अ‍ॅपशहर

...तर दुसरी सिंधू कशी घडेल?

भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटनपटूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांदरम्यान राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपिचंद यांची पोकळी जाणवते आहे. त्यांचे मार्गदर्शन असते, तर स्पर्धेत पदकापर्यंत जाता आले असते, चुटपूटही भारताच्या अनेक बॅटमिंटनपटूंना सध्या लागून राहते आहे. मात्र गोपीचंद यांचे याबाबतचे मत थोडे वेगळे. जे नक्कीच पटण्याजोगे आहे. '

महाराष्ट्र टाइम्स 18 Jul 2019, 5:00 am
नवी दिल्लीः भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटनपटूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांदरम्यान राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपिचंद यांची पोकळी जाणवते आहे. त्यांचे मार्गदर्शन असते, तर स्पर्धेत पदकापर्यंत जाता आले असते, चुटपूटही भारताच्या अनेक बॅटमिंटनपटूंना सध्या लागून राहते आहे. मात्र गोपीचंद यांचे याबाबतचे मत थोडे वेगळे. जे नक्कीच पटण्याजोगे आहे. 'भारताच्या भावी पिढीला घडवण्यासाठी भारतात आपल्या अकादमीत अधिक काळ असणे महत्त्वाचे आहे. तसे झाले तरच भारताला सिंधूसारख्या आणखी बॅडमिंटनपटू मिळू शकतील. त्यासाठी सध्याच्या सीनियर खेळाडूंसह परदेशातील स्पर्धांना जायला नाही मिळाले तरी चालेल, अशी गोपी यांची धारणा आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम so how will the other be
...तर दुसरी सिंधू कशी घडेल?


गोपी यांनी याच कारणास्तव यंदाच्या मोसमात सिंधूसह आंतरराष्ट्रीय स्पर्धांना जाणे टाळले आहे. पुढील वर्षीही गोपी हाच शिरस्ता कायम ठेवणार आहेत. ते म्हणातातः 'मी आता खेळाडूंसह आंतरराष्ट्रीय स्पर्धांना जात राहिलो तर पुढील फळीकडे कोण लक्ष देईल? आपल्याला पुढील सिंधू कशी मिळेल? त्यासाठी मला आणखी प्रशिक्षकांची आवश्यकता आहे. त्यांच्या मदतीची मला नितांत गरज आहे'.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज