अ‍ॅपशहर

सिंधूला रौप्य

जकार्ताः भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये महिला एकेरीत अखेर रौप्यपदकावर समाधान मानावे लागले...

Maharashtra Times 29 Aug 2018, 4:00 am

जकार्ताः भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये महिला एकेरीत अखेर रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मंगळवारी रंगलेल्या अंतिम सामन्यात चायनीज तैपेईच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या ताय त्झू-यिंगने सिंधूवर २१-१३, २१-१६ अशी मात केली. एशियाड बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक जिंकणारी सिंधू भारताची पहिलीच खेळाडू ठरली. हा सामना अवघ्या ३४ मिनिटांमध्ये संपला.

'ताइला हरवू शकते'

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ताय झ्यू-यिंगकडून सलग सहाव्यांदा पराभव पत्करावा लागला असला, तरी आपण ताइला हरवू शकतो, असा विश्वास भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने व्यक्त केला आहे. ताय आणि माझ्या खेळामध्ये खूप तफावत नाही. मी तिला हरवू शकते. मला तिच्याविरुद्ध खेळताना मानसिक दडपण येत नाही. माझ्या काही चुका सुधारल्यास आमच्यातील सामन्यांचा निकाल वेगळा लागेल, असे सिंधू म्हणाली. आशियाई क्रीडा स्पर्धेतील अंतिम सामन्यात तायला सोपे गुण मिळवण्याची संधी दिली, अशी कबुलीही सिंधूने सामन्यानंतर दिली. सिंधूने तायला अखेरचे २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पराभूत केले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज