अ‍ॅपशहर

५० वर्षांपूर्वी

करंजवण धरणनासिक - येवले, निफाड आणि दिंडोरी तालुक्यातील काही भाग कित्येक वर्षे दुष्काळात पोळून निघत आहे...

Maharashtra Times 28 Jun 2018, 4:00 am

करंजवण धरण

नासिक - येवले, निफाड आणि दिंडोरी तालुक्यातील काही भाग कित्येक वर्षे दुष्काळात पोळून निघत आहे. करंजवण धरणाच्या परिपूर्तीनंतर या भागाचा संपूर्ण कायापालट होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आज या धरणाचे भूमिपूजन करताना व्यक्त केला. श्री. चव्हाण म्हणाले की या तीन तालुक्यांची दुर्दशा पाहून या भागास करंजवण धरण दिले जाईल, असे आश्वासन काही वर्षांपूर्वी दिले होते.

फेरीवाल्यांची निदर्शने

मुंबई - महापालिकेने न्याय द्यावा, या मागणीकरिता फेरीवाल्यांनी आज निदर्शने केली. सतत पाऊस पडत असतानाही सुमारे अडीच हजार फेरीवाल्यांनी या निदर्शनात भाग घेतला. 'बॉम्बे हॉकर्स युनियन'च्या नेतृत्वाखाली ही निदर्शने झाली. मुंबईत सध्या १ लाख ७५ हजार फेरीवाले असून वाढत्या बेकारीमुळे त्यांना हा धंदा करावा लागत असल्याचे युनियनच्या निवेदनात म्हटले आहे.

आर्थिक समस्यांवर मते

बंगलोर - काँग्रेस अध्यक्ष एस. निजलिंगप्पा यांनी उद्योगधंदे व रोजगार आणि सर्वसाधारणतः आर्थिक क्षेत्र यांतील समस्यांबाबत नामवंत व तज्ज्ञ व्यक्तींकडून मते मागवली आहे.

मुंबईत पोलिओ

मुंबई - गेल्या दीड दोन महिन्यात मुंबईत १७७ मुलांना पोलिओची लागण झाल्याचे महापालिका शासक ज. ह. पटवर्धन यांनी आज महापालिकेच्या बैठकीत सांगितले.

दंगलग्रस्तांना कर्ज

नागपूर - अलीकडच्या दंगलीत ज्या व्यापारी व दुकानदारांच्या दुकानांची मोडतोड झाली, त्यांना पुनर्वसनासाठी राज्य सरकार कर्ज देईल, असे कलेक्टर एस. जी. सुराडकर यांनी सांगितले. ज्या घरांची हानी झाली, त्या घरांच्या दुरुस्तीसाठी मदतवाटपाचे काम पूर्ण झाले आहे.

(२८ जून १९६८च्या अंकातून)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज