अ‍ॅपशहर

पन्नास वर्षे: शनिवार २४ फेब्रु

शनिवार २४ फेब्रुवारी १९६८कच्छ निवाडा शिरोधार्यनवी दिल्ली कच्छ आंतरराष्ट्रीय मंडळाचा निवाडा भारत शिरोधार्य मानील, असे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ...

Maharashtra Times 24 Feb 2018, 3:43 am
शनिवार २४ फेब्रुवारी १९६८
महाराष्ट्र टाइम्स.कॉम saturday 24 february
पन्नास वर्षे: शनिवार २४ फेब्रु


कच्छ निवाडा शिरोधार्य

नवी दिल्ली कच्छ आंतरराष्ट्रीय मंडळाचा निवाडा भारत शिरोधार्य मानील, असे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आज संसदेत स्पष्टपणे सांगितले. राष्ट्रपतींच्या भाषणावरील चर्चेचा समारोप करताना श्री. गांधी म्हणाल्या की, आम्ही स्वाभाविकपणे आमचा शब्द पाळू. आंतरराष्ट्रीय अभिवचनांचा सन्मान करणे ज्या दिवशी आपल्याला शक्य होणार नाही तो दिवस दुःखद मानावा लागेल असे मला वाटते.

भावी चित्र आशादायक

नवी दिल्ली चालू आर्थिक वर्षाचा उपपंतप्रधानांनी आज संसदेत सादर केलेला आढावा भविष्याबद्दल आशा निर्माण करणारा आहे. गेली दोन वर्षे लागोपाठ दुष्काळांमुळे तंग झालेली आर्थिक परिस्थिती आता सुधारत आहे, असे या आढाव्यात म्हटले आहे.

शेतकऱ्यांची चैन

कोल्हापूर शेतकऱ्यांनी आज मिळालेला पैसा शेतीसाठी भांडवल म्हणून खर्च केला पाहिजे. पण दुर्दैवाने आज शेतकरी तेजीमुळे आलेला ६५ टक्के पैसा चैनीसाठी खर्च करतो, असे वारणा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वनाथराव कोरे यांनी सांगितले. यावेळी, गेल्या शंभर पिढ्या खेड्यांचा खुंटलेला विकास शेतकऱ्यांनी आळस टाकून शेतात बारा तास काम करण्याची तयारी ठेवली तरच दूर होईल, असे राज्य परिवाहन व घरबांधणी मंत्री यशवंतराव मोहिते म्हणाले.

गारांमुळे हानी

नागपूर नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांच्या काही भागात नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे किती नुकसान झाले याची चौकशी करण्याचे आदेश नागपूर विभागीय कमिशनरानी अधिकाऱ्यांना दिले आहेत. या गारपिटीमुळे गहू, जवस, पपई व भाजीपाला यांचे प्रामुख्याने नुकसान झाले आहे.

मेहनतीचे शेतमळे

जळगाव आपल्या मेहनतीने पडीत जमिनीत शेतमळे उभारणारे निवृत्त सैनिक व भूमिहीन शेतमजुरांनी येथून जवळच असलेल्या आडगाव या गावी इतिहास घडविला आहे. जळगावपासून ३२ मैलांवर असलेल्या आडगाव या तीन हजार वस्तीच्या छोटेखानी गावी जवळील पडीत जमीन, सुमारे ५५३ एकर, शासनाने भूमीहीन, शेतमजूर, बौद्ध, निवृत्त सैनिक आणि फासेपारधी या लोकांच्या सहकारी संस्थेस लागवडीसाठी दिली. त्यापैकी ११९ एकर २० भूमिहीन कुटुंबीयांना देण्यात आली. त्यांनी अत्यंत मेहनतीने जमिनीचे रूप पालटून टाकले आणि त्यात हायब्रीड ज्वारी, मिरची, कपाशी वगैरे पेरून भरघोस पीक घेतले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज