दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. यावेळी भारतीय संघाला पाच चुकांचा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. भारताला सलग १३ सामने जिंकण्याचा विश्वविक्रम या सामन्यात रचता आला असता. पण पराभवामुळे ही संधीही भारताने गमावली.
रिषभ पंतने या सामन्यात एक कर्णधार म्हणून निराश केले. हे भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण ठरले.
भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात चांगली सुरुवात केली होती. पण यावेळी कर्णधार पंतने अनावश्यक प्रयोग केले आणि त्यामुळे भारताला या सामन्यावर पकड कायम राखता आली नाही.
भारताने इशान किशनच्या अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेपुढे २१२ धावांचे मोठे आव्हान ठेवलो होते. पण त्यानंतर रिषभ पंतला गोलंदाजांना योग्य प्रकारे हाताळता आले नाही आणि हेदेखील पराभवाचे एक कारण ठरले.
रिषभ पंतने यावेळी पाचव्याच षटकात हार्दिक पंड्याला गोलंदाजीसाठी आणले आणि हीच त्याची मोठी चूक ठरली. या पाचव्या षटकात दक्षिण आफ्रिकेने तीन षटकार वसूल केले.
आयपीएलमध्ये युजवेंद्र चहल हा चांगल्या फॉर्मात होता. त्याचबरोबर या सामन्यातही त्याने आठव्या षटकात फक्त सहा धावा दिल्या होत्या. पण त्यानंतर पंतने त्याच्या गोलंदाजीचा वापरच केला नाही. चहलला त्यानंतर पंतने थेट शेवटचे षटक दिले आणि चहलवर अन्याय करत त्याचे ११ चेंडू वाया घालवले.