जमिनी परत?
मुंबई - राज्य शेती महामंडळाकडे असलेल्या लहान जमीनमालकांच्या जमिनी त्यांना परत करण्याचा सरकारचा विचार आहे; परंतु तशाच स्वरुपाचे एक प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टाकडे असून त्याचा निकाल होईपर्यंत सरकारला याबाबत काही करणे शक्य नसल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब देसाई यांनी आज विधानसभेत सांगितले. शेती महामंडळाकडून काही चुका घडल्या असतील, परंतु त्या सुधारून महामंडळास यशस्वी करण्याचे सर्व प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.
कडक शिक्षा हवी
नवी दिल्ली - जीवनावश्यक वस्तू ठरवून दिलेल्या भावापेक्षा जास्त किंमतीने विकणाऱ्यांना कडक शिक्षा ठोठावण्याची तरतूद असलेला खास कायदा असला पाहिजे असे मत उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांनी आज व्यक्त केले. ते म्हणाले की अशा गुन्ह्यासाठी किमान दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा असली पाहिजे. नफेबाजांविरुद्ध कठोर उपाय योजल्याशिवाय भाववाढ रोखता येणार नाही या मताशी मी सहमत आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या कार्यकारिणीत ते बोलत होते.
जोगीन शिखर सर
नवी दिल्ली - कोकिळा मेहता व लकपा शेरपानी या पुण्याच्या गिर्यारोहक तुकडीच्या दोन महिलांनी २०,०६५ फूट उंचीचे जोगीन ३ हे शिखर सर केले आहे. गंगोत्री परिसरातील हे शिखर आतापर्यंत कोणीही सर केले नव्हते असे मानण्यात येते.
चीनकडून मानहानी
पेकिंग - चीन सरकारने हद्दपार केलेले भारतीय अधिकारी के. रघुनाथ आणि पी. विजय हे आज हाँगकाँगला जाण्यासाठी पेकिंग विमानतळावर आले असता तेथे जमलेल्या शेकडो लाल रक्षकांनी त्याना घेरले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भारताने या प्रकाराचा तीव्र निषेध चीनकडे नोंदवला आहे.
सक्तीचे धर्मांतर?
नवी दिल्ली - परकीय वा भारतीय मिशनऱ्यांनी दुष्काळग्रस्त विभागातील संकटात सापडलेल्या लोकांना अन्न व वस्त्र देऊ करून त्यांना त्यांचा धर्म बदलण्यास भाग पाडणे हे अयोग्य ठरेल, असे गृहखात्याचे राज्यमंत्री विद्याचरण शुक्ल यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी सांगितले. हे कृत्य बेकायदा मानले जाईल आणि कडक उपाय योजना केली जाईल, असेही ते म्हणाले.
मुंबई - राज्य शेती महामंडळाकडे असलेल्या लहान जमीनमालकांच्या जमिनी त्यांना परत करण्याचा सरकारचा विचार आहे; परंतु तशाच स्वरुपाचे एक प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टाकडे असून त्याचा निकाल होईपर्यंत सरकारला याबाबत काही करणे शक्य नसल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब देसाई यांनी आज विधानसभेत सांगितले. शेती महामंडळाकडून काही चुका घडल्या असतील, परंतु त्या सुधारून महामंडळास यशस्वी करण्याचे सर्व प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.
कडक शिक्षा हवी
नवी दिल्ली - जीवनावश्यक वस्तू ठरवून दिलेल्या भावापेक्षा जास्त किंमतीने विकणाऱ्यांना कडक शिक्षा ठोठावण्याची तरतूद असलेला खास कायदा असला पाहिजे असे मत उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांनी आज व्यक्त केले. ते म्हणाले की अशा गुन्ह्यासाठी किमान दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा असली पाहिजे. नफेबाजांविरुद्ध कठोर उपाय योजल्याशिवाय भाववाढ रोखता येणार नाही या मताशी मी सहमत आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या कार्यकारिणीत ते बोलत होते.
जोगीन शिखर सर
नवी दिल्ली - कोकिळा मेहता व लकपा शेरपानी या पुण्याच्या गिर्यारोहक तुकडीच्या दोन महिलांनी २०,०६५ फूट उंचीचे जोगीन ३ हे शिखर सर केले आहे. गंगोत्री परिसरातील हे शिखर आतापर्यंत कोणीही सर केले नव्हते असे मानण्यात येते.
चीनकडून मानहानी
पेकिंग - चीन सरकारने हद्दपार केलेले भारतीय अधिकारी के. रघुनाथ आणि पी. विजय हे आज हाँगकाँगला जाण्यासाठी पेकिंग विमानतळावर आले असता तेथे जमलेल्या शेकडो लाल रक्षकांनी त्याना घेरले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भारताने या प्रकाराचा तीव्र निषेध चीनकडे नोंदवला आहे.
सक्तीचे धर्मांतर?
नवी दिल्ली - परकीय वा भारतीय मिशनऱ्यांनी दुष्काळग्रस्त विभागातील संकटात सापडलेल्या लोकांना अन्न व वस्त्र देऊ करून त्यांना त्यांचा धर्म बदलण्यास भाग पाडणे हे अयोग्य ठरेल, असे गृहखात्याचे राज्यमंत्री विद्याचरण शुक्ल यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी सांगितले. हे कृत्य बेकायदा मानले जाईल आणि कडक उपाय योजना केली जाईल, असेही ते म्हणाले.