सध्या वैशाख शुक्ल तिथी सुरू झाली आहे. उन्हाळ्यात फळांचा राजा आंबा याला विशेष महत्व आहे. अक्षय्य तृतीयेला आंबे खाण्याची सुरवात केली जाते अशी परंपरा आहे. आंबा सर्वांचा आवडचा तसाच देवी देवतांचा देखील आवडता असावाच. तेव्हाच तर आमराईत हे सर्व देवता जणू त्यांच्या असण्याची प्रचिती देत विशेष लक्षवेधी ठरत आहेत.
करोनाच्या या लाटांमध्ये सर्वांना विराम लागला आहे. मंदिरे देखील बंद ठेवण्यात आले आहे. अशात भाविकांना आपल्या देवांच्या दर्शनाची आतुरता असली तरी मंदिरात जाणं शक्य नसल्या कारणाने ते शक्य नाही. परंतु पुजारी सेवेकरी परंपरेनुसार सणांना आणि रोजच्या पूजेला टळू देत नाही आहे. कमी सेवेकरी पूजेकरी आपल्या देवांची नित्य पूजा पाठ करत आहे. अशात सध्या आंब्याचा सिझन असल्या कारणाने या देवतांना आमराईची नयनरम्य आरासाची सजावट करण्यात आली आणि आंब्याचा नैवेद्य दाखवण्यात आला आहे. सोशल माध्यमांद्वारे आपण आमराईतला देवांचा हा थाट पाहू शकता.
आज विनायक चतुर्थी आहे. त्यात भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला अशा आकर्षक आरासात पाहून त्यांचे दर्शन घेतल्यास खरा दर्शनाचा लाभ आणि आशिर्वाद मिळाला असंच वाटेल. पुण्याचा लालबाग असो वा आपला सिद्धीविनायक सर्व बाप्पांना असंच आमराईच्या थाटात आंब्याचा नैवेद्य ठेवण्यात आला आहे. सोशल माध्यमांद्वारे तुम्ही आमराईतल्या बाप्पांचे दर्शन घेऊ शकतात.
श्री स्वामी समर्थ यांना आमराईत पाहतांना भक्तांचे त्यांच्या सेवेकऱ्यांचे मन तृप्त, समाधानी झाले असेल यात शंका नाही. या आकर्षक आरासात आमराईत श्री स्वामी समर्थांचे रूप अधिकच खुलून दिसतं आहे. एखाद्या मळ्यात जसा निसर्गाचा श्रृंगार तसा स्वामींचा तेजोमय प्रकाश भवताल व्यापून टाकतो आहे.
पंढरपूरला विठ्ठल रूक्मिणी मंदिरात कधी फुलांची तर कधी विविध फळांची सजावट पहायला मिळत असते. अक्षय्य तृतीयेला विठ्ठल रूक्मिणीच्या गाभाऱ्यात आणि मंदिरात नयनरम्य व आकर्षक अशी आमराईची आरास करण्यात आली. पुण्याचे भक्त विनायक कांची यांनी ही सेवा दिली आहे. साडे सहा हजार हापूस आंब्यांचा वापर करून ही आरास करण्यात आली आहे. आंब्यांसोबत डाळिंब, फणस, सफरचंद, मोसंबी, कलिंगड, खरबूज या मोसमी फळांच्या साहाय्याने ही आरास करण्यात आली.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई म्हणजेच कोल्हापूरची महालक्ष्मी या आमराईत अधीकच देखणी दिसते आहे. भाविकांना जरी जवळून दर्शन घेणं शक्य नसलं तरी सोशल माध्यमांद्वारे दर्शनाचा लाभ घेऊ शकता.
साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य १६ मे ते २२ मे २०२१ : 'या' राशीतील व्यक्तींच्या भाग्यात धनलाभ