काँग्रेस श्रेष्ठींवर टीका
नवी दिल्ली - आजपासून येथे सुरू झालेल्या अ. भा. काँग्रेस महासमितीच्या बैठकीत अनेक प्रतिनिधींनी काँग्रेस श्रेष्ठींवर टीकेची झोड उठविली. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाला जे प्रचंड हादरे बसले त्याचा सारा दोष अध्यक्ष कामराज यांनी आपल्याकडे घेतला तर उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांनी नेत्यांची नालस्ती करून एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढणाऱ्या प्रतिनिधींची हजेरी घेतली.
मराठी खासदार
नवी दिल्ली - महाराष्ट्रातून निवडून आलेल्या काँग्रेस सदस्यांनी आज पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची भेट घेतली व अर्थसंकल्पात यंत्रमागांवर वाढवण्यात आलेली जकात, सहकारी साखर उद्योगातील पेचप्रसंग, राज्यातील अन्नपरिस्थिती आणि कापूसभाव याविषयी त्यांच्याशी चर्चा केली.
तनुजावर आरोप
मुंबई - बेफाम व बेदरकार मोटार हाकल्याचा (मात्र सदोष मनुष्यवधाचा नाही) व मोटार अपघातात मरण पावलेल्यांना वैद्यकीय मदत मिळवून न दिल्याचा आरोप वांद्रे कोर्टाचे प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट जी. डी. जोशी यांनी चित्रतारका तनुजा कुमारसेन समर्थ यांच्यावर ठेवला आहे.
१०० कारखाने बंद
कोल्हापूर - इंजिनियरिंग धंद्यातील मंदीमुळे निर्माण झालेल्या वाढत्या बेकारीवर विचार करण्याकरिता दक्षिण महाराष्ट्रातील इंजिनियरिंग कामगारांची परिषद जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात कोल्हापुरास भरेल. कोल्हापूर कारखानदारीत ४५०० कामगार असून पैकी दोन हजार मंदीमुळे बेकार झाले.
नवी दिल्ली - आजपासून येथे सुरू झालेल्या अ. भा. काँग्रेस महासमितीच्या बैठकीत अनेक प्रतिनिधींनी काँग्रेस श्रेष्ठींवर टीकेची झोड उठविली. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाला जे प्रचंड हादरे बसले त्याचा सारा दोष अध्यक्ष कामराज यांनी आपल्याकडे घेतला तर उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांनी नेत्यांची नालस्ती करून एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढणाऱ्या प्रतिनिधींची हजेरी घेतली.
मराठी खासदार
नवी दिल्ली - महाराष्ट्रातून निवडून आलेल्या काँग्रेस सदस्यांनी आज पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची भेट घेतली व अर्थसंकल्पात यंत्रमागांवर वाढवण्यात आलेली जकात, सहकारी साखर उद्योगातील पेचप्रसंग, राज्यातील अन्नपरिस्थिती आणि कापूसभाव याविषयी त्यांच्याशी चर्चा केली.
तनुजावर आरोप
मुंबई - बेफाम व बेदरकार मोटार हाकल्याचा (मात्र सदोष मनुष्यवधाचा नाही) व मोटार अपघातात मरण पावलेल्यांना वैद्यकीय मदत मिळवून न दिल्याचा आरोप वांद्रे कोर्टाचे प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट जी. डी. जोशी यांनी चित्रतारका तनुजा कुमारसेन समर्थ यांच्यावर ठेवला आहे.
१०० कारखाने बंद
कोल्हापूर - इंजिनियरिंग धंद्यातील मंदीमुळे निर्माण झालेल्या वाढत्या बेकारीवर विचार करण्याकरिता दक्षिण महाराष्ट्रातील इंजिनियरिंग कामगारांची परिषद जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात कोल्हापुरास भरेल. कोल्हापूर कारखानदारीत ४५०० कामगार असून पैकी दोन हजार मंदीमुळे बेकार झाले.