श्रीनिवास जोशी, डोंबिवली
ही घटना बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. मी आणि माझा एक मित्र (बबन परदेशी) परिवारासह कोल्हापूर-करवीर दर्शनासाठी गेलो होतो. शेवटच्या दिवशी ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही दोन रिक्षा करुन सकाळी गेलो. दर्शन वगैरे करुन दुपारी कोल्हापुरात परतलो. त्याच दिवशी संध्याकाळच्या गाडीने डोंबिवलीला परतायचं होतं. रिक्षेने वेळेवर बस स्टँडवर आलो. रिक्षावाल्याचे पैसे देऊन रेल्वे स्टेशनवर जायला निघालो. तेव्हा लक्षात आलं की मित्राची बॅग रिक्षेमध्येच राहिली आणि रिक्षातर निघून गेली होती. आम्ही मोठ्या संकटात सापडलो होतो. कारण त्या बॅगमध्ये रेल्वेचे पास, पैसे वेगैरे सुमारे चार हजाराचा ऐवज होता. परिवारातल्या सगळ्यांना एका हॉटेलमध्ये बसवून रिक्षा स्टँडवर रिक्षावाल्याची चौकशी करण्यास गेलो. तिथं कळलं की तो रिक्षावाला दुसरं भाडं घेऊन लांब गेला आहे, तो आता लवकर येणार नाही. आमची तर पाचावर धारण बसली. कारण परतीची रेल्वे सुटण्याची वेळ जवळ येत होती. आम्ही दोघांनी आई महालक्ष्मीला साकडं घातलं आणि आश्चर्य म्हणजे त्याच वेळी तो (आमचा) रिक्षावाला आम्हाला शोधत आला. त्याने आमच्याकडे बॅग दिली आणि त्या लगोलग निघून गेला. कारण त्याचे प्रवासी परत यावं लागल्याने नाराज झाले होते. पण त्या गडबडीत त्या प्रामाणिक रिक्षावाल्याचे आभार मानायचे राहून गेले. आज 'मटा'च्या माध्यमातून त्याचे जाहीर आभार मानतो.
ही घटना बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. मी आणि माझा एक मित्र (बबन परदेशी) परिवारासह कोल्हापूर-करवीर दर्शनासाठी गेलो होतो. शेवटच्या दिवशी ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही दोन रिक्षा करुन सकाळी गेलो. दर्शन वगैरे करुन दुपारी कोल्हापुरात परतलो. त्याच दिवशी संध्याकाळच्या गाडीने डोंबिवलीला परतायचं होतं. रिक्षेने वेळेवर बस स्टँडवर आलो. रिक्षावाल्याचे पैसे देऊन रेल्वे स्टेशनवर जायला निघालो. तेव्हा लक्षात आलं की मित्राची बॅग रिक्षेमध्येच राहिली आणि रिक्षातर निघून गेली होती. आम्ही मोठ्या संकटात सापडलो होतो. कारण त्या बॅगमध्ये रेल्वेचे पास, पैसे वेगैरे सुमारे चार हजाराचा ऐवज होता. परिवारातल्या सगळ्यांना एका हॉटेलमध्ये बसवून रिक्षा स्टँडवर रिक्षावाल्याची चौकशी करण्यास गेलो. तिथं कळलं की तो रिक्षावाला दुसरं भाडं घेऊन लांब गेला आहे, तो आता लवकर येणार नाही. आमची तर पाचावर धारण बसली. कारण परतीची रेल्वे सुटण्याची वेळ जवळ येत होती. आम्ही दोघांनी आई महालक्ष्मीला साकडं घातलं आणि आश्चर्य म्हणजे त्याच वेळी तो (आमचा) रिक्षावाला आम्हाला शोधत आला. त्याने आमच्याकडे बॅग दिली आणि त्या लगोलग निघून गेला. कारण त्याचे प्रवासी परत यावं लागल्याने नाराज झाले होते. पण त्या गडबडीत त्या प्रामाणिक रिक्षावाल्याचे आभार मानायचे राहून गेले. आज 'मटा'च्या माध्यमातून त्याचे जाहीर आभार मानतो.