'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेनं नुकताच ५०० भागांचा पल्ला गाठला आहे.
मालिकेमधील अनु आणि सिध्दार्थच्या जोडीला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळत आहे.मालिकेचं हे यश सगळ्या कलाकारांनी, खूप उत्साहात आणि आनंदात साजरा केलं.
मालिकेमध्ये सिध्दार्थला अनु आणि घरच्या सदस्यांकडून एक खास सरप्राईझ मिळणार आहे.
अनु आणि सिध्दार्थच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल घरामध्ये मोठं सेलिब्रेशन देखील होणार आहे.
केक कापण्यात आला.. सेल्फी देखील काढला... सरकारनं आखून दिलेल्या नियमांचं पालन करत, सोशल डिस्टन्सिंगचं पालन आणि योग्य ती काळजी घेत मालिकेच्या सेटवर ५०० भागांचा हा क्षण उत्साहात साजरा केला गेला.