उपासमारीने १८ मृत्यु
कलकत्ताः गेल्या सहा महिन्यांत प. बंगालातील पुरुलिया जिल्ह्यातील एक डझन खेड्यात निदान १८ माणसे तरी उपासमारीने मृत्यु पावली, अशी माहिती त्या जिल्ह्यातील लोकसेवक संघाचे चिटणीस अरुणचंद्र घोष यांनी वार्ताहरांना मुलाखत देताना सांगितली. श्री. घोष यांनी मृतांची नावे व पत्ते सादर केले व सांगितले की १८ मृतांपैकी १६ जणांबद्दल आम्ही खात्री करून घेतली आहे. त्याशिवाय आणखी अनेक माणसे उपासमारीमुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर बसली आहेत.
शंकराचार्य यांची सुटका
जगन्नाथपुरीः गेल्या २२ नोव्हेंबरपासून प्रतिबंधक स्थानबद्धतेत असलेले गोवर्धन पीठाचे श्री. जगतगुरू शंकराचार्य यांची आज सायंकाळी येथे सुटका करण्यात आली. गोहत्याबंदीसाठी श्री. शंकराचार्य २० नोव्हेंबरपासून उपोषण करीत आहेत. गोहत्या बंदी करण्यासाठी केंद्र सरकार जोपर्यंत राज्यघटनेत दुरुस्ती करीत नाहीत तोपर्यंत आपले, उपोषण काळात आपण गोवर्धन मठातच वास्तव्य करू आणि कोणत्याही सभेत किंवा मेळाव्यात भाषण करणार नाही.
जबाबदारीची जाणीव
औरंगाबादः वैयक्तिक आणि सामाजिक हक्काबरोबर येणाऱ्या जबाबदारीची जाणीव आज नष्ट झाली आहे. सामाजिक आणि वैयक्तिक नीतीआदर्श नष्ट झाले आहेत. नवनिर्मितीसाठी तपश्चर्येची आवश्यकता आहे याचा विसर पडला आहे. विवेक आणि विचार यांचा सांधा ढळलेला आहे आणि यामुळेच आज मानव उठाव करण्यास प्रवृत्त झाला आहे, अशी मीमांसा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी "बंडखोर जमाव मानव आणि सामाजिक नीति" या विषयावर बोलताना केली. स्नेह विकास मंडळातर्फे आयोजित केलेल्या या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी प्रा. भगवन्त देशमुख होते.
कोकणातील वसुली तहकूब
रत्नागिरीः रत्नागिरी जिल्ह्यातील वादळग्रस्त गावातील शेतसारा वसुली तहकूब केली असल्याचे महसूलमंत्री राजाराम बापू पाटील यांनी आज येथे जाहीर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या कचेरीत भरलेल्या बैठकीत त्यांनी वरील घोषणा केली. या वादळाचा ६२५ गावांना तडाखा बसला व ३४ माणसे मरण पावली.
भारत पाक प्रश्न
लंडनः काश्मीरसकट सर्व भारत-पाक तंट्यावर मला तोडगा हवा आहे परंतु आगामी फेब्रुवारीत भारतात सार्वत्रिक निवडणुका होऊन तेथे स्थिर सरकार येईपर्यंत तशी शक्यता दिसत नाही असे पाकिस्तानचे अध्यक्ष अयुबखान यांनी ब्रिटिश सरकारला सांगितले असल्याचे समजते.
कलकत्ताः गेल्या सहा महिन्यांत प. बंगालातील पुरुलिया जिल्ह्यातील एक डझन खेड्यात निदान १८ माणसे तरी उपासमारीने मृत्यु पावली, अशी माहिती त्या जिल्ह्यातील लोकसेवक संघाचे चिटणीस अरुणचंद्र घोष यांनी वार्ताहरांना मुलाखत देताना सांगितली. श्री. घोष यांनी मृतांची नावे व पत्ते सादर केले व सांगितले की १८ मृतांपैकी १६ जणांबद्दल आम्ही खात्री करून घेतली आहे. त्याशिवाय आणखी अनेक माणसे उपासमारीमुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर बसली आहेत.
शंकराचार्य यांची सुटका
जगन्नाथपुरीः गेल्या २२ नोव्हेंबरपासून प्रतिबंधक स्थानबद्धतेत असलेले गोवर्धन पीठाचे श्री. जगतगुरू शंकराचार्य यांची आज सायंकाळी येथे सुटका करण्यात आली. गोहत्याबंदीसाठी श्री. शंकराचार्य २० नोव्हेंबरपासून उपोषण करीत आहेत. गोहत्या बंदी करण्यासाठी केंद्र सरकार जोपर्यंत राज्यघटनेत दुरुस्ती करीत नाहीत तोपर्यंत आपले, उपोषण काळात आपण गोवर्धन मठातच वास्तव्य करू आणि कोणत्याही सभेत किंवा मेळाव्यात भाषण करणार नाही.
जबाबदारीची जाणीव
औरंगाबादः वैयक्तिक आणि सामाजिक हक्काबरोबर येणाऱ्या जबाबदारीची जाणीव आज नष्ट झाली आहे. सामाजिक आणि वैयक्तिक नीतीआदर्श नष्ट झाले आहेत. नवनिर्मितीसाठी तपश्चर्येची आवश्यकता आहे याचा विसर पडला आहे. विवेक आणि विचार यांचा सांधा ढळलेला आहे आणि यामुळेच आज मानव उठाव करण्यास प्रवृत्त झाला आहे, अशी मीमांसा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी "बंडखोर जमाव मानव आणि सामाजिक नीति" या विषयावर बोलताना केली. स्नेह विकास मंडळातर्फे आयोजित केलेल्या या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी प्रा. भगवन्त देशमुख होते.
कोकणातील वसुली तहकूब
रत्नागिरीः रत्नागिरी जिल्ह्यातील वादळग्रस्त गावातील शेतसारा वसुली तहकूब केली असल्याचे महसूलमंत्री राजाराम बापू पाटील यांनी आज येथे जाहीर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या कचेरीत भरलेल्या बैठकीत त्यांनी वरील घोषणा केली. या वादळाचा ६२५ गावांना तडाखा बसला व ३४ माणसे मरण पावली.
भारत पाक प्रश्न
लंडनः काश्मीरसकट सर्व भारत-पाक तंट्यावर मला तोडगा हवा आहे परंतु आगामी फेब्रुवारीत भारतात सार्वत्रिक निवडणुका होऊन तेथे स्थिर सरकार येईपर्यंत तशी शक्यता दिसत नाही असे पाकिस्तानचे अध्यक्ष अयुबखान यांनी ब्रिटिश सरकारला सांगितले असल्याचे समजते.