२३ वर्षांपूर्वी भारतीय सेनेने कारगिल युद्धात पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं होतं. ६० दिवस कारगिल युद्ध सुरू होतं. पाकिस्तानशी लढताना या युद्धात ५२७ जवान शहीद झाले होते.
तिरुअनंतपुरममध्ये कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. द विंची कलाकार सुरेश यांनी परमविर चक्र पुरस्कर्ते कॅप्टन विक्रम बत्रा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाण्याखाली रेखाटलेला त्यांचा फोटो तयार केला आहे.
काश्मीरमध्येही कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. श्रीनगरमधील झेलम नदीजवळ १९९९ मधीव कारगिल युद्ध विजय दिवसानिमित्त खास आर्मी बँड सादर करण्यात आला.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यमंत्री अजय भट्ट, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्यासह वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी, नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी. कुमार आणि संरक्षण सचिव अजय कुमार यांनी कारगिर विजयानिमित्त राष्ट्रीय युद्ध स्मारकावर श्रद्धांजली वाहिली.
कारगिल विजय दिवसानिमित्त राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ ट्राय-सर्विसेसकडून बँड सादरीकरण केलं.
राष्ट्रीय युद्ध स्मारकावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी श्रद्धांजली वाहिली.
तिन्ही दलाचे प्रमुख राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करताना....
युद्ध स्मारकावर राजनाथ सिंह...