आयपीएलमध्ये एकदा एक गोष्ट पाहायला मिळाली होती जेव्हा गांगुली आणि कोलकाता यांच्या विरह पाहायला मिळाला होता. त्यावेळी कोलकाताच्या चाहत्यांमध्ये रोष होता.
आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाने गांगुलीला संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. त्यावेळी गांगुली आणि कोलकात्यामधील नाते पुन्हा एकदा नव्याने पाहायला मिळाले होते.
कोलकात्याच्या संघाचे तीन वर्षे गांगुलीला कर्णधारपद देण्यात आले होते. पण या तिन्ही वर्षांत केकेआरची कामगिरी चांगली झालेली पाहायला मिळाली नव्हती.
गांगुलीच्या नेतृत्वाखाली केकेआरच्या संघाला तीन वर्षात एकदाही बाद फेरीत पोहोचता आले नव्हते. त्यामुळे २०११ साली हंगाम सुरु होण्यापूर्वी गांगुलीला संघाच्या कर्णधारपदावरून दूर करण्यात आले आहे.
भारताने २०११ साली विश्वचषक जिंकला होता. या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत गौतम गंभीरने दमदार फलंदाजी केली होती. त्यामुळे गांगुलीला कर्णधारपदावरून दूर करत संघाची कमान गंभीरच्या हाती सोपवण्यात आली होती.
हा केकेआरच्या संघासाठी मोठा धक्का होता. कारण त्यांना गेल्या तीन वर्षांमध्ये गांगुलीच्या नेतृत्वाची सवय झाली होती. आता गंभीर संघाचे नेतृत्व कसे करणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती.
गंभीरकडे नेतृत्व आल्यावर संघाची कामगिरी सुधारलेली पाहायला मिळाली होती. कारण २०१२ साली गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने पहिल्यांदाच जेतेपदाला गवसणी घातली होती.
गंभीरच्याच नेतृत्वाखाली केकेआरने २०१४ साली दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. त्यामुळे गांगुलीपेक्षा गंभीरने केकेआरचे चांगले नेतृत्व केले, असे म्हटले जात होते.
जेव्हा गंभीरकडे केकेआरचे नेतृत्व देण्यात आले होते. तेव्हा शाहरुखने गंभीरबरोबर संवाद साधला होता. त्यावेळी शाहरुखने गांगुलीला कर्णधारपदावरून दूर केल्यावर शाहरुखने एक गोष्ट सांगितली होती. याबाबतचा खुलासा गंभीरने केला होता.
गांगुलीला कर्णधारपदावरुन दूर केल्यावर शाहरुख गंभीरला म्हणाला होता की, " तू संघ कसाही बनव किंवा त्याबाबत कोणतेही निर्णय घे. मी तुझ्या निर्णयांच्यामध्ये कधीच येणार नाही. कारण या संघाची सर्व जबाबदारी आता तुझ्यावर असेल."