`नियोजन`साठी १२९ इच्छुक
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असून, आतापर्यंत १२९ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी (२८ ऑगस्ट) ही शेवटची मुदत असून, अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडणार आहे. अर्ज घेऊन जाणाऱ्यांमध्ये महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील अनेक मातब्बरांचा समावेश आहे.
नियोजन समितीच्या ४० जागांसाठी जिल्हा प्रशासनाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १७ सप्टेंबरला मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून, अर्ज वितरण आणि स्वीकृतीला सुरूवात झाली आहे. २८ ऑगस्ट ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत आहे. जिल्हा नियोजन समितीवर जाण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. गेल्या चार पाच दिवसांमध्ये १२९ सदस्यांनी अर्ज नेले आहेत. त्यामध्ये महापालिकेतील अनेक विद्यमान नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, नगरपरिषदांमधील पदाधिकारी, पंचायत समित्यांमधील सदस्यांचा समावेश आहे. महापालिकेतील विद्यमान नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी, सत्यभामा गाडेकर, सुर्यकांत लवटे, प्रशांत दिवे, विलास शिंदे, रमेश धोंगडे, अनिल ताजनपुरे, संगिता जाधव, सुनिता कोठुळे, सुदाम डेमसे, संगीता गायकवाड, निलेश ठाकरे, पुनम धनगर आदींनी अर्ज नेले आहेत. ग्रामीण भागातून खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची पत्नी कलावती, माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची कन्या सिमंतिनी कोकाटे, जयश्री पवार, नितीन पवार, हिरामण खोसकर, चांदवडचे नगराध्यक्ष भुषण कासलीवाल, डॉ. आत्माराम कुंभार्डे, सुरेखा दराडे, मंदाकिनी बनकर, अश्विनी आहेर, अमृता पवार, धनराज महाले या दिग्गजांनी अर्ज नेले आहेत. यापैकी बहुतांश इच्छुकांनी अद्याप अर्ज दाखल केलेले नाहीत. नियोजन समितीवर सदस्य पाठविण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने कंबर कसली आहे. सोमवारी (दि. २८) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असून, आतापर्यंत १२९ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी (२८ ऑगस्ट) ही शेवटची मुदत असून, अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडणार आहे. अर्ज घेऊन जाणाऱ्यांमध्ये महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील अनेक मातब्बरांचा समावेश आहे.
नियोजन समितीच्या ४० जागांसाठी जिल्हा प्रशासनाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १७ सप्टेंबरला मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून, अर्ज वितरण आणि स्वीकृतीला सुरूवात झाली आहे. २८ ऑगस्ट ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत आहे. जिल्हा नियोजन समितीवर जाण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. गेल्या चार पाच दिवसांमध्ये १२९ सदस्यांनी अर्ज नेले आहेत. त्यामध्ये महापालिकेतील अनेक विद्यमान नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, नगरपरिषदांमधील पदाधिकारी, पंचायत समित्यांमधील सदस्यांचा समावेश आहे. महापालिकेतील विद्यमान नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी, सत्यभामा गाडेकर, सुर्यकांत लवटे, प्रशांत दिवे, विलास शिंदे, रमेश धोंगडे, अनिल ताजनपुरे, संगिता जाधव, सुनिता कोठुळे, सुदाम डेमसे, संगीता गायकवाड, निलेश ठाकरे, पुनम धनगर आदींनी अर्ज नेले आहेत. ग्रामीण भागातून खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची पत्नी कलावती, माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची कन्या सिमंतिनी कोकाटे, जयश्री पवार, नितीन पवार, हिरामण खोसकर, चांदवडचे नगराध्यक्ष भुषण कासलीवाल, डॉ. आत्माराम कुंभार्डे, सुरेखा दराडे, मंदाकिनी बनकर, अश्विनी आहेर, अमृता पवार, धनराज महाले या दिग्गजांनी अर्ज नेले आहेत. यापैकी बहुतांश इच्छुकांनी अद्याप अर्ज दाखल केलेले नाहीत. नियोजन समितीवर सदस्य पाठविण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने कंबर कसली आहे. सोमवारी (दि. २८) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे.