शिखर धवनकडे तर संघाचे कर्णधारपद दिले जाईल, असे म्हटले जात होते. आयपीएलमधील १३ सामन्यांमध्ये त्याने ४२१ धावा केल्या, पण तरीही त्याला संघात स्थान दिले नाही.
तिलक वर्मा हा मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीचा कणा ठरलेला आहे. त्याने सातत्याने फटकेबाजी करत ३९७ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर मोक्याच्या क्षणी त्याने मुंबईच्या संघाला सावरले आहे. पण तरीही त्याला भारतीय संघात संधी दिलेली नाही.
या आयपीएलमध्ये संजू सॅमसन हा धडाकेबाज फटेकबाजी करत आहे. त्याने या आयपीएलमध्ये चांगल्या धावा केल्या आहेत, त्याचबरोबर जबरदस्त यष्टीरक्षणही केले आहे. त्याचबरोबर दमदार नेतृत्व करत त्याने संघाला प्ले ऑफमध्ये पोहोचवले आहे, तरीही त्याला भारतीय संघात स्थान दिलेले नाही..
सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून खेळताना राहुल त्रिपाठीने दमदार खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिले आहेत. आतापर्यंत आयपीएलमध्ये त्याने ४१३ धावाही केल्या आहेत. पण तरीही तो भारतीय संघात स्थान मिळवण्यापासून वंचित राहिला आहे.
गुजरात टायटन्ससाठी एक दमदार सलामीवीर म्हणून शुभमन गिल समोर आला आहे. गिलने या हंगामात संघाला चांगली फलंदाजी करत ४०३ धावा केल्या आहेत. पण तरीही त्याला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही.