भारतकुमार राऊत
माजी संपादक, महाराष्ट्र टाइम्स
गोविंदराव तळवलकर हे रॉयवादी असल्याने त्यांना ईहवादी, परलोक वगैरे संकल्पना न पटणारी असावी. मी आणि तळवलकर, तळवलकर आणि मी, त्यांच्याविषयी असणारी मैत्री, मी पाहिलेले तळवलकर या विषयावर मी काही बोलणार नाही. त्यांच्या लिखाणाविषयीही बोलणार नाही. मी महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर असताना तळवलकर संपादक होते. मी संपादक झालो तेव्हा तळवलकर परदेशात होते. माझी आणि त्यांची परदेशात चार ते पाच वेळा भेट झाली. मी बोलणार आहे ते तळवलकर आणि तत्कालीन संपादक, त्यांच्यामधील फरक, साम्य याविषयी.
तळवलकर संपादक झाले तेव्हा ते चाळीशीत होते आणि ‘मटा’ अवघ्या चार वर्षांचा होता. त्या काळात मुंबई आणि महाराष्ट्रात उत्तमोत्तम संपादकांची मांदियाळी होती. इंग्रजीमध्ये श्यामलाल, गिरीलाल, आर. के. करंजिया, खुशवंत सिंग, धर्मवीर भारती यांच्यासारखे दिग्गज टाइम्स समूहात होते. लोकसत्तामध्ये ह. रा. महाजनी, विद्याधर गोखले, माधव गडकरी यांच्यासारखी मंडळी होती. सकाळचे नानासाहेब परुळेकर होते, आचार्य अत्रे होते, नवाकाळचे अग्रलेखाचे बादशाह असणारे संपादक निळूभाऊ खाडिलकर, नवशक्तिमध्ये पु. रा. बेहेरे, मराठवाड्यात अनंत भालेकर, माणूसचे माजगावकर, सोबतचे ग. वा. बेहेरे, साधनाचे नानासाहेब गोरे असे विविध उत्कृष्ट संपादक होते. अशावेळी तळवलकरांचे वेगळेपण शोधून काढणे गरजेचे आहे.
तळवलकर हे माझ्या दृष्टीने पूर्णपणे व्यावसायिक पत्रकार होते. व्यावसायिक आणि धंदेवाईक यात खूप फरक आहे. माझ्यासारख्या पत्रकार पिढीचे ते कर्तेधर्ते होते. मी इयत्ता चौथी, पाचवीपासून त्यांचे अग्रलेख वाचत आलो. त्या अग्रलेखांवरच माझा पिंड पोसला गेला आहे. मध्यमवर्गीय, सुशिक्षित वाचकवर्गाच्या तीन पिढ्या त्यांनी सांभाळल्या. त्यांनी ते काम अत्यंत निष्ठेने केले. मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरी भागांत हे काम जोमात पसरविले. त्यांच्या लिखाणाचा सामाजिक, सांस्कृतिक, समाजजीवनावर परिणाम होत होता. दोन ते तीन पिढ्या घडविण्याचे काम त्यांच्या लिखाणाने केले. त्यांचे विचार रॉयवादी असले आणि न. चि. केळकरांना मानत होते तरी त्यांचे वृत्तपत्रीय लिखाण, आचार हे टिळकांप्रमाणे जहाल होते. हे त्यांचे वैशिष्ट्य होते. इतरांपेक्षा कित्येक पटीने जहाल, तर्कनिष्ठ लिखाण ते करीत असत. हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे. ते स्वत:ला लोकमान्यांच्या विचारांचे पाईक म्हणायचे, ते लोकमान्यांप्रमाणेच रोखठोक भाषा वापरत. १९६१ मध्ये संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. पुढे शिवसेनेची स्थापना झाली. त्या विचारसरणीशी नाते न सांगणारी आणि ती खोडून काढणारी तळवलकरांची विचारसरणी होती. ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मी त्यांना लेखमाला लिहीण्याची विनंती केली होती. त्यांनी जी काही लेखमाला लिहिली ते वाचून वाचकांना आपण न्यूयॉर्क, वॉशिंग्टनमध्ये असल्याचा भास झाला असणार. लिहिणे, विचार करणे हा त्यांचा प्राणवायू होता. ते महाराष्ट्रात अमर झाले आहेत. तळवलकर विसरण्यासाठी ७५ ते १०० वर्षे लागतील. तरीही लिखाणातून, विचारांतून ते सतत सोबत असतील, अशी माझी खात्री आहे. त्यांची स्मृती आमच्यासोबत कायम राहील.
माजी संपादक, महाराष्ट्र टाइम्स
गोविंदराव तळवलकर हे रॉयवादी असल्याने त्यांना ईहवादी, परलोक वगैरे संकल्पना न पटणारी असावी. मी आणि तळवलकर, तळवलकर आणि मी, त्यांच्याविषयी असणारी मैत्री, मी पाहिलेले तळवलकर या विषयावर मी काही बोलणार नाही. त्यांच्या लिखाणाविषयीही बोलणार नाही. मी महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर असताना तळवलकर संपादक होते. मी संपादक झालो तेव्हा तळवलकर परदेशात होते. माझी आणि त्यांची परदेशात चार ते पाच वेळा भेट झाली. मी बोलणार आहे ते तळवलकर आणि तत्कालीन संपादक, त्यांच्यामधील फरक, साम्य याविषयी.
तळवलकर संपादक झाले तेव्हा ते चाळीशीत होते आणि ‘मटा’ अवघ्या चार वर्षांचा होता. त्या काळात मुंबई आणि महाराष्ट्रात उत्तमोत्तम संपादकांची मांदियाळी होती. इंग्रजीमध्ये श्यामलाल, गिरीलाल, आर. के. करंजिया, खुशवंत सिंग, धर्मवीर भारती यांच्यासारखे दिग्गज टाइम्स समूहात होते. लोकसत्तामध्ये ह. रा. महाजनी, विद्याधर गोखले, माधव गडकरी यांच्यासारखी मंडळी होती. सकाळचे नानासाहेब परुळेकर होते, आचार्य अत्रे होते, नवाकाळचे अग्रलेखाचे बादशाह असणारे संपादक निळूभाऊ खाडिलकर, नवशक्तिमध्ये पु. रा. बेहेरे, मराठवाड्यात अनंत भालेकर, माणूसचे माजगावकर, सोबतचे ग. वा. बेहेरे, साधनाचे नानासाहेब गोरे असे विविध उत्कृष्ट संपादक होते. अशावेळी तळवलकरांचे वेगळेपण शोधून काढणे गरजेचे आहे.
तळवलकर हे माझ्या दृष्टीने पूर्णपणे व्यावसायिक पत्रकार होते. व्यावसायिक आणि धंदेवाईक यात खूप फरक आहे. माझ्यासारख्या पत्रकार पिढीचे ते कर्तेधर्ते होते. मी इयत्ता चौथी, पाचवीपासून त्यांचे अग्रलेख वाचत आलो. त्या अग्रलेखांवरच माझा पिंड पोसला गेला आहे. मध्यमवर्गीय, सुशिक्षित वाचकवर्गाच्या तीन पिढ्या त्यांनी सांभाळल्या. त्यांनी ते काम अत्यंत निष्ठेने केले. मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरी भागांत हे काम जोमात पसरविले. त्यांच्या लिखाणाचा सामाजिक, सांस्कृतिक, समाजजीवनावर परिणाम होत होता. दोन ते तीन पिढ्या घडविण्याचे काम त्यांच्या लिखाणाने केले. त्यांचे विचार रॉयवादी असले आणि न. चि. केळकरांना मानत होते तरी त्यांचे वृत्तपत्रीय लिखाण, आचार हे टिळकांप्रमाणे जहाल होते. हे त्यांचे वैशिष्ट्य होते. इतरांपेक्षा कित्येक पटीने जहाल, तर्कनिष्ठ लिखाण ते करीत असत. हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे. ते स्वत:ला लोकमान्यांच्या विचारांचे पाईक म्हणायचे, ते लोकमान्यांप्रमाणेच रोखठोक भाषा वापरत. १९६१ मध्ये संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. पुढे शिवसेनेची स्थापना झाली. त्या विचारसरणीशी नाते न सांगणारी आणि ती खोडून काढणारी तळवलकरांची विचारसरणी होती. ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मी त्यांना लेखमाला लिहीण्याची विनंती केली होती. त्यांनी जी काही लेखमाला लिहिली ते वाचून वाचकांना आपण न्यूयॉर्क, वॉशिंग्टनमध्ये असल्याचा भास झाला असणार. लिहिणे, विचार करणे हा त्यांचा प्राणवायू होता. ते महाराष्ट्रात अमर झाले आहेत. तळवलकर विसरण्यासाठी ७५ ते १०० वर्षे लागतील. तरीही लिखाणातून, विचारांतून ते सतत सोबत असतील, अशी माझी खात्री आहे. त्यांची स्मृती आमच्यासोबत कायम राहील.