मकरंद वायंगणकर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन्ही कसोटीत भारतीय संघाला यजमानांनी सर्वच बाबतीत अगदी निष्प्रभ केले. भारतीय संघाच्या या वाईट कामगिरीचे कारण नेमके काय? तर ते आहे, या महत्त्वाच्या दौऱ्यासाठी पुरेशा तयारीचा अभाव. जगातील अव्वल क्रमांकाचा संघ अशा महत्त्वाच्या दौऱ्यावर कोणतीही तयारी न करता कसा काय जाऊ शकतो? ज्या दक्षिण आफ्रिकेत वेगवान आणि चेंडूला उसळी देणाऱ्या खेळपट्ट्या तुमचे स्वागत करीत असतात, तिथे तुम्ही कोणतीही तयारी न करता उतरावे? हे आताचेच उदाहरण नाही तर भारताच्या कोणत्याही संघाने दक्षिण आफ्रिकेसाठी कधीही तयारी केल्याचे आठवत नाही. त्यामुळेच आपण तिथे अद्याप एकही मालिका जिंकू शकलेलो नाही.
हे सगळे ठाऊक असताना भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धची संपूर्ण मालिका रद्द करण्याची विनंती भारतीय क्रिकेट बोर्डाला करायला हवी होती. निदान श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यांची संख्या तरी कमी करण्यास सांगायला हवे होते. जेणेकरून दक्षिण आफ्रिकेच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी भारतीय संघाला तीन आठवडे आधी तिथे जाता आले असते. पण भारतीय क्रिकेट बोर्डाने श्रीलंकेच्या दौऱ्याला महत्त्व दिले आणि दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी भारतीय संघाच्या हाती तयारीसाठी राहिला तो अवघा एक आठवडा. दक्षिण आफ्रिकेत मोठमोठी स्टेडियम्स नाहीत. त्यामुळे स्वाभाविकपणे वारा अडविला जात नाही. हाच मुद्दा फलंदाजी आणि गोलंदाजी करताना परिणामकारक ठरतो. त्यासाठीच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन आठवडे आधीच जाणे श्रेयस्कर ठरले असते.
हा सर्वात मोठा घोळ आपण घालून ठेवला. तरीही आपल्या वेगवान गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांच्या वेगाशी, उसळीशी झटपट जुळवून घेण्यात यश मिळविले. भारतीय खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करणाऱ्यांना अचानक दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर अचूक दिशा आणि टप्पा मिळवणे कठीणच जाते. पण आपल्या गोलंदाजांचे त्याबाबत कौतुक करावे लागेल. दोन्ही टोकांकडून आपल्या या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव ठेवण्यात यश मिळविले. सातत्याने ऑफस्टम्प किंवा चौथ्या यष्टीच्या रेषेत चेंडू टाकून फलंदाजांना चूक करण्यास त्यांनी भाग पाडले, पण स्लिपमधील आपल्या क्षेत्ररक्षकांनी या मोक्याच्या क्षणी आत्मघातकी चुका केल्या आणि प्रतिस्पर्ध्यांना भागीदारी करण्याची नामी संधी उपलब्ध करून दिली.
आपले क्षेत्ररक्षण हे अत्यंत गचाळ झाले असे म्हटले तर वावगे ठरू नये. क्रिकेटमध्ये एक वाक्प्रचार आहे, जेव्हा तुम्ही एक धाव वाचवता, तेव्हा ती धाव तुमच्या खात्यात जमा झाल्यासारखीच असते. पहिल्या कसोटीत मात्र आपल्या क्षेत्ररक्षकांनी ३० ते ४० धावा प्रतिस्पर्ध्यांना बहाल केल्या. यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने आलेल्या सर्व संधींचे सोने केले, पण इतरांनी अशा संधी वाया दवडल्या इतकेच नव्हे तर तळाच्या फलंदाजांनाही महत्त्वाच्या क्षणी धावा काढण्याची मोकळीक दिली.
जगभरात पहिल्या सत्राचा खेळ हा कसोटीचे भवितव्य निश्चित करणारा असतो, हे लक्षात घ्यायला हवे. पण आपल्या खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान खेळपट्ट्यांवर शाळकरी मुलांसारखा खेळ करून दाखविला. ही टीका नाही तर आकडेवारीच्या जोरावर दाखविलेले वास्तव आहे. भारतीय संघव्यवस्थापनाला याची जाणीव होती की, आपल्या फलंदाजीचा आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावण्याची गरज आहे. पण त्याकडे दुर्लक्ष झाले.
