अभिनेता अक्षय कुमार आज बॉलिवूडच्या टॉप स्टार्सपैकी एक आहे. त्याचा सिनेमा हिट झाला नाही, असं सहसा होत नाही. या स्टारला स्टारचं वलय कोणी मिळवून दिलं माहितीय?... पाहा.
अक्षय आज यशाच्या ज्या शिखरावर आहे, त्यासाठी त्याची स्वत:ची मेहनत तर आहेच पण आणखी एक व्यक्ती यामागे आहे, तिचं नाव आहे केशू रामसे. केशू रामसे यांनी अक्षयसोबत एक-दोन नव्हे तर १३ सिनेमे बनवले!
अक्षयला 'मि. खिलाडी' म्हणून ओळखलं गेलं ते केशू रामसेंमुळेच. 'खिलाडी' मालिकेतले सगळे सुपरहिट सिनेमे केशू यांनी अक्षयला घेऊन बनवले. संघर्षाच्या काळात अक्षयला या सिनेमांनी तारलं आणि तो यशस्वी स्टार बनला.
हे तेच भुताचे सिनेमे बनवणाऱ्या रामसे बंधूवाल्यांपैकी एक असलेले केशू रामसे. त्यांच्या मोठ्या भावाने तुलसी रामसे यांनी २०१० मध्ये अहमदाबाद मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, 'केशूने अक्षयला कठीण काळात साथ दिली. पण जेव्हा केशूचा कठीण काळ सुरू होता, तेव्हा अक्षयने मदत केली नाही. केशूचे नंतरचे सिनेमे फ्लॉप झाल्याने तो अडचणीत होता. पण अक्षय धावून आला नाही.'
रामसेंसंदर्भातल्या तुलसी रामसेंच्या आरोपात किती तथ्य आहे सांगता येत नाही. मात्र केशूंचं अक्षयच्या यशातलं योगदान नाकारता येणार नाही.
आज अक्षयला सिने इंडस्ट्रीत दोन दशकांहून अधिक काळ झाला आहे. त्याच्या यशाचा आलेख वाढतच आहे.