लोकेश राहुलचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. राहुलला फक्त संघात स्थान दिले नाही तर त्याची उपकर्णधार म्हणून निवड केली आहे. पण तरीही तो खेळणार की नाही, ही टांगती तलवार आहे.
राहुलला दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपूर्वी दुखापत झाली होती. या दुखापतीचे उपचार घेण्यासाठी तो जर्मनीला गेला होता. राहुल जर्मनीहून उपचार घेऊन आला होता.
इंग्लंड दौऱ्यात खेळायला जाणार, असे वाटत होते. पण त्यावेळी राहुलला करोना झाला आणि त्याला इंग्लंड दौऱ्याला मुकावे लागले.
करोनामधून बरा झाल्यावर राहुल आता झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाईल, असे वाटत होते. या दौऱ्यासाठी त्याच्याकडे संघाचे कर्णधारपदही देण्यात येऊ शकत होते. पण पुन्हा एकदा राहुलला दुखापत झाली.
राहुलला फक्त संघात स्थान मिळाले नाही तर त्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. पण तरीही तो या मालिकेत खेळू शकेल की नाही, याबाबत संदिग्धता आहे.
राहुल हा दुखापतीमधून सावरला आहे, त्यामुळे त्याची संघात निवड झाली असली तरी त्याला फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. या फिटनेस चाचणीत जर तो अपयशी ठरला तर त्या आशिया स्पर्धेत खेळता येणार नाही.
राहुल जर टेस्टमध्ये तो नापास झाला तर पुन्हा एकदा तो संघाबाहेर जाऊ शकतो. पण जर राहुल संघाबाहेर गेला तर संघाचा उपकर्णधार कोण होणार, हा मोठा प्रश्न भारताच्या निवड समितीपुढे असेल.
राहुल खेळला नाही तर भारतापुढे हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत हे दोन पर्याय उप कर्णधारासाठी असतील. पण या दोघांपैकी कोणाला उप कर्णधार करायचे, याचा निर्णय त्यांना घ्यावा लागेल.