अ‍ॅपशहर

२० जून २०१६

ज्या लोकांजवळ सोन्याचे छुपे साठे आहेत, त्यांनी ते देशाच्या उपयोगासाठी दिले असते तर कदाचित अवमूल्यनाची पाळी आली नसती, असे उद‍्गार अर्थमंत्री सचिंद्र चौधरी यांनी येथे काढले. सुवर्णनियंत्रणामुळे देशाचा फायदा झाला आहे. ज्यांच्याजवळ सोन्याचे छुपे साठे आहेत तेच लोक सुवर्णनियंत्रण रद्द करण्याची मागणी करीत आहेत, असे श्री. चौधरी म्हणाले.सुवर्णनियंत्रणामुळे सुमारे पाच लाख सुवर्णकार बेकार बनले. पण गेल्या साडेतीन वर्षांत त्यांनी अन्य व्यवसाय पत्करले. आता एकदम सोन्यावरील निर्बंध दूर केले तर, आमचा पिढीजात व्यवसाय काढून घेतला का, असे ते सरकारला विचारतील व त्यात गैर काही नाही, असे ते म्हणाले.

Maharashtra Times 20 Jun 2016, 12:55 am
छुपे सोने आणि अवमूल्यन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 june 1966
२० जून २०१६


हैदराबादः ज्या लोकांजवळ सोन्याचे छुपे साठे आहेत, त्यांनी ते देशाच्या उपयोगासाठी दिले असते तर कदाचित अवमूल्यनाची पाळी आली नसती, असे उद‍्गार अर्थमंत्री सचिंद्र चौधरी यांनी येथे काढले. सुवर्णनियंत्रणामुळे देशाचा फायदा झाला आहे. ज्यांच्याजवळ सोन्याचे छुपे साठे आहेत तेच लोक सुवर्णनियंत्रण रद्द करण्याची मागणी करीत आहेत, असे श्री. चौधरी म्हणाले.सुवर्णनियंत्रणामुळे सुमारे पाच लाख सुवर्णकार बेकार बनले. पण गेल्या साडेतीन वर्षांत त्यांनी अन्य व्यवसाय पत्करले. आता एकदम सोन्यावरील निर्बंध दूर केले तर, आमचा पिढीजात व्यवसाय काढून घेतला का, असे ते सरकारला विचारतील व त्यात गैर काही नाही, असे ते म्हणाले.

नगर जिल्ह्यात संकरित पीक

नगरः नगर जिल्ह्यात चालू वर्षी १ लाख ७ हजार ५०० एकर क्षेत्रांत संकरित बियाणे वापरून उत्पादनवाढ करण्याचा कार्यक्रम जिल्हा परिषद शेतकी खात्याने आयोजित केला आहे. त्यानुसार ६७ हजार एकर क्षेत्रात ज्वारीचे, ३० हजार एकर क्षेत्रात बाजरीचे व पाच हजार एकर क्षेत्रात मेक्सिकन गव्हाचे बियाणे शेतकऱ्यांना पुरविले जाणार आहे.

संकरित पीक फसले

सोलापूरः उन्हाळी पीक मोहिमेनुसार सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी संकरित मक्याचे व ज्वारीचे पीक घेण्यात आले होते. पण बऱ्याच ठिकाणी हे पीक फसल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यात बियाण्यासाठी एकूण ९५ एकरात संकरित ज्वारी लावण्यात आली होती. तेथे सत्तर टक्के हा प्रयोग यशस्वी झाल्याचे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या अंदाजानुसार पन्नास टक्के यशस्वी झाला आहे.

कुटुंबनियोजन बैठक

नवी दिल्लीः विद्यापीठातून कुटुंबनियोजन विभाग स्थापन करण्यात यावेत, प्रागतिक व्यावसायिकांच्या सहाय्याने कुटुंब नियोजन सेवेची शाखा प्रत्येक विद्यापीठात असावी, अशी सूचना राजस्थान सरकारने केली आहे. मध्यवर्ती कुटुंब नियोजनाची बैठक २७ जून रोजी बंगलोर येथे आहे. कायद्याने मुलींसाठी विवाह वयोमर्यादा १८ पर्यंत वाढवावी म्हणजे जननसंख्या कमी होईल. त्यामुळे, माता व बालकाचे आरोग्य सुधारेल असेही सुचविण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज