या बारवेचे मनमोहक आणि सुंदर फोटो पाहून खरचं डोळे भरून येतात. रात्रीच्या वेळी लावलेल्या दिव्यांच्या रोशनाईत बारव ही अक्षरश: उजळून निघाली. या बारवेला आधीपासून धार्मिक महत्व आहे.
श्रमदानासाठी मोठ्या प्रमाणात युवकांनी आणि अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवल्यामुळे वालुर येथील बारवाने मोकळा श्वास घेतला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी दीपप्रज्वलन करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
सहजासहजी सर्व गोष्टी उपलब्ध झाल्यामुळे, नागरिकांनी दुर्लक्ष केल्यामुळे बारव अडगळीत पडले होते. याला धार्मिक महत्व म्हणजे यामध्ये देव असतात असा ग्रामस्थांचा समज आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळी बारवांची पूजा देखील केली जात होती.
पूर्वीच्या काळी गावाला पाणीपुरवठा करणारा एकमेव स्त्रोत म्हणून या बारवला ओळखले जात होते. मात्र, सर्वत्र विकास झपाट्याने झाल्याने घरोघरी बोर अशा पाल्यांच्या सुविधा उपलब्ध झाल्या.
रोशनाईत बारवेचे सौंदर्य अधिकच उजळून निघाले होते. परभणी जिल्ह्यामध्ये असलेले पुरातन बारवे वाचवण्यासाठी मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेमध्ये जिल्हाभरातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत आहेत. जिंतूर विधानसभा मतदार संघाचे आमदार मेघना बोर्डीकर यांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवून श्रमदान केले होते. तर वालुर येथील खोदकाम सुरू असताना उपविभागीय अधिकारी यांनी देखील सहभाग नोंदवून युवकांचा उत्साह वाढवला होता.
परभणी जिल्हयाची ओळख असलेल्या वालूर येथील 'स्टेपवेल' म्हणेज बारवची सोमवारी सायंकाळी महाआरतीसह दीपोत्सव करून गांवकरी मंडळींनी तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. महिला मुलांसह संपूर्ण गावाने आनंदोत्सव साजरा केला. उमेश राजवाडकर, जोशी बुवा, पाठक मामा यांनी विहिरीची विधीवत पूजा केली. सेलूचे तहसिलदार दिनेश झांपले, मंडळ अधिकारी माने, तलाठी निलेश पराचे, प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. सरपंच संजय साडेगांवकर यांच्यासह संपुर्ण गाव बारव्याजवळ हजर होता.