लता मंगेशकर यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त वाचकांना त्यांच्या आवडत्या गाण्यांच्या सुरेल आठवणी जाग्या केल्या. या 'सात स्वरांची' जादू किती खोलवर मनामनात रुजलेली आहे, हे पुन्हा एकदा लक्षात आले. लताच्या गाण्यांच्या आठवणींचा स्वरमधुर, हवाहवासा प्रपातच जणू कोसळला. यातील काही निवडक भावस्पर्शी आठवणी..
‘विठ्ठल तो आला आला’
लहानपणापासूनच आम्हा भावंडांना गाण्याचे वेड आहे. रोज सायं. ५.३० वा. रेडिओवरील भावगीते व भक्तिगीते आवडीने ऐकत असू. माझी आई प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. ती रोज दिवे लावणीच्या वेळेस आम्हांला प्रार्थनाशिकवत असे. त्यामुळे लतादीदींनी गायलेली भक्तिगीते व भावगीते आम्हाला पाठ झाली होती.१९७८ची गोष्ट. माझा भाऊ इ. २रीमध्ये शिकत होता. शाळेतअसताना रोजचा गृहपाठ रोज तपासला जायचा. एक दिवस अशी गंमत झाली. माझ्या भावाने गृहपाठ अर्धवट केला होता. सकाळची शाळा असल्याने तो पूर्ण करूशकला नाही.विद्यार्थ्यांनी रोजचा अभ्यास रोज पूर्ण करावा म्हणून शिक्षाही कडक असायची. त्याच्या बाईंची शिक्षाही वेगळीच होती. गृहपाठ पूर्ण केला नसेल तर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसमोर कपडे काढले जायचे. म्हणजे गृहपाठरोजचा रोज पूर्ण व्हायचाच. त्याला फळ्याकडे उभे करण्यात आले. त्याच्या बाबतीत हा प्रसंग पहिल्यांदाच आला होता. त्यामुळे तो रडकुंडीला आला होता. बाईंच्या ते लक्षात आले. कारण रोज आई अभ्यास घ्यायची आणिवर्गातील तो सद्गुणी विद्यार्थी होता. बाईंनी त्याला सांगितले, ‘तुला ही शिक्षा नको असेल तर एखादं गाणं म्हण’ हे ऐकून त्याला खूप बरं वाटलं. त्याने लतादीदींनी गायलेलं ‘विठ्ठल तो आला आला, मला भेटण्याला’ हे संपूर्ण गायलं.त्या दिवशी संपूर्ण वर्गासमोर होणारी फजिती टळली. पालकसभेला जेव्हा आई शाळेत आली, तेव्हा बाईंनी हसत-
हसत घडलेला प्रसंग आईला सांगितला. तेव्हा आम्हाला त्याची टळलेली फजिती समजली. आम्ही सर्वजण खो-खो हसलो. त्याच्यावर ओढवलेल्या संकटकाळी दीदींच्या गाण्याबरोबरच विठ्ठलही धावून आला.सध्या तो ऑर्गन-प्लेअर आहे. वाद्य वाजवताना त्याला नेहमी तो प्रसंग आणि दीदींच्या गाण्याची आठवण येते. खरोखरच ‘दीदींच्या आवाजातील गोडवा विठ्ठलही आठवी सर्वा.’ लहानग्यांच्या छोट्या प्रसंगातही दीदींनी गायलेल्यागाण्याने वाचविले.-नीलिमा सुधाकर कल्याणकर
ना... जिया लागे ना...
