अलौकिक सेनापती बापट
मुंबईः पक्षांतराचा बुजबुजाट आणि प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांना शत्रुवत लेखण्याची प्रवृत्ती यामुळे भारतातील स्वातंत्र्यावर संकट कोसळण्याची भीती आहे, असे उद्गार पुणे विद्यापीठाचे कुलगुरु हरीभाऊ पाटसकर यांनी येथे काढले. सेनापती बापट यांचा ८८ वा वाढदिवस समारंभ व 'सेनापती बापट समग्र वाड्.मय तिसरा खंड' या ग्रंथाचे प्रकाशन असा जोड कार्यक्रम त्यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यावेळी त्यांनी सेनापती बापट हे सरळ, सत्य व न्याय्य असेल ते स्पष्टपणे बोलणारे व त्यासाठी कोणत्याही रागालोभाची पर्वा न करता झगडणारे महाराष्ट्राचे भूषण आणि देशातील एक अलौकिक पुरुष आहेत असे सांगितले.
मंत्री काय वाचतात?
मुंबईः १९६० साली मंत्रिमंडळात समावेश झाल्यापासून गेल्या सात आठ वर्षांत मी जेमतेम १० ते २० पुस्तके वाचली असतील, इतके मुंबईचे जीवन धावपळीचे आहे, असे गृहनिर्माण मंत्री यशवंतराव मोहिते यांनी वांद्रे येथील नॅशनल लायब्ररी या ग्रंथसंग्रहालयाच्या सुवर्ण महोत्सवाचे उद् घाटन करताना सांगितले. श्री. मोहिते पुढे म्हणाले की, आमचे मुख्य वाचन म्हणजे रोज सकाळी घरी येणाऱ्या वर्तमानपत्रातील शीर्षके आणि स्वतःचे भाषण असेल तर ते.
शिवाजी पंथ आरोप
पुणेः छत्रपती शिवाजी महाराज एक राष्ट्रपुरुष होते, त्यांच्या स्मृतीचे पुनरुज्जीवन करण्यात महाराष्ट्र शिवाजी पंथ निर्माण करीत आहे ही कल्पना अगदी कुचकामी असल्याचे निर्भीड मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांनी आज येथे व्यक्त केले. शिवाजी महाराजांची आगऱ्याहून सुटका झाल्याच्या प्रसंगास ३०१ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त पुणे शहरात तीन दिवस भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
व्हिएतनाममध्ये तुंबळ युद्ध
सायगावः मध्य व्हिएतनाममधील जंगलात गेले ११ दिवस चाललेल्या तुंबळ लढाईत ७२५ लोक ठार व ५०० जखमी झाले. ठार झालेल्यांपैकी ९४ अमेरिकन होते व ६३१ उत्तर व्हिएतनामचे सैनिक होते असे अमेरिकन प्रवक्त्याने सांगितले. या लढाईत बी ५२ ही प्रचंड बाँबफेकी विमाने वापरण्यात आली. त्यानी ३० टनी बाँब टाकले.
मुंबईः पक्षांतराचा बुजबुजाट आणि प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांना शत्रुवत लेखण्याची प्रवृत्ती यामुळे भारतातील स्वातंत्र्यावर संकट कोसळण्याची भीती आहे, असे उद्गार पुणे विद्यापीठाचे कुलगुरु हरीभाऊ पाटसकर यांनी येथे काढले. सेनापती बापट यांचा ८८ वा वाढदिवस समारंभ व 'सेनापती बापट समग्र वाड्.मय तिसरा खंड' या ग्रंथाचे प्रकाशन असा जोड कार्यक्रम त्यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यावेळी त्यांनी सेनापती बापट हे सरळ, सत्य व न्याय्य असेल ते स्पष्टपणे बोलणारे व त्यासाठी कोणत्याही रागालोभाची पर्वा न करता झगडणारे महाराष्ट्राचे भूषण आणि देशातील एक अलौकिक पुरुष आहेत असे सांगितले.
मंत्री काय वाचतात?
मुंबईः १९६० साली मंत्रिमंडळात समावेश झाल्यापासून गेल्या सात आठ वर्षांत मी जेमतेम १० ते २० पुस्तके वाचली असतील, इतके मुंबईचे जीवन धावपळीचे आहे, असे गृहनिर्माण मंत्री यशवंतराव मोहिते यांनी वांद्रे येथील नॅशनल लायब्ररी या ग्रंथसंग्रहालयाच्या सुवर्ण महोत्सवाचे उद् घाटन करताना सांगितले. श्री. मोहिते पुढे म्हणाले की, आमचे मुख्य वाचन म्हणजे रोज सकाळी घरी येणाऱ्या वर्तमानपत्रातील शीर्षके आणि स्वतःचे भाषण असेल तर ते.
शिवाजी पंथ आरोप
पुणेः छत्रपती शिवाजी महाराज एक राष्ट्रपुरुष होते, त्यांच्या स्मृतीचे पुनरुज्जीवन करण्यात महाराष्ट्र शिवाजी पंथ निर्माण करीत आहे ही कल्पना अगदी कुचकामी असल्याचे निर्भीड मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांनी आज येथे व्यक्त केले. शिवाजी महाराजांची आगऱ्याहून सुटका झाल्याच्या प्रसंगास ३०१ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त पुणे शहरात तीन दिवस भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
व्हिएतनाममध्ये तुंबळ युद्ध
सायगावः मध्य व्हिएतनाममधील जंगलात गेले ११ दिवस चाललेल्या तुंबळ लढाईत ७२५ लोक ठार व ५०० जखमी झाले. ठार झालेल्यांपैकी ९४ अमेरिकन होते व ६३१ उत्तर व्हिएतनामचे सैनिक होते असे अमेरिकन प्रवक्त्याने सांगितले. या लढाईत बी ५२ ही प्रचंड बाँबफेकी विमाने वापरण्यात आली. त्यानी ३० टनी बाँब टाकले.