संघनिवडीत नसलेला ताळमेळ
पाच खास फलंदाज निवडताना आपण योग्य ताळमेळ राखला का हा प्रश्न आहे. यष्टिरक्षक साहा हा फलंदाजी करू शकतो, ऑफस्पिनर अश्विनही फलंदाजी करतो, पण पंड्याचा गोलंदाजी किंवा फलंदाजी करताना स्वतःच्या मनावर ताबा नाही. रहाणेला त्याची परदेशातील कामगिरी पाहता रोहितपेक्षा प्राधान्य द्यायला हवे होते. रोहितकडे परदेशातल्या कसोटी कामगिरीचा फारसा अनुभव नव्हता. दौऱ्यावर गेलेल्या निवड समितीचा भाग म्हणून कर्णधाराने अजिंक्यला निदान सांगायला हवे होते की, त्याचे संघातील स्थान काय असेल ते ? जर खेळाडूचा फॉर्म हा निकष असेल तर रहाणेची केवळ श्रीलंकेविरुद्धची एका मालिकेतील कामगिरीच का विचारात घेण्यात आली ? त्याने तर परदेशात सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. मग रोहितच्या परदेशातील कसोटी क्रिकेटमधील कामगिरीचा विचार करण्यात आला की नाही ? उपकर्णधार अजिंक्यला दोन कसोटीत वगळून नेमका कोणता संदेश बाकी खेळाडूंना दिला गेला? निवड समितीला हा गोंधळ लक्षात आलं नाही ? या सगळ्या प्रकारामुळे रहाणेच्या आत्मविश्वासाला निश्चितच तडा गेला असेल. अंतिम ११ जणांची निवड करताना आपण कर्णधाराची पसंती असलेल्या खेळाडूंच्या यादीत नाही, असे त्याला वाटणे स्वाभाविक आहे. आता तर या मालिकेचा निकाल स्पष्ट झाला आहे आणि अखेरच्या कसोटीत कदाचित रोहितऐवजी रहाणेला संधी मिळू शकेल. पण नुकसान तर आधीच होऊन गेले आहे.
पुजाराची हाराकिरी
आपण दक्षिण आफ्रिकेला घेऊन गेलेल्या ५ फलंदाजांपैकी दोघांवरच आपली पू्र्ण मदार होती. कारण दोन्ही कसोटीत आपले सलामीवीर सपशेल अपयशी ठरले. पुजाराने तर दुसऱ्या कसोटीत दोन्ही डावात स्वतःला धावचीत करत हाराकिरी पत्करली. गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असतानाही सामन्यात आवश्यक असलेले प्रसंगावधान राखण्यात पुजाराला अपयश आले. दोन्ही वेळा धावचीत झालेला पुजारा युसेन बोल्टचे व्हीडिओ तर पाहात नाही ना, अशी शंका माझ्या मनात आल्यावाचून राहिली नाही. त्यामुळे अर्थातच सारे दडपण कोहलीवर होते. साहासारख्या अननुभवी फलंदाजासह धावफलक हलता ठेवण्याची जबाबदारी विराटवर येऊन पडली.
पहिल्या कसोटीत पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ इतका निराश झाला होता की, चौथ्या दिवशी कसोटी संपूनही ज्या खेळपट्टीवर ते खेळले तेथे सराव करण्याचेही त्राण या संघात राहिले नाही. त्यांनी थेट आपल्या कुटुंबियांसह फिरायला जाण्याचा पर्याय निवडला, जो क्रिकेटपासून त्यांचे लक्ष विचलित करण्यास पुरेसा होता. खरे तर, अशा दौऱ्यात खेळाडूंना अखरेच्या १० दिवसांतच आपल्या कुटुंबियांसह राहण्याची परवानगी द्यायला हवी.