गेली ४५ वर्षे ज्या सुमधुर आवाजाने माझ्या आयुष्याला गती दिली, मरगळलेल्या मनाला उभारी दिली, नैराश्येच्या गर्तेत असताना जगण्याची ऊर्मी दिली, धीर दिला, आशेची किरणं दाखवली, बालपण जिच्या स्वरात न्हाऊननिघाले, तारुण्यात जिच्या गाण्याने सोबत केली, प्रेयसीच्या आठवणींना उजाळा मिळाला, मध्यम वयात आजही जिचं गाणं कानी पडताच पुन्हा तरुण झाल्यासारखं वाटतं आणि म्हातारपणात जिचे आर्त स्वर भूतकाळातीलआठवणींना कुरवाळताना अमृताचं काम करतील.दीदींच्या हजारो गाण्यांपैकी केवळ एकच गाणं निवडणे म्हणजे महाकठीण काम परंतु मनावर दगड ठेवून केवळ एकाच गाण्याविषयी लिहितोय.१२ मार्च १९७१ रोजी म्हणजे माझ्या जन्माअगोदर आलेल्या ‘आनंद’ चित्रपटातील दीदींच्या गाण्याबद्दल लिहावेसे वाटते. दिग्गज दिग्दर्शक - हृषिकेश मुखर्जी, गीतकार - गुलजार आणि संगीतकार - सलील चौधरी.प्रेयसी (सुमिता संन्याल) आपला प्रियकर (अमिताभ बच्चन) याची घरी येण्याची वाट पाहतेय. त्याच्यासाठी ती नटून-थटून तयार आहे. त्याला कधी एकदाची पाहतेय, भेटतेय, त्याच्या आठवणीने व्याकूळ झालेली, त्याच्यावरीलप्रेमाने स्वतःला हरवून गेलेली, त्यालाच आपल्या जगण्याचा ध्यास आणि श्वास मानणारी ही प्रेयसी...पहिला केवळ एकच स्वर,ना... गाताच क्षणार्धात अंगावर उमटणारं रोमांच, हुरहूर लावणारी ओढ आणि स्वर्गसुख लाभलेला क्षण... आणि तो स्वर...ना... जिया लागे नातेरे बिना मेरा कहीं, जिया लागे ना ऐकणाऱ्याच्या कंठातून आपसूक आलेले शब्द वाह...जीना भूले थे कहाँ... याद नहीं तुझको पाया है जहाँ... सांस फिर आयी वहीं जेव्हा दीदी सांस फिर आयी वही म्हणते तेव्हा खरोखर रोखून धरलेला श्वास पुन्हा तिथेच पूर्ववत चालू होतो.जिंदगी... जिंदगी तेरे सिवा, हाय भाये ना जिंदगीचा हा लागलेला स्वर अप्रतिम. जिथे तो स्वर संपतो तिथेच जिंदगी तेरे सिवा हाय भाये ना। खरं वाटायला लागतं... नंतरचा ना... जिया लागे ना... आ... ना... जिया लागे नापिया तेरी बावरी से रहा हा... जाये ना हे अप्रतिम गायलं गेलंय खरंच आपण बावरे होऊन जातो. इतका स्वरांचा चढ-उतार की बास... दीदी तुमने जां फूँक दी...कलयुगातील प्रेमीयुगलांचे प्रेम अजूनही जिवंत असल्याचे प्रतीक आहे.शेवटचे कडवे तर अप्रतिम.वाह... क्या बात... भाव-भावनांचा उत्कट कल्लोळ, स्वरांच्या चढ-उतारांचा उत्कृष्ट नमुना म्हणजे दीदींचे हे गाणे. खरे तर गुलजारजींचे हे शब्द त्या प्रियकरासाठी नसून माझ्यासारख्या दीदींच्या चाहत्यांसाठी आहेत. जणू काहीहेच शब्द मी दीदींना समोर ठेवून गातोय.‘ना... जिया लागे ना’दीदी जिवंतपणीच अमरत्व लाभलंय तुम्हाला. ह्या ब्रह्मांडाशी तुमचा स्वर केव्हाच एकरूप झालाय. दीदी तुम्हाला ९०व्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा-विजय गंगाराम वैद्य
हृषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला ‘अनुराधा’ चित्रपट मोठा विलक्षण होता.
‘समाजसेवा हेच जीवन’ मानून ध्येयवादी वृत्तीने खेड्यात काम करणारा डॉक्टर आणि एका उत्कृष्ट गायिकेची जीवन कहाणी म्हणजे ‘अनुराधा’ चित्रपट. तो डॉक्टर असतो. ती प्रतिभान गायिका असते. दोघांच्यात उत्कट प्रेम निर्माण होते. लग्न करून ती त्याच्याबरोबर खेड्यात जाते. पतीच्या ध्येयवादी जीवनात त्याला साथ देताना तिचे गाणे थांबते. आपण गात होते. हेसुद्धाती विसरते. काही वर्षांनी तिचा जुना मित्र अपघाताने त्यांना भेटतो. तिचे गाणे थांबल्याचे बघून त्याला वाईट वाटते. तिने गाणे पुन्हा सुरू करावे म्हणून तो तिला प्रोत्साहन देतो. ती अस्वस्थ होते. नायिकेच्या दोन उत्कट
भावना व्यक्तकरणारी लतादीदींची गाणी आहेत. पं. रवीशंकरांचे संगीत म्हणजे सोने पे सुहागच. पहिले गाणे -प्रमभावनेने फुलून गेलेल्या प्रेयसीच्या भावना व्यक्त करणारे आहे -‘जाने कैसे सपनोमें खो गयी अखियाँ; मैं तो हूँ जागी मेरी सो गयीअखियाँ।’ आपल्याही नकळत मनाला प्रेमाची चाहूल कशी लागली. सारे जगच आज उजळून निघाल्यासारखे वाटत आहे. प्रेमाच्या अनुभूतीने उजळून गेलेली नायिकेची मनःस्थिती लतादीदींनी ‘मैं तो हूँ जागी मेरी सो गयीअखियाँ’ चरणातील ‘अखियाँ’ शब्दाच्या विशिष्ट उच्चारणातून नेमकेपणाने व्यक्त केली आहे. नायिकेच्या हळूवार, उत्कट, तरल तरीही संयमित भावनांची कलात्मकतेने अभिव्यक्ती करणारे गाणे ऐकणे व पडद्यावर पाहणेकलात्मक आनंद देते.काही वर्षे मधे जातात. ध्येयवादी पतीला संसारात साथ देताना तिच्यातील गायिका सुकून गेलेली असते. मित्राच्या बोलण्याने तिच्यातील गायिका जागी होऊ लागते. मित्र घरी जेवायला येतो. जेवण झाल्यावर तिला ‘गाणे म्हण’म्हणून आग्रह करतो. नवराही म्हणतो,‘गाणे म्हण.’ ती एका जागी बसून गाणं म्हणते. जुन्या आठवणींनी व्याकूळ होणारं गाणं. ते सुखाचे दिवस, जुने ऋतू परतका येत नाहीत. गेलेले दिवस, तो आनंद परत मिळेल का? तिच्यामनातील खंत उत्कटतेने व्यक्त करणारे गाणे -‘हाय रे वो दिन क्यू ना आए। जा जा ऋतू, लौट आये - हाय रे वो दिन क्यू ना आए.’एखाद्या जुन्या हळूवार जखमेवरची खपली निघावी, आपल्याही नकळत एक एक रक्ताचा थेंब ठिपकत राहावा, अशी नायिकेची वेदना संथ चालीच्या गीतातून ठिपकत जाते. सुनी मेरी बीना संगीत बिना। हृषिकेश मुखर्जीयांच्या दिग्दर्शनामुळे नायिकेच्या वेदना तीव्रतेने व्यक्त होऊ लागतात. पती खूप दिवसांनी तिला गाण्याचा आग्रह करतो. समोर बसतो. पण थोड्याच वेळात जवळचे पुस्तक वाचू लागतो. वाचण्यात मग्न होत. स्वतःच्याही नकळतपुस्तक वाचता वाचता उठून दुसऱ्या खोलीत निघून जातो. पतीच्या बदलत्या कृतीनुसार नायिकेचा स्वर आर्त होतो. तिचा मित्र अस्वस्थ होतो. तिच्या चेहऱ्यावरची वेदना गडद होते. स्वर आर्त, जीवघेणा व्याकूळ होतो.‘हाय रे वोदिन क्यू ना आए।’ मनातील सल व्यक्त करणारी नाराजी, दुःख, पतीकडून होणारी उपेक्षा मित्रासमोर उघड झाल्याने होणारा त्रास, वैफल्य अशा अनेक भावना व्यक्त करणाऱ्या गीतात प्रत्येक चरणानुसार दीदींचा स्वर चढतव्याकूळ होतो. एका हताश, हळूवार व्यथेच्या अभिव्यक्तीपर्यंत उत्कट होणारा लतादीदींचा आवाज गाणे संपल्यावरही वातावरणात भरून राहतो. बलराज सहानी, लीला नायडू, अभिभट्टाचार्य यांच्या अप्रतिम अभिनयाने दोन्हीगाणी आणखीन परिणामकारक होतात. हे सांगणे न लगे. चित्रपट संपल्यावर दोन दिवस मनात रेंगाळत राहतात ते लतादीदींच्या स्वरांनी भिजलेले जिवंत झालेले शब्द - ‘हाय रे वो दिन क्यू ना आए.’-डॉ. स्वाती कर्वे
वृक्षवल्ली आम्हा सोयरी
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अमृतमय मधुर कंठातून गायलेल्या शेकडो गाण्यांतून मनाला भुरळ घालणारे एक गाणे निवडणे म्हणजे महापरीक्षाच. पण त्यातही आज सर्वत्र पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना मनातकायमस्वरूपी घर करून राहिलेले पुढील भक्तिगीत विशेषत्वाने नमूद करावेसे वाटले-‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरेपक्षी ही सुस्वरे आळविती।। धृ।।’हे गाणे म्हणजे तीन महान संतांचा त्रिवेणी संगम होय. भौतिक व परमार्थ यातील द्वंद्वयुद्धात सतत घराचा उंबरठा ओलांडून निसर्गालाच देव मानणारे संत तुकाराम महाराज यांची रचना, संगीतकार श्रीनिवास खळे यांचेउच्चकोटीचे संगीत व गाण्याशी एकरूप होऊन स्वतःला व ऐकणाऱ्याला देहभान विसरायला लावणारा गानकोकीळा लतादीदींचा भैरवी रागातील मधुर कंठस्वर, याची मैफिल कानावर पडताच स्वर्गीय आनंद होतो. हे गाणेम्हणजे अहंशून्य निसर्गाला तितक्याच अहंशून्य भावनेने घातलेली सूरमय साद. झाडेझुडपे, भरारी मारणारे विविध पक्षी, वन्यप्राणी आपले जणू नातेवाईकच आहेत हा आध्यात्मिक विचार संत तुकारामांनी या अभंगातून आपल्यामनावर बिंबवला व लतादीदींनी आपल्या दैवी सुरात तो कायमचा रुजवला. वन-अरण्य म्हणजे निसर्गाच्या स्वाभाविकतेचे सौंदर्य दर्शन.‘तेणे सुखे रुचे एकांताचा वास’ या ओळीत तुकाराम महाराजांनी ‘करा जिव्हाळा निसर्गाशी, देईल तो सुखाच्या राशी’ हा मानवकल्याणाचा दिलेला संदेश आपल्या लयबद्ध सुरांनी लतादीदींनी सर्वांपर्यंत पोहोचविला व हे गाणे अजरामर केले.- सूर्यकांत भोसले
‘विठ्ठल तो आला आला’
लहानपणापासूनच आम्हा भावंडांना गाण्याचे वेड आहे. रोज सायं. ५.३० वा. रेडिओवरील भावगीते व भक्तिगीते आवडीने ऐकत असू. माझी आई प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. ती रोज दिवे लावणीच्या वेळेस आम्हांला प्रार्थनाशिकवत असे. त्यामुळे लतादीदींनी गायलेली भक्तिगीते व भावगीते आम्हाला पाठ झाली होती.१९७८ची गोष्ट. माझा भाऊ इ. २रीमध्ये शिकत होता. शाळेतअसताना रोजचा गृहपाठ रोज तपासला जायचा. एक दिवस अशी गंमत झाली. माझ्या भावाने गृहपाठ अर्धवट केला होता. सकाळची शाळा असल्याने तो पूर्ण करूशकला नाही.विद्यार्थ्यांनी रोजचा अभ्यास रोज पूर्ण करावा म्हणून शिक्षाही कडक असायची. त्याच्या बाईंची शिक्षाही वेगळीच होती. गृहपाठ पूर्ण केला नसेल तर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसमोर कपडे काढले जायचे. म्हणजे गृहपाठरोजचा रोज पूर्ण व्हायचाच. त्याला फळ्याकडे उभे करण्यात आले. त्याच्या बाबतीत हा प्रसंग पहिल्यांदाच आला होता. त्यामुळे तो रडकुंडीला आला होता. बाईंच्या ते लक्षात आले. कारण रोज आई अभ्यास घ्यायची आणिवर्गातील तो सद्गुणी विद्यार्थी होता. बाईंनी त्याला सांगितले, ‘तुला ही शिक्षा नको असेल तर एखादं गाणं म्हण’ हे ऐकून त्याला खूप बरं वाटलं. त्याने लतादीदींनी गायलेलं ‘विठ्ठल तो आला आला, मला भेटण्याला’ हे संपूर्ण गायलं.त्या दिवशी संपूर्ण वर्गासमोर होणारी फजिती टळली. पालकसभेला जेव्हा आई शाळेत आली, तेव्हा बाईंनी हसत-
हसत घडलेला प्रसंग आईला सांगितला. तेव्हा आम्हाला त्याची टळलेली फजिती समजली. आम्ही सर्वजण खो-खो हसलो. त्याच्यावर ओढवलेल्या संकटकाळी दीदींच्या गाण्याबरोबरच विठ्ठलही धावून आला.सध्या तो ऑर्गन-प्लेअर आहे. वाद्य वाजवताना त्याला नेहमी तो प्रसंग आणि दीदींच्या गाण्याची आठवण येते. खरोखरच ‘दीदींच्या आवाजातील गोडवा विठ्ठलही आठवी सर्वा.’ लहानग्यांच्या छोट्या प्रसंगातही दीदींनी गायलेल्यागाण्याने वाचविले.-नीलिमा सुधाकर कल्याणकर
ना... जिया लागे ना...
गेली ४५ वर्षे ज्या सुमधुर आवाजाने माझ्या आयुष्याला गती दिली, मरगळलेल्या मनाला उभारी दिली, नैराश्येच्या गर्तेत असताना जगण्याची ऊर्मी दिली, धीर दिला, आशेची किरणं दाखवली, बालपण जिच्या स्वरात न्हाऊननिघाले, तारुण्यात जिच्या गाण्याने सोबत केली, प्रेयसीच्या आठवणींना उजाळा मिळाला, मध्यम वयात आजही जिचं गाणं कानी पडताच पुन्हा तरुण झाल्यासारखं वाटतं आणि म्हातारपणात जिचे आर्त स्वर भूतकाळातीलआठवणींना कुरवाळताना अमृताचं काम करतील.दीदींच्या हजारो गाण्यांपैकी केवळ एकच गाणं निवडणे म्हणजे महाकठीण काम परंतु मनावर दगड ठेवून केवळ एकाच गाण्याविषयी लिहितोय.१२ मार्च १९७१ रोजी म्हणजे माझ्या जन्माअगोदर आलेल्या ‘आनंद’ चित्रपटातील दीदींच्या गाण्याबद्दल लिहावेसे वाटते. दिग्गज दिग्दर्शक - हृषिकेश मुखर्जी, गीतकार - गुलजार आणि संगीतकार - सलील चौधरी.प्रेयसी (सुमिता संन्याल) आपला प्रियकर (अमिताभ बच्चन) याची घरी येण्याची वाट पाहतेय. त्याच्यासाठी ती नटून-थटून तयार आहे. त्याला कधी एकदाची पाहतेय, भेटतेय, त्याच्या आठवणीने व्याकूळ झालेली, त्याच्यावरीलप्रेमाने स्वतःला हरवून गेलेली, त्यालाच आपल्या जगण्याचा ध्यास आणि श्वास मानणारी ही प्रेयसी...पहिला केवळ एकच स्वर,ना... गाताच क्षणार्धात अंगावर उमटणारं रोमांच, हुरहूर लावणारी ओढ आणि स्वर्गसुख लाभलेला क्षण... आणि तो स्वर...ना... जिया लागे नातेरे बिना मेरा कहीं, जिया लागे ना ऐकणाऱ्याच्या कंठातून आपसूक आलेले शब्द वाह...जीना भूले थे कहाँ... याद नहीं तुझको पाया है जहाँ... सांस फिर आयी वहीं जेव्हा दीदी सांस फिर आयी वही म्हणते तेव्हा खरोखर रोखून धरलेला श्वास पुन्हा तिथेच पूर्ववत चालू होतो.जिंदगी... जिंदगी तेरे सिवा, हाय भाये ना जिंदगीचा हा लागलेला स्वर अप्रतिम. जिथे तो स्वर संपतो तिथेच जिंदगी तेरे सिवा हाय भाये ना। खरं वाटायला लागतं... नंतरचा ना... जिया लागे ना... आ... ना... जिया लागे नापिया तेरी बावरी से रहा हा... जाये ना हे अप्रतिम गायलं गेलंय खरंच आपण बावरे होऊन जातो. इतका स्वरांचा चढ-उतार की बास... दीदी तुमने जां फूँक दी...कलयुगातील प्रेमीयुगलांचे प्रेम अजूनही जिवंत असल्याचे प्रतीक आहे.शेवटचे कडवे तर अप्रतिम.वाह... क्या बात... भाव-भावनांचा उत्कट कल्लोळ, स्वरांच्या चढ-उतारांचा उत्कृष्ट नमुना म्हणजे दीदींचे हे गाणे. खरे तर गुलजारजींचे हे शब्द त्या प्रियकरासाठी नसून माझ्यासारख्या दीदींच्या चाहत्यांसाठी आहेत. जणू काहीहेच शब्द मी दीदींना समोर ठेवून गातोय.‘ना... जिया लागे ना’दीदी जिवंतपणीच अमरत्व लाभलंय तुम्हाला. ह्या ब्रह्मांडाशी तुमचा स्वर केव्हाच एकरूप झालाय. दीदी तुम्हाला ९०व्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा-विजय गंगाराम वैद्य
हृषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला ‘अनुराधा’ चित्रपट मोठा विलक्षण होता.
‘समाजसेवा हेच जीवन’ मानून ध्येयवादी वृत्तीने खेड्यात काम करणारा डॉक्टर आणि एका उत्कृष्ट गायिकेची जीवन कहाणी म्हणजे ‘अनुराधा’ चित्रपट. तो डॉक्टर असतो. ती प्रतिभान गायिका असते. दोघांच्यात उत्कट प्रेम निर्माण होते. लग्न करून ती त्याच्याबरोबर खेड्यात जाते. पतीच्या ध्येयवादी जीवनात त्याला साथ देताना तिचे गाणे थांबते. आपण गात होते. हेसुद्धाती विसरते. काही वर्षांनी तिचा जुना मित्र अपघाताने त्यांना भेटतो. तिचे गाणे थांबल्याचे बघून त्याला वाईट वाटते. तिने गाणे पुन्हा सुरू करावे म्हणून तो तिला प्रोत्साहन देतो. ती अस्वस्थ होते. नायिकेच्या दोन उत्कट
भावना व्यक्तकरणारी लतादीदींची गाणी आहेत. पं. रवीशंकरांचे संगीत म्हणजे सोने पे सुहागच. पहिले गाणे -प्रमभावनेने फुलून गेलेल्या प्रेयसीच्या भावना व्यक्त करणारे आहे -‘जाने कैसे सपनोमें खो गयी अखियाँ; मैं तो हूँ जागी मेरी सो गयीअखियाँ।’ आपल्याही नकळत मनाला प्रेमाची चाहूल कशी लागली. सारे जगच आज उजळून निघाल्यासारखे वाटत आहे. प्रेमाच्या अनुभूतीने उजळून गेलेली नायिकेची मनःस्थिती लतादीदींनी ‘मैं तो हूँ जागी मेरी सो गयीअखियाँ’ चरणातील ‘अखियाँ’ शब्दाच्या विशिष्ट उच्चारणातून नेमकेपणाने व्यक्त केली आहे. नायिकेच्या हळूवार, उत्कट, तरल तरीही संयमित भावनांची कलात्मकतेने अभिव्यक्ती करणारे गाणे ऐकणे व पडद्यावर पाहणेकलात्मक आनंद देते.काही वर्षे मधे जातात. ध्येयवादी पतीला संसारात साथ देताना तिच्यातील गायिका सुकून गेलेली असते. मित्राच्या बोलण्याने तिच्यातील गायिका जागी होऊ लागते. मित्र घरी जेवायला येतो. जेवण झाल्यावर तिला ‘गाणे म्हण’म्हणून आग्रह करतो. नवराही म्हणतो,‘गाणे म्हण.’ ती एका जागी बसून गाणं म्हणते. जुन्या आठवणींनी व्याकूळ होणारं गाणं. ते सुखाचे दिवस, जुने ऋतू परतका येत नाहीत. गेलेले दिवस, तो आनंद परत मिळेल का? तिच्यामनातील खंत उत्कटतेने व्यक्त करणारे गाणे -‘हाय रे वो दिन क्यू ना आए। जा जा ऋतू, लौट आये - हाय रे वो दिन क्यू ना आए.’एखाद्या जुन्या हळूवार जखमेवरची खपली निघावी, आपल्याही नकळत एक एक रक्ताचा थेंब ठिपकत राहावा, अशी नायिकेची वेदना संथ चालीच्या गीतातून ठिपकत जाते. सुनी मेरी बीना संगीत बिना। हृषिकेश मुखर्जीयांच्या दिग्दर्शनामुळे नायिकेच्या वेदना तीव्रतेने व्यक्त होऊ लागतात. पती खूप दिवसांनी तिला गाण्याचा आग्रह करतो. समोर बसतो. पण थोड्याच वेळात जवळचे पुस्तक वाचू लागतो. वाचण्यात मग्न होत. स्वतःच्याही नकळतपुस्तक वाचता वाचता उठून दुसऱ्या खोलीत निघून जातो. पतीच्या बदलत्या कृतीनुसार नायिकेचा स्वर आर्त होतो. तिचा मित्र अस्वस्थ होतो. तिच्या चेहऱ्यावरची वेदना गडद होते. स्वर आर्त, जीवघेणा व्याकूळ होतो.‘हाय रे वोदिन क्यू ना आए।’ मनातील सल व्यक्त करणारी नाराजी, दुःख, पतीकडून होणारी उपेक्षा मित्रासमोर उघड झाल्याने होणारा त्रास, वैफल्य अशा अनेक भावना व्यक्त करणाऱ्या गीतात प्रत्येक चरणानुसार दीदींचा स्वर चढतव्याकूळ होतो. एका हताश, हळूवार व्यथेच्या अभिव्यक्तीपर्यंत उत्कट होणारा लतादीदींचा आवाज गाणे संपल्यावरही वातावरणात भरून राहतो. बलराज सहानी, लीला नायडू, अभिभट्टाचार्य यांच्या अप्रतिम अभिनयाने दोन्हीगाणी आणखीन परिणामकारक होतात. हे सांगणे न लगे. चित्रपट संपल्यावर दोन दिवस मनात रेंगाळत राहतात ते लतादीदींच्या स्वरांनी भिजलेले जिवंत झालेले शब्द - ‘हाय रे वो दिन क्यू ना आए.’-डॉ. स्वाती कर्वे
वृक्षवल्ली आम्हा सोयरी
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अमृतमय मधुर कंठातून गायलेल्या शेकडो गाण्यांतून मनाला भुरळ घालणारे एक गाणे निवडणे म्हणजे महापरीक्षाच. पण त्यातही आज सर्वत्र पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना मनातकायमस्वरूपी घर करून राहिलेले पुढील भक्तिगीत विशेषत्वाने नमूद करावेसे वाटले-‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरेपक्षी ही सुस्वरे आळविती।। धृ।।’हे गाणे म्हणजे तीन महान संतांचा त्रिवेणी संगम होय. भौतिक व परमार्थ यातील द्वंद्वयुद्धात सतत घराचा उंबरठा ओलांडून निसर्गालाच देव मानणारे संत तुकाराम महाराज यांची रचना, संगीतकार श्रीनिवास खळे यांचेउच्चकोटीचे संगीत व गाण्याशी एकरूप होऊन स्वतःला व ऐकणाऱ्याला देहभान विसरायला लावणारा गानकोकीळा लतादीदींचा भैरवी रागातील मधुर कंठस्वर, याची मैफिल कानावर पडताच स्वर्गीय आनंद होतो. हे गाणेम्हणजे अहंशून्य निसर्गाला तितक्याच अहंशून्य भावनेने घातलेली सूरमय साद. झाडेझुडपे, भरारी मारणारे विविध पक्षी, वन्यप्राणी आपले जणू नातेवाईकच आहेत हा आध्यात्मिक विचार संत तुकारामांनी या अभंगातून आपल्यामनावर बिंबवला व लतादीदींनी आपल्या दैवी सुरात तो कायमचा रुजवला. वन-अरण्य म्हणजे निसर्गाच्या स्वाभाविकतेचे सौंदर्य दर्शन.‘तेणे सुखे रुचे एकांताचा वास’ या ओळीत तुकाराम महाराजांनी ‘करा जिव्हाळा निसर्गाशी, देईल तो सुखाच्या राशी’ हा मानवकल्याणाचा दिलेला संदेश आपल्या लयबद्ध सुरांनी लतादीदींनी सर्वांपर्यंत पोहोचविला व हे गाणे अजरामर केले.- सूर्यकांत भोसले