अ‍ॅपशहर

आईसम माई

मला माझ्या मोठ्या बहिणीचे, सुनंदा माईचे अंतःकरणापासून आभार मानायचेत. तिचं माझ्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. आम्ही पाच भावंडं, तीन बहिणी आणि दोन भाऊ. माझ्या जन्माआधीच माझ्या बहिणींची लग्न झाली होती. मी आमच्या भावंडांमधील शेंडेफळ आहे. आज जे काही मी आहे त्याचं अर्ध्याहून अधिक श्रेय माझ्या बहिणीलाच जातं.

Maharashtra Times 10 May 2017, 12:26 am
कविता तावडे, दहिसर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sister is like mother
आईसम माई


मला माझ्या मोठ्या बहिणीचे, सुनंदा माईचे अंतःकरणापासून आभार मानायचेत. तिचं माझ्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. आम्ही पाच भावंडं, तीन बहिणी आणि दोन भाऊ. माझ्या जन्माआधीच माझ्या बहिणींची लग्न झाली होती. मी आमच्या भावंडांमधील शेंडेफळ आहे. आज जे काही मी आहे त्याचं अर्ध्याहून अधिक श्रेय माझ्या बहिणीलाच जातं. माई माझी बहीण असली तरी तिच्या आणि माझ्या वयात आई आणि मुली इतकंच अंतर आहे. हे नातं तिने चांगलंच जपलं. माझ्यासमोर आयुष्याचा प्रश्न होता. माहेरच्या परिस्थितीमुळे माझं संगोपन करण्याचा निर्णय तिने घेतलाय. त्यावेळी मी अवघी अकरा-बारा वर्षांची होते. तिने माझं शिक्षण पूर्ण केलं. ती खरोखरच आईसारखी माझ्या पाठीशी उभी राहिली.
एवढंच नव्हे तर आमच्या घरातील प्रत्येक माणसाची तिने अडीअडचणीच्या वेळी काळजी घेतली. आईची अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सेवा केली. गेल्या दोन वर्षांपासून मी खांद्याच्या दुखण्याने त्रस्त आहे. या वेळीही ती माझी काळजी घेते. दररोज माझी चौकशी करते. माझ्यासाठी औषधं पाठवते, देवाकडे प्रार्थना करते. अशी बहीण सर्वांनाच मिळो. हे सगळं मात्र माझ्या भावोंजींशिवाय शक्य झालं नसतं. त्यांचा ही यात मोठा वाटा आहे. त्यांचे कितीही आभार मानले तरीही त्यांच्या उपकाराची उतराई होऊ शकणार नाही. त्या दोघांना मानाचा दंडवत. त्या दोघांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज