अ‍ॅपशहर

बळीला पाताळात गाडणे सोपे नाही; शेतकऱ्यांची पोरं हातात दगड घेतील; राजू शेट्टी यांचा संताप

संसदेच्या दोन्ही सभागृहांत बहुचर्चित कृषी विधेयक मंजूर झाल्यानंतर आता केंद्र सरकारला आंदोलनाला सामोरे जाण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Sep 2020, 6:35 pm
कोल्हापूरः संसदेच्या दोन्ही सभागृहांत बहुचर्चित कृषी विधेयक मंजूर झाल्यानंतर विधेयकांवरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनाही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही कायदा कराल पण लक्षात ठेवा सध्याचा युगात बळीला पाताळात गाडणे ऐवढे सोपे नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत विधेयकावरील मत व्यक्त केलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raju shetti


'पाशवी बहुमताच्या जोरावर भलेही तुम्ही लोकसभा आणि राज्यसभेत शेतकरी विरोधी कायदे संमत करुन घेतलेत, पण त्याची अंमलबजावणी कशी करणार हे आम्हाला पाहायचं आहे. भलेही तुम्ही कट कारस्थान करून आणि इतर राजकीय पक्षांच्या सहकाऱ्याने शेतकऱ्याला कॉर्पोरेट सेक्टरच्या घशात घातलं. हमीभाव हा शेतकऱ्याचा जन्मसिद्ध हक्क आहे, तो जर काढून घेण्याचा प्रयत्न केला तर एक दिवस या देशातील करोडो शेतकऱ्यांची पोरं हातात दगड घेतील. या दगडांमध्ये तुमच्या काचा शिल्लक राहणार नाहीत हे लक्षात ठेवा,' असा इशारा राजू शेट्टी यांनी या वेळी दिला.

२५ सप्टेंबरला भारत बंदची हाक; 'ही' संघटना होणार सहभागी


दरम्यान, विरोधकांचा विरोध डावलून कृषी विषयक विधेयके लोकसभेनंतर आज राज्यसभेतही मंजूर करण्यात आली आहेत. त्यावरून मात्र आता शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. येत्या २५ तारखेला किसान संघर्ष समन्वय समितीच्या अंतर्गत येणाऱ्या २०८ संघटना या विधेयकाच्या विरोधात देशभर आंदोलन करणार आहेत.

राजू शेट्टी लुटारूंच्या टोळीचे नेतृत्व करतात; खोत यांनी डागली तोफ

कंगना शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली; सचिन सावंत यांचा आरोप

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज