पुलेला गोपीचंदचे उद्गार
मुंबईः
'खेळात भाग घेण्यासाठी फक्त पदकाचेच लक्ष्य समोर असावे लागत नाही. पदके सर्वस्व नाहीत. खेळात येण्याच्या अनेक करणांपैकी पदके हे एखादे कारण असू शकेल. तेव्हा आधी खेळणे खूप महत्त्वाचे आहे', भारतीय बॅडमिंटन संघाचे प्रमुख प्रशिक्षक अन् माजी ऑल इंग्लंड विजेते बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद सांगत असतात. या बॅडमिंटन गुरूच्या मार्गदर्शनातूनच सायना नेहवाल, सिंधू, कश्यप, श्रीकांत, प्रणॉय असे सरस खेळाडू घडले आहेत. सायना, सिंधू तर जागतिक आणि ऑलिम्पिकपदक विजेत्या आहेत. जीवनातील खेळाचे महत्त्व नमूद करताना गोपी यांनी हे विचार मांडले. निमित्त असते ते 'मुंबई गेम्स'च्या घोषणेचे.
गोपी यांच्या बालपणी मुलांचा वेळ अभ्यासासह मैदानातही जात असे. मात्र आता शिक्षणातील चढाओढीमध्ये मुले मैदानात जाणेच विसरली आहेत. 'आपण मुलांना बाराखडी शिकवतो, आकडे शिकवतो; पण फिटनेस, खेळाच्या महत्त्वाकडे कुणाचेच लक्ष जात नाही. चालणे, धावणे, उड्या, चेंडू फेकणे, झेल टिपणे हे खेळही अभ्यासाप्रमाणेच महत्त्वाचे आहे', प्रशिक्षक गोपीचंद आत्मियतेने सांगत असतात. 'धावण्याच्या शर्यतींमध्ये गावाकडे वाढलेली मुलेच सरस ठरतात, असे आपण सर्रास म्हणतो. मात्र शहरात राहणारे, आपणही शंभर मीटरच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतोच... तसेच खेळात भाग घेताना आपण इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःशी स्पर्धा करत सर्वोत्तम कामगिरीचा प्रयत्न केला पाहिजे', असे गोपीचंद म्हणाले.
मुंबईः
'खेळात भाग घेण्यासाठी फक्त पदकाचेच लक्ष्य समोर असावे लागत नाही. पदके सर्वस्व नाहीत. खेळात येण्याच्या अनेक करणांपैकी पदके हे एखादे कारण असू शकेल. तेव्हा आधी खेळणे खूप महत्त्वाचे आहे', भारतीय बॅडमिंटन संघाचे प्रमुख प्रशिक्षक अन् माजी ऑल इंग्लंड विजेते बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद सांगत असतात. या बॅडमिंटन गुरूच्या मार्गदर्शनातूनच सायना नेहवाल, सिंधू, कश्यप, श्रीकांत, प्रणॉय असे सरस खेळाडू घडले आहेत. सायना, सिंधू तर जागतिक आणि ऑलिम्पिकपदक विजेत्या आहेत. जीवनातील खेळाचे महत्त्व नमूद करताना गोपी यांनी हे विचार मांडले. निमित्त असते ते 'मुंबई गेम्स'च्या घोषणेचे.
गोपी यांच्या बालपणी मुलांचा वेळ अभ्यासासह मैदानातही जात असे. मात्र आता शिक्षणातील चढाओढीमध्ये मुले मैदानात जाणेच विसरली आहेत. 'आपण मुलांना बाराखडी शिकवतो, आकडे शिकवतो; पण फिटनेस, खेळाच्या महत्त्वाकडे कुणाचेच लक्ष जात नाही. चालणे, धावणे, उड्या, चेंडू फेकणे, झेल टिपणे हे खेळही अभ्यासाप्रमाणेच महत्त्वाचे आहे', प्रशिक्षक गोपीचंद आत्मियतेने सांगत असतात. 'धावण्याच्या शर्यतींमध्ये गावाकडे वाढलेली मुलेच सरस ठरतात, असे आपण सर्रास म्हणतो. मात्र शहरात राहणारे, आपणही शंभर मीटरच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतोच... तसेच खेळात भाग घेताना आपण इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःशी स्पर्धा करत सर्वोत्तम कामगिरीचा प्रयत्न केला पाहिजे', असे गोपीचंद म्हणाले.