अ‍ॅपशहर

भारताला बॅडमिंटनचे पहिले सुवर्ण टोकियोत मिळेल

आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला बॅडमिंटनमधील पहिलेवहिले सुवर्णपदक मिळेल असा दृढ आत्मविश्वास भारताचे बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केला आहे.

PTI 22 Jan 2019, 10:29 am
म.टा. क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gopichand


आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला बॅडमिंटनमधील पहिलेवहिले सुवर्णपदक मिळेल असा दृढ आत्मविश्वास भारताचे बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या १० वर्षांत बॅडमिंटनचा चेहरामोहरा पुरता बदलून गेला आहे. प्रत्येक वर्ष हे त्याआधीच्या वर्षापेक्षा उत्तम असते. २००८मध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणे हे कौतुकास्पद मानले गेले होते. २०१२मध्ये सायनाने बॅडमिंटनमधील पहिले ब्राँझ भारताला जिंकून दिले. २०१६मध्ये आपण पहिले रौप्यपदक (पी.व्ही. सिंधू) पटकाविले. मला आशा आहे की, २०२०च्या ऑलिम्पिकमध्ये आपण सुवर्णपदकच जिंकू.

आयडीबीआय फेडरल क्वेस्ट फॉर एक्सलन्स या उपक्रमांतर्गत सात विजेत्यांना गोपीचंद यांच्या हस्ते गौरविण्यात आले. हे खेळाडू हैदराबाद येथील अकादमीत प्रशिक्षण घेणार आहेत. या मुलांमध्ये अभिनव गर्ग (बेंगळुरू), नैशा कौर-भटोये (मुंबई), आर. स्फूर्ती (हैदराबाद), साक्षी प्रकाश (दुबई), शनय पटेल (अहमदाबाद), शौर्य किरण (हैदराबाद) व वंश देव (नवी दिल्ली) यांचा समावेश आहे. ही मुले ९ ते १२ वयोगटातील आहेत.

गोपीचंद म्हणाले की, याआधी नंदू नाटेकर, सुरेश गोयल, प्रकाश पदुकोण हे पुरुष खेळाडू बॅडमिंटनची ओळख होते. पण सायनाने हे चित्र बदलले. सिंधूनेही २०१६मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य जिंकले पण त्यानंतर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे पदक, इतर पदकेही तिच्या नावावर आहेत. तरीही अजून तिला दोन ऑलिम्पिक खेळता येतील असा विश्वास वाटतो हे सुखावणारे नाही का ?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज