वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीवरून सुरू असलेला वाद अद्याप कायम आहे. या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे.
एकीकडे वादामुळे ज्ञानवापी मशीद चर्चेत असतानाच आज या मशिदीसमोर शुक्रवारचा नमाज पठण करण्यासाठी मुस्लीम बांधवांनी मोठी गर्दी केली होती.
तब्बल ७०० जण नमाज पठण करण्यासाठी मशिदीसमोर पोहोचल्याने काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र नंतर प्रशासनाकडून या मशिदीचं गेट बंद करण्यात आलं.
मशीद परिसरात मोठी गर्दी झाल्याने नमाज पठण करण्यासाठी आलेल्या नागरिकांना दुसऱ्या मशिदीत जाण्याची विनंती करण्यात येत होती.
सुप्रीम कोर्टात आज मुस्लीम पक्षातर्फे आपलं म्हणणं मांडण्यात येणार आहे. या सुनावणीत नेमकं काय घडतं, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.