मतभेद होणारच
मुंबई - अतिकेंद्रित आर्थिक सत्ता असलेले केंद्र सरकार व सतत वाढत जाणारी खाती असलेली राज्ये, यामुळे राज्ये व केंद्र सरकार यात मतभेद होणारच, असे मत केरळचे मुख्यमंत्री इ. एम. एस. नंब्रुद्रिपाद यांनी आज 'महाराष्ट्र टाइम्स'ला खास मुलाखत देताना व्यक्त केले. यामुळे, राज्य सरकारे कोणत्या पक्षाची आहेत, हा प्रश्नच उद्भवत नाही. केरळमधील परिस्थितीच अशी आहे की संमिश्र सरकारात येत्या पाच वर्षांत फाटाफूट होऊच शकणार नाही, असेही ते म्हणाले.
शेख अब्दुलांची सुटका
नवी दिल्ली - शेख अब्दुल्ला यांची सुटका करावी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवरील निर्बंध दूर करावेत, अशी मागणी चिंतामणराव देशमुख, राजगोपालचारी, जयप्रकाश नारायण प्रभृती अनेक ख्यातनाम व्यक्तींनी केली आहे. ज्यांची मते पक्की आहेत, अशा व्यक्तींना खटल्याशिवाय बेमुदत कारावासात ठेवल्याने, मूळ हेतू तर असफल होतोच, परंतु ही कृती लोकशाहीच्या सर्व तत्त्वांच्या विरोधात जाणारी आहे, असे या मान्यवरांनी म्हटले आहे.
बालगंधर्व किंचित बरे
मुंबई - नटसम्राट बालगंधर्व यांचा ताप आज पूर्ण उतरल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. मात्र, अजून ते बेशुद्धावस्थेतच आहेत. बालगंधर्वांना गेल्या रविवारपासून हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. श्वासोच्छवास नीट चालावा, यासाठी त्यांना ऑक्सिजन देण्यात आला आहे.
कृष्णा-गोदावरी चर्चा
बेळगाव - येत्या जून किंवा जुलैत संबंधित मंत्र्यांची परिषद होऊन कृष्णा-गोदावरी पाणीवाटपाच्या प्रश्नाचा फेरविचार होण्याची शक्यता आहे, असे कळते. परस्परचर्चा करून हा तंटा सोडवावा, अशी केंद्र सरकारची फार इच्छा आहे आणि त्या दृष्टीने केंद्र सरकारच ही परिषद घडवून आणील, असे म्हैसूरच्या पब्लिक वर्क्स खात्याचे मंत्री वीरेंद्र पाटील यांनी बंगलोर येथे बोलून दाखवले.
आंबेडकर जयंतीची सुटी
मुंबई - महापालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील काही कर्मचाऱ्यांना १४ एप्रिलला येणारी डॉ. आंबेडकर जयंतीची सुटी देण्यात येत नाही, या गोष्टीकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी सी. एच. खरे यानी दहा मिनिटांची सभा तहकुबीची सूचना आजच्या बैठकीत मांडली. महापालिकेत चतुर्थ श्रेणीचे सुमारे चाळीस हजार कर्मचारी असून त्यापैकी तीस हजार नवबौद्ध आहेत. त्यांना सुटी मिळते, पण इतर दहा हजारांना मिळत नाही. त्यांनाही ही सुटी देणे न्याय्य ठरेल, असा त्यांचा आग्रह होता.
मुंबई - अतिकेंद्रित आर्थिक सत्ता असलेले केंद्र सरकार व सतत वाढत जाणारी खाती असलेली राज्ये, यामुळे राज्ये व केंद्र सरकार यात मतभेद होणारच, असे मत केरळचे मुख्यमंत्री इ. एम. एस. नंब्रुद्रिपाद यांनी आज 'महाराष्ट्र टाइम्स'ला खास मुलाखत देताना व्यक्त केले. यामुळे, राज्य सरकारे कोणत्या पक्षाची आहेत, हा प्रश्नच उद्भवत नाही. केरळमधील परिस्थितीच अशी आहे की संमिश्र सरकारात येत्या पाच वर्षांत फाटाफूट होऊच शकणार नाही, असेही ते म्हणाले.
शेख अब्दुलांची सुटका
नवी दिल्ली - शेख अब्दुल्ला यांची सुटका करावी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवरील निर्बंध दूर करावेत, अशी मागणी चिंतामणराव देशमुख, राजगोपालचारी, जयप्रकाश नारायण प्रभृती अनेक ख्यातनाम व्यक्तींनी केली आहे. ज्यांची मते पक्की आहेत, अशा व्यक्तींना खटल्याशिवाय बेमुदत कारावासात ठेवल्याने, मूळ हेतू तर असफल होतोच, परंतु ही कृती लोकशाहीच्या सर्व तत्त्वांच्या विरोधात जाणारी आहे, असे या मान्यवरांनी म्हटले आहे.
बालगंधर्व किंचित बरे
मुंबई - नटसम्राट बालगंधर्व यांचा ताप आज पूर्ण उतरल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. मात्र, अजून ते बेशुद्धावस्थेतच आहेत. बालगंधर्वांना गेल्या रविवारपासून हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. श्वासोच्छवास नीट चालावा, यासाठी त्यांना ऑक्सिजन देण्यात आला आहे.
कृष्णा-गोदावरी चर्चा
बेळगाव - येत्या जून किंवा जुलैत संबंधित मंत्र्यांची परिषद होऊन कृष्णा-गोदावरी पाणीवाटपाच्या प्रश्नाचा फेरविचार होण्याची शक्यता आहे, असे कळते. परस्परचर्चा करून हा तंटा सोडवावा, अशी केंद्र सरकारची फार इच्छा आहे आणि त्या दृष्टीने केंद्र सरकारच ही परिषद घडवून आणील, असे म्हैसूरच्या पब्लिक वर्क्स खात्याचे मंत्री वीरेंद्र पाटील यांनी बंगलोर येथे बोलून दाखवले.
आंबेडकर जयंतीची सुटी
मुंबई - महापालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील काही कर्मचाऱ्यांना १४ एप्रिलला येणारी डॉ. आंबेडकर जयंतीची सुटी देण्यात येत नाही, या गोष्टीकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी सी. एच. खरे यानी दहा मिनिटांची सभा तहकुबीची सूचना आजच्या बैठकीत मांडली. महापालिकेत चतुर्थ श्रेणीचे सुमारे चाळीस हजार कर्मचारी असून त्यापैकी तीस हजार नवबौद्ध आहेत. त्यांना सुटी मिळते, पण इतर दहा हजारांना मिळत नाही. त्यांनाही ही सुटी देणे न्याय्य ठरेल, असा त्यांचा आग्रह होता.