अन्य खरेदीनंतर दिवाळी अंकाकडे पाऊल
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
मराठी साहित्यविश्वात दर दिवाळीला साहित्यिक फराळाची चर्चा होते. मराठी वाचक इतर खरेदीबरोबरच दिवाळी अंकही आवर्जून घेतो. मात्र यंदा शुक्रवारपर्यंत इतर खरेदीचा उत्साह मार्केटमध्ये असला, तरी दिवाळी अंकांकडे फारसे वाचक वळले नव्हते. मात्र गेल्या दोन दिवसांमध्ये ही परिस्थिती हळुहळू बदलायला सुरुवात झाली असून वाचक दिवाळी अंक विकत घेऊ लागले आहेत, अशी माहिती बी. डी. बागवे वितरक कंपनीचे हेमंत बागवे यांनी दिली.
मॅजेस्टिक प्रकाशनचे अशोक कोठावळे यांनीही रविवार सकाळपासून दिवाळी अंक संचासाठी वाचकांचा प्रतिसाद वाढल्याची माहिती दिली. सर्वसाधारणपणे वाचक प्रथम कपडे, फराळ, कंदील, फटाके अशा वस्तूंची खरेदी करतात. दिवाळी अंक शांतपणे वाचता येऊ शकतो, त्यामुळे सुरुवातीच्या काळात अंकांना प्रतिसाद मिळाला नसेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. ठाण्याच्या मॅजेस्टिक बुक डेपोचे विजय कोठावळे यांनीही आगाऊ नोंदणी कमी झाली असली, तरी ‘पाहा आणि घ्या’ योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
जवाहर बुक डेपोचे दिलीप भोगले यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत दिवाळी अंकाच्या मागणीत १० टक्के वाढ झाल्याचे सांगितले. वर्षानुवर्षे ज्या दिवाळी अंकांनी लोकांच्या मनात हक्काचे स्थान मिळवले आहे, त्याच अंकांची मागणी जास्त असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आयडियल पुस्तक त्रिवेणीचे अनिकेत तेंडुलकर यांनी गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत दिवाळी अंकांना तब्बल ५० टक्के जास्त प्रतिसाद असल्याची माहिती दिली. यामध्ये आरोग्यविषयक आणि महिलाविषयक अंकांची मागणी जास्त असल्याचेही ते म्हणाले.
बोरीवलीतील शब्द द बुक गॅलरी आणि शब्द प्रकाशनाचे येशू पाटील यांनी मात्र संचांना नेहमीपेक्षा कमी मागणी असल्याचे सांगितले. यंदा जाहिरातींपासून सर्वच मार्केट थंड असल्याने त्याचे पडसाद वाचकांकडून अंकांना मिळणाऱ्या प्रतिसादावरही उमटत असल्याचे त्यांनी सांगितले.
.. मात्र वाढत्या किंमतींचा फटका
जाहिराती नसल्याने अंकांच्या वाढलेल्या किमतीचा फटका विक्रीला बसल्याची माहिती हेमंत बागवे यांनी सांगितले. मार्केटमध्ये अनेक नवीन अंक चांगले विषय घेऊन येतात, मात्र किंमत वाढली की, वाचक ते अंक घ्यायला जात नाहीत. काही अंक तर दिवाळीच्या तोंडावर कागदाच्या किमती वाढल्यामुळे बाजाराही येऊ शकत नाहीत, असे त्यांनी सांगितले. ऑक्टोबरच्या पगाराचे पैसे हातात आले की, वाचकांची मागणी वाढेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
मराठी साहित्यविश्वात दर दिवाळीला साहित्यिक फराळाची चर्चा होते. मराठी वाचक इतर खरेदीबरोबरच दिवाळी अंकही आवर्जून घेतो. मात्र यंदा शुक्रवारपर्यंत इतर खरेदीचा उत्साह मार्केटमध्ये असला, तरी दिवाळी अंकांकडे फारसे वाचक वळले नव्हते. मात्र गेल्या दोन दिवसांमध्ये ही परिस्थिती हळुहळू बदलायला सुरुवात झाली असून वाचक दिवाळी अंक विकत घेऊ लागले आहेत, अशी माहिती बी. डी. बागवे वितरक कंपनीचे हेमंत बागवे यांनी दिली.
मॅजेस्टिक प्रकाशनचे अशोक कोठावळे यांनीही रविवार सकाळपासून दिवाळी अंक संचासाठी वाचकांचा प्रतिसाद वाढल्याची माहिती दिली. सर्वसाधारणपणे वाचक प्रथम कपडे, फराळ, कंदील, फटाके अशा वस्तूंची खरेदी करतात. दिवाळी अंक शांतपणे वाचता येऊ शकतो, त्यामुळे सुरुवातीच्या काळात अंकांना प्रतिसाद मिळाला नसेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. ठाण्याच्या मॅजेस्टिक बुक डेपोचे विजय कोठावळे यांनीही आगाऊ नोंदणी कमी झाली असली, तरी ‘पाहा आणि घ्या’ योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
जवाहर बुक डेपोचे दिलीप भोगले यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत दिवाळी अंकाच्या मागणीत १० टक्के वाढ झाल्याचे सांगितले. वर्षानुवर्षे ज्या दिवाळी अंकांनी लोकांच्या मनात हक्काचे स्थान मिळवले आहे, त्याच अंकांची मागणी जास्त असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आयडियल पुस्तक त्रिवेणीचे अनिकेत तेंडुलकर यांनी गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत दिवाळी अंकांना तब्बल ५० टक्के जास्त प्रतिसाद असल्याची माहिती दिली. यामध्ये आरोग्यविषयक आणि महिलाविषयक अंकांची मागणी जास्त असल्याचेही ते म्हणाले.
बोरीवलीतील शब्द द बुक गॅलरी आणि शब्द प्रकाशनाचे येशू पाटील यांनी मात्र संचांना नेहमीपेक्षा कमी मागणी असल्याचे सांगितले. यंदा जाहिरातींपासून सर्वच मार्केट थंड असल्याने त्याचे पडसाद वाचकांकडून अंकांना मिळणाऱ्या प्रतिसादावरही उमटत असल्याचे त्यांनी सांगितले.
.. मात्र वाढत्या किंमतींचा फटका
जाहिराती नसल्याने अंकांच्या वाढलेल्या किमतीचा फटका विक्रीला बसल्याची माहिती हेमंत बागवे यांनी सांगितले. मार्केटमध्ये अनेक नवीन अंक चांगले विषय घेऊन येतात, मात्र किंमत वाढली की, वाचक ते अंक घ्यायला जात नाहीत. काही अंक तर दिवाळीच्या तोंडावर कागदाच्या किमती वाढल्यामुळे बाजाराही येऊ शकत नाहीत, असे त्यांनी सांगितले. ऑक्टोबरच्या पगाराचे पैसे हातात आले की, वाचकांची मागणी वाढेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.