अ‍ॅपशहर

आठवणींची साठवण

एखादी गोष्ट जेव्हा माणसाला सहजपणे मिळू लागते तेव्हा तिचं तेवढं अप्रूप राहत नाही जेवढी ती सहज साध्य नसताना असते. हे मला आज सर्वांच्या हातात असणाऱ्या मोबाईल फोन विषयी प्रकर्षाने जाणवतं. साधारणपणे प्रत्येकाच्या मोबईल फोनमध्ये आज एक कॅमेरा असतो. त्यामुळे घरी, दारी, बाहेर, रस्त्यात किंवा कोणत्याही प्रसंगी किंवा सहज म्हणूनसुद्धा फोटो काढण्याच्या हौसेला कोणीच थांबवू शकत नाही. बरं काढलेला फोटोसुद्धा लगेच पहावयास मिळत असतो.

Maharashtra Times 30 Jan 2017, 12:50 am
गजानन कुलकर्णी, कोपर खैरणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम old memories
आठवणींची साठवण


एखादी गोष्ट जेव्हा माणसाला सहजपणे मिळू लागते तेव्हा तिचं तेवढं अप्रूप राहत नाही जेवढी ती सहज साध्य नसताना असते. हे मला आज सर्वांच्या हातात असणाऱ्या मोबाईल फोन विषयी प्रकर्षाने जाणवतं. साधारणपणे प्रत्येकाच्या मोबईल फोनमध्ये आज एक कॅमेरा असतो. त्यामुळे घरी, दारी, बाहेर, रस्त्यात किंवा कोणत्याही प्रसंगी किंवा सहज म्हणूनसुद्धा फोटो काढण्याच्या हौसेला कोणीच थांबवू शकत नाही. बरं काढलेला फोटोसुद्धा लगेच पहावयास मिळत असतो. त्यामुळे फोटो काढण्याच्या या वेडामध्ये निश्चितच भर पडत असते. हे झालं आजच्या काळातलं. पण मी ज्या फोटोविषयी लिहीत आहे, तो आहे सुमारे पन्नास वर्षां पूर्वीचा.
पन्नास वर्षांपूर्वी माझं वय साधारण १-११ वर्षं असेल. आमचे तात्या म्हणजे माझे वडील हे महसूल खात्यातून निवृत्त झाले होते. त्यादिवशी सायंकाळी ते जेव्हा घरी आले तेव्हा त्यांच्या हातात सत्काराची शाल, श्रीफळ आणि फुलांचा गुच्छ पाहून ते आज निवृत्त झालेत एवढंच फक्त मला समजलं. योगायोगाने बाहेरगावी असणाऱ्या माझ्या बहिणीही तेव्हा आलेल्या असल्याने आम्ही सर्वांनी त्या दिवसाची आठवण म्हणून एक ग्रुप फोटो काढून घ्यावा असं ठरवलं. लगेच आम्ही सर्वजण अतिशय उत्साहात तयारी करुन आमच्या धुळे शहरातील प्रख्यात अशा मुधोळकर आर्ट स्टुडीओत फोटो काढण्यासाठी गेलो. त्या प्रसंगाचं कौतुक तर शब्दातीतच म्हणावं लागेल.
आम्ही तिघे भाऊ, पाच बहिणी, दोघं-तिघं भाचे आणि आई-वडील अशा सर्वांचा मिळून तो एक फॅमिली ग्रुप फोटो काढण्यात आला. नंतर आठ दिवसांनी एका पुठ्यावर माउंट केलेला असा तो फोटो मिळाला. तो पहाताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. खरोखर 'गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी', असंच आज वाटतं. आज माझे आई-वडील नाहीत आणि दोन बहिणीही नाहीत. पण जेव्हा तो फोटो हातात धरून त्याकडे एकटक पाहात राहतो तेव्हा काळ वेळाची सारी बंधनं झुगारून मन भूतकाळात झेप घेतं आणि वाटतं की मीही त्या आपुलकीच्या माझ्या सर्व व्यक्तींमध्येच बसलो आहे. एका वेगळ्या स्नेहाच्या अनुभूतीने मन पुलकित होते आणि शरीर रोमांचित झाल्याचा अनुभव येतो. यामुळेच आमच्या आयुष्यात तो दिवस आणि तो क्षण बंदिस्त करणाऱ्या त्या फोटोस मला 'थँक यू' म्हणावंसं वाटतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज