कलर्स मराठीवरील 'घाडगे & सून' या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांना आपलंसं केलं आणि आता या मालिकेनं नुकताच ५०० भागांचा पल्ला गाठला.
५०० भाग पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सगळ्या टीमने सेटवर केक कापून, सेल्फी काढून याचा आनंद साजरा केला.
चिन्मय उदगीरकर आणि भाग्यश्री लिमये यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही मालिका सुरू झाल्यापासूनच उत्तम कथानक, कलाकार यांमुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.
आता मालिकेमध्ये एक नवं वळण येणार असून घाडगे सदन मध्ये आणखी एक घटना घडणार आहे ज्यामुळे अक्षय, अमृता आणि कियाराचे आयुष्य बदलणार आहे.
या मालिकेच्या रूपानं आम्हाला एक दुसरं कुटुंबच मिळालंय. आमच्या टीममध्ये पहिल्या दिवसापासून जे बॉण्डिंग आहे, ते आजपर्यंत कायम आहे.असं मालिकेचा नायक 'अक्षय' म्हणजेच चिन्मय उदगीरकर सांगतो.