत आणली. माझी वहिनी शुभांगी आणि मुलगा विपुल यांनी एकेकाची नक्कल करुन भरपूर करमणूक केली. माझ्या कार्यालयातील सेवानिवृत्त अधिकारी सय्यद साहेब खास पुण्यावरुन या कार्यक्रमाला आले. शेवटी भोजनाचा लाभ घेऊन या आगळ्या-वेगळ्या, हृदयस्पर्शी, अविस्मरणीय दिमाखदार प्रसंगाची सांगता झाली. लहान-थोर, वडीलधारी मंडळी आणि माझे आदरणीय शिक्षिकांसह सर्वांच्या प्रेमाने दिलेल्या शुभेच्छा-आशीर्वादामुळे हा दिमाखदार सोहळा मला खूप आनंद देऊन गेला. त्याबद्दल मी उपस्थित सर्वांचे शतश: आभार मानतो.
माझ्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस काही आगळावेगळा पद्धतीने साजरा करावा असा प्रस्ताव माझ्या मुलांनी आमच्या समोर ठेवला. लग्नाचा पंचविसावा वाढदिवस हा पुन्हा विवाह सोहळ्याच्या रुपानेच साजरा करावा, अशी त्यांची इच्छा त्यांनी मोठया हट्टाने प्रकट केली. हो- नाही- हो करता-करता त्यांनी आमची परवानगी मिळवली. विपुल आणि राधिका यांनी त्यांच्या काका-काकू, आत्या-आत्याजी, मामा- मामी, मावश्या, आज्या, इतर सर्व भावंडं यांना फोन करुन कार्यक्रमाची माहिती दिली आणि वेळेवर येण्याचा आग्रह केला. संगीत रजनी, नाच-गाणी, फोटो-व्हिडीओग्राफी, मेकअप, गेम्स, विनोद, सोबत चटपटीत खाणं-पिणं, डीजे या सगळ्याची जय्यत तयारी केली.
आम्ही दोघांनी आपआपल्या मित्र-मैत्रिणींना बोलवायचं ठरवलं. मी माझ्या १९८० च्या दहावीच्या बॅचच्या सर्व वर्गमित्र-मैत्रिणींना आमंत्रित केलं. बापट मॅडम, भागवत मॅडम या दोन आवडत्या शिक्षिकांनाही आमत्रंण दिलं.
विवाहा पूर्वीचे धार्मिक विधी सुरु झाले आणि अगोदरच्या दिवशी दणक्यात हळदीचा कार्यक्रम मुलांनी केला. ज्यासाठी एवढा मोठा घाट घातला तो दिवस म्हणजे ३० जून २०१६ गुरुवारी आम्ही लग्नाचा २५ वा वाढदिवस आणि विवाह सोहळ्यासाठी सज्ज झालो. सर्व मित्रमंडळी आणि माझे सर्व गणगोत अवतरले. मंगलाष्टक म्हणण्यासाठी बापट मॅडम यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर सुरु झाला मनोरंजनाचा कार्यक्रम. राधिका-विपुल माझ्या मुलांनी नृत्य सादर केलं. त्यात भाचा-भाची, पुतण्या-पुतणी यांनी सहभागी होऊन रंगत आणली. माझी वहिनी शुभांगी आणि मुलगा विपुल यांनी एकेकाची नक्कल करुन भरपूर करमणूक केली. माझ्या कार्यालयातील सेवानिवृत्त अधिकारी सय्यद साहेब खास पुण्यावरुन या कार्यक्रमाला आले. शेवटी भोजनाचा लाभ घेऊन या आगळ्या-वेगळ्या, हृदयस्पर्शी, अविस्मरणीय दिमाखदार प्रसंगाची सांगता झाली. लहान-थोर, वडीलधारी मंडळी आणि माझे आदरणीय शिक्षिकांसह सर्वांच्या प्रेमाने दिलेल्या शुभेच्छा-आशीर्वादामुळे हा दिमाखदार सोहळा मला खूप आनंद देऊन गेला. त्याबद्दल मी उपस्थित सर्वांचे शतश: आभार मानतो.