विरोधकांचा विजय
नवी दिल्ली - देशाच्या स्वातंत्र्याला व सार्वभौमत्वाला बाधा आणणाऱ्या कृत्यांना पायबंद घालण्यासाठी गृहमंत्र्यांनी लोकसभेत मांडलेले बेकायदा कृत्ये प्रतिबंधक विधेयक, विरोधी पक्षांच्या संयुक्त दबावामुळे आज अखेर संसदेच्या चिकित्सा समितीकडे धाडण्यात आले. विधेयक मांडताना गृहमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले की देशात आज फुटीर वृत्ती खूप वाढीला लागल्या आहेत. त्यांना पूर्णपणे पायबंद घालण्याची तरतूद आज अस्तित्वात असलेल्या कायद्यांत नाही.
'भवानी' आक्षेपार्ह नाही
मुंबई - एक तरुण नाटकार दत्ता आयरे यांनी लिहिलेल्या आणि सरकारी अधिक्षेपामुळे साहित्य क्षेत्रात खळबळ उडवून दिलेल्या 'भवानी तलवार' या बालनाट्यामधील कोणताही भाग आक्षेपार्ह नसल्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या नाट्य परीक्षण मंडळाने घेतला असल्याचे समजते. सोळा वर्षांपूर्वी लिहिलेल्या या बालनाट्याचे आतापर्यंत अनेक प्रयोग झाले असून भारताचे थोर दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या संपादकत्वाखाली निघणाऱ्या 'संदेश'च्या खास पूजा अंकात त्याचा अनुवादही प्रसिद्ध झाला होताश. मुंबई नभोवाणीवरही त्याचा प्रयोग झाला होता.
सरकार धारेवर
नवी दिल्ली - सार्वजनिक हिशेब समितीने उजेडात आणलेल्या रोडरोलर प्रकरणी लोकसभेत आज वादळ उठले. जवळ जवळ ४० मिनिटे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. नोंदल्या न गेलेल्या एका खासगी कंपनीशी रोड रोलर्स पुरविण्याबाबत सरकारने केलेल्या व्यवहारात १ कोटी ८४ लाख रुपयांची खोट सोसावी लागली, याबद्दल सर्व विरोधी खासदार संतप्त झाले होते.
कमिशनरची गाडी चोरीला
मुंबई - एका डॉक्टरच्या मुलाला मोटार चोरल्याच्या आरोपावरून आज अटक करण्यात आली. खुद्द असिस्टंट पोलिस कमिशनरांची मोटर त्याने चोरली. त्याने यापूर्वी पाच मोटार गाड्या चोरल्याचे मान्य केले. काही तरुण उभ्या केलेल्या मोटारी पळवून आपल्या मैत्रिणींना घेऊन त्या मोटारीतून फिरायला जातात. नंतर मोटारी टाकून निघून जातात, असे आढळून आले आहे.
वॉर्निश बळींची संख्या १०२
मद्रास - वॉर्निश प्यायल्याने मृत्युमुखी पडलेल्या मद्रास शहरातील व चिगलपुट जिल्ह्यातील बळींची संख्या १०२ झाली आहे.
नवी दिल्ली - देशाच्या स्वातंत्र्याला व सार्वभौमत्वाला बाधा आणणाऱ्या कृत्यांना पायबंद घालण्यासाठी गृहमंत्र्यांनी लोकसभेत मांडलेले बेकायदा कृत्ये प्रतिबंधक विधेयक, विरोधी पक्षांच्या संयुक्त दबावामुळे आज अखेर संसदेच्या चिकित्सा समितीकडे धाडण्यात आले. विधेयक मांडताना गृहमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले की देशात आज फुटीर वृत्ती खूप वाढीला लागल्या आहेत. त्यांना पूर्णपणे पायबंद घालण्याची तरतूद आज अस्तित्वात असलेल्या कायद्यांत नाही.
'भवानी' आक्षेपार्ह नाही
मुंबई - एक तरुण नाटकार दत्ता आयरे यांनी लिहिलेल्या आणि सरकारी अधिक्षेपामुळे साहित्य क्षेत्रात खळबळ उडवून दिलेल्या 'भवानी तलवार' या बालनाट्यामधील कोणताही भाग आक्षेपार्ह नसल्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या नाट्य परीक्षण मंडळाने घेतला असल्याचे समजते. सोळा वर्षांपूर्वी लिहिलेल्या या बालनाट्याचे आतापर्यंत अनेक प्रयोग झाले असून भारताचे थोर दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या संपादकत्वाखाली निघणाऱ्या 'संदेश'च्या खास पूजा अंकात त्याचा अनुवादही प्रसिद्ध झाला होताश. मुंबई नभोवाणीवरही त्याचा प्रयोग झाला होता.
सरकार धारेवर
नवी दिल्ली - सार्वजनिक हिशेब समितीने उजेडात आणलेल्या रोडरोलर प्रकरणी लोकसभेत आज वादळ उठले. जवळ जवळ ४० मिनिटे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. नोंदल्या न गेलेल्या एका खासगी कंपनीशी रोड रोलर्स पुरविण्याबाबत सरकारने केलेल्या व्यवहारात १ कोटी ८४ लाख रुपयांची खोट सोसावी लागली, याबद्दल सर्व विरोधी खासदार संतप्त झाले होते.
कमिशनरची गाडी चोरीला
मुंबई - एका डॉक्टरच्या मुलाला मोटार चोरल्याच्या आरोपावरून आज अटक करण्यात आली. खुद्द असिस्टंट पोलिस कमिशनरांची मोटर त्याने चोरली. त्याने यापूर्वी पाच मोटार गाड्या चोरल्याचे मान्य केले. काही तरुण उभ्या केलेल्या मोटारी पळवून आपल्या मैत्रिणींना घेऊन त्या मोटारीतून फिरायला जातात. नंतर मोटारी टाकून निघून जातात, असे आढळून आले आहे.
वॉर्निश बळींची संख्या १०२
मद्रास - वॉर्निश प्यायल्याने मृत्युमुखी पडलेल्या मद्रास शहरातील व चिगलपुट जिल्ह्यातील बळींची संख्या १०२ झाली आहे.