अ‍ॅपशहर

१४ जुलै १९६७

Maharashtra Times 14 Jul 2017, 4:00 am
कोकणात जलसिंचन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14th july 1967
१४ जुलै १९६७

मुंबई - कोकणच्या भूमीत पाणी उपलब्ध केले तर एक नव्हे, दोन नव्हे तर तीन तीन पिके तेथे निघू शकतील, तिकडे जलसिंचन मंत्र्यांनी खास लक्ष द्यावे. निव्वळ कोकणासाठी जलसिंचन मंडळ नेमावे, अशी सूचना कृष्णराव धुळूप यांनी आज विधानसभेत केली. खार जमिनीची सुधारणा करण्याचे खातेही जलसिंचन मंत्र्यांकडेही देण्यात यावे, अशी सूचना करून ते म्हणाले की, कोकणात खाऱ्या पाण्याखाली ज्या जमिनी जातात, त्या वाचविल्या तरी कोकणात भरपूर तांदूळ उत्पादन होऊ शकेल.

नगरमध्ये प्रक्षोभ
कोपरगाव - अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत असलेल्या कुकडी धरण योजनेचा चौथ्या योजनेत समावेश न केल्याने जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे, असा इशारा नगर जिल्हा काँग्रेसच्या सभेत देण्यात आला.

पिके कोमेजली
श्रीरामपूर - मृगाचा थोडासा पाऊस झाल्यावर संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यात पावसाचा कोठे मागमूस नाही. मृगाच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पण भुईमूग, बाजरी आदी खरीप पिकांच्या पेरण्या केल्या पण पावसाअभावी आता शेतातील कोवळी खरीप पिके कोमेजू लागली आहेत. शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले असून परिस्थिती कठीण झाली आहे. शेतविहिरींनाही जेमतेमच पाणी आहे.
धनंजयराव गाडगीळ नियुक्त
नवी दिल्ली - प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ व पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. धनंजयराव गाडगीळ यांची नियोजन मंडळाच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.

तनखे बंद होणार
नवी दिल्ली - माजी संस्थानिकांचे तनखे आणि विशेषाधिकार रद्द करण्यासंबंधी अ. भा. काँग्रेस समितीने नुकसाच जो ठराव केला आहे तो या ना त्या स्वरूपात सरकार अमलात आणील, असे गृहमंत्री चव्हाण यांनी म्हणाले. विरोधकांच्याही टाळ्या घेत, विनोद करीत आणि वेळप्रसंगी काही विरोधकांना चिमटे घेत गृहमंत्र्यांनी लोकसभेत दोन तासांच्या चर्चेत स्पष्टच सांगून टाकले की सध्याच्या लोकशाही समाजवादाच्या दिवसांत संस्थानिकांचे तनखे ही बाब कालविपर्यस्त ठरते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज