सायरस मिस्त्रींचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. याआधी अनेक बॉलिवूड स्टार्सच्या कारला अपघात होऊन थोडक्यात त्यांचा जीव वाचला होता.
परदेस सिनेमातून पॉप्युलर झालेली अभिनेत्री महिमा चौधरी एका सिनेमाचं शूटिंग करत असताना ट्रकच्या धडकेत तिच्या कारला अपघात झाला होता. या अपघातात तिचा चेहरा अतिशय खराब झाला होता. तिची सर्जरी केल्यानंतर तिच्या चेहऱ्यातून काचेचे तब्बल ६७ तुकडे बाहेर काढण्यात आले होते.
अभिनेत्री अनु अग्रवालला १९९० मध्ये रिलीज झालेल्या आशिकी सिनेमातून पॉप्युलॅरिटी मिळाली होती. मुंबई-पुणे हायवेवर तिचा भयंकर अपघात झाला होता. या अपघातानंतर ती अनेक दिवसांपर्यंत कोमामध्ये गेली होती. तिची स्मृतीही गेली होती. या अपघातातून बरं होण्यासाठी तिला कित्येक वर्ष गेली.
ड्रिम गर्ल हेमा मालिनी काही वर्षांपूर्वी राजस्थानच्या करोलीमधून जयपूरला जात होत्या. त्यावेळी त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात थोडक्यात त्या बचावल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या होत्या, त्यामुळे त्यांना टाकेही पडले होते.
२०२० मध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन शबाना आजमी खंडाळ्याला जात होत्या. त्यावेळी रस्त्यात त्यांच्या कारची एक ट्रकला मोठी धडकी बसली. या रस्ते अपघातात त्यांचा जीव थोडक्यात वाचला होता, त्यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या होत्या.
२०१४ मध्ये वरुण धवन आणि आलिया भट्ट आपल्या हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अहमदाबादला जात होते. त्यावेळी पोलिसांची एका गाडी सिग्नलवर त्यांच्या कारला धडकली होती. ही धडक इतकी भयंकर होती, की वरुण-आलियाच्या कारचा मागचा भाग तुटला होता. यात दोघांना इजा झाली नव्हती.
सायरस मिस्त्रींच्या निधनानंतर दिग्दर्शक हंसल मेहता यांनी सोशल मीडियावर त्यांचा एक अनुभव शेअर केला. ३० वर्षांपूर्वी फिजी आयर्लंडमध्ये त्यांचा अपघात झाला होता. कार रस्त्यावरुन एका दरीत कोसळली होती. या अपघातात कार पूर्णपणे डॅमेज झाली होती होती, पण सीट बेल्ट लावल्याने दुर्घटनेतून बचाव झाल्याचं त्यांनी सांगितलं.
पॉप्युलर कॉमेडिअन आणि अभिनेता सुनिल ग्रोवरच्या कारलाही मुंबई - बेलापूर हायवेवर अपघात झाला होता. त्याची कार दुसऱ्या कारला धडकली होती. कारचा टायर फुटल्याने सुनिलची कार अनियंत्रित झाली होती. या अपघातात त्याला कोणतीही इजा झाली नव्हती.