त्यानंतर दुसऱ्या कसोटीच्या आधी स्थानिक वर्तमानपत्रात दक्षिण आफ्रिकेच्या माजी खेळाडूंनी न्यूलँडसपेक्षाही वेगवान खेळपट्टी सेंच्युरियनला असेल, असा अंदाज बांधला. प्रत्यक्षात तेथील खेळपट्टी ही भारतीय बनावटीचीच होती. पहिल्या दिवशी चेंडू खाली राहात होता आणि नंतर चेंडूला असमान उसळी मिळत होती. फिरकीपटूंना पुढे वाव मिळाला. पण या खेळपट्टीवर अश्विनच्या साथीला जाडेजाला खेळविण्याची संधी भारताच्या हातून निसटली. ही जोडी प्रतिस्पर्ध्यांसाठी घातक ठरली असती.
यष्टीरक्षकांचा शोध घ्या!
भारतात अस्सल यष्टीरक्षक मिळणे कठीणच. आपल्याकडे तो नाहीच किंबहुना. साहा दुखापतग्रस्त झाल्यानंतर निवड समिती पार्थिव पटेल किंवा दिनेश कार्तिकचा विचार करते. दोघेही तिशीपलीकडे गेलेले. धोनी भारताला खेळण्यापूर्वी या दोघांमध्ये स्पर्धा होती. त्यानंतर १० वर्षे धोनी क्रिकेटच्या सर्व प्रकारात खेळला पण भारताची युवा यष्टीरक्षकांची फळी तोपर्यंत संपुष्टात आली. त्यातच आयपीएलच्या फ्रांचाईझीकडून मागणी होत होती ती फलंदाजी अधिक यष्टीरक्षण करणाऱ्या खेळाडूंची. १७ व्या वर्षी भारतीय संघातून खेळलेला पार्थिवाच्या यष्टीरक्षणाचे कौशल्य हळूहळू लयाला गेले आणि तोदेखील फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यावर भर देऊ लागला. आणखी ४ महिन्यांनी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाईल. पण त्यावेळी भारतीय संघासोबत जाऊ शकेल असा राखीव यष्टीरक्षक आपल्यापाशी नाही. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) निवड समिती आणि माजी यष्टीरक्षक किरण मोरेसह अस्सल यष्टीरक्षकांसाठी एका शिबिराचे आयोजन त्वरित करावे आणि त्यांना तयार करावे. यष्टीरक्षकांचे महत्त्व लक्षात घेऊन एनसीएने हे काम हाती घ्यावेच.
तारतम्य बाळगा
निर्विवादपणे संघाच्या कर्णधाराकडे सर्वाधिकार असतात, पण कोहलीने संघनिवड करताना तारतम्य बाळगावे. रहाणेसारख्या खेळाडूला वगळून कोहलीने संघात असुरक्षिततेची बीजे रोवली आहेत. त्यामुळे संघाच्या आत्मविश्वासावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. कोहलीने संघप्रशिक्षक रवी शास्त्री आणि इतर प्रशिक्षकांसह बसून शांतपणे संघाच्या रचनेविषयी विचार करायला हवा. त्याने लक्षात घ्यायला हवे की, अनुभव ही सहजासहजी मिळणारी गोष्ट नाही. या वाटचालीतील खाचाखोचा त्याने लक्षात घ्यायला हव्यात. क्रिकेटवेड्या भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पराभव चाहत्यांच्या जिव्हारी लागतो. ते एवढे भावनिक होतात की, ते खेळाडूंवर वैयक्तिक टीका करू लागतात. क्रिकेटमधील ही वाटचाल किती खडतर असते, हे या चाहत्यांच्याही लक्षात आलेले नसते, हेही तेवढेच खरे आहे.
शब्दांकन : महेश विचारे
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन्ही कसोटीत भारतीय संघाला यजमानांनी सर्वच बाबतीत अगदी निष्प्रभ केले. भारतीय संघाच्या या वाईट कामगिरीचे कारण नेमके काय? तर ते आहे, या महत्त्वाच्या दौऱ्यासाठी पुरेशा तयारीचा अभाव. जगातील अव्वल क्रमांकाचा संघ अशा महत्त्वाच्या दौऱ्यावर कोणतीही तयारी न करता कसा काय जाऊ शकतो? ज्या दक्षिण आफ्रिकेत वेगवान आणि चेंडूला उसळी देणाऱ्या खेळपट्ट्या तुमचे स्वागत करीत असतात, तिथे तुम्ही कोणतीही तयारी न करता उतरावे? हे आताचेच उदाहरण नाही तर भारताच्या कोणत्याही संघाने दक्षिण आफ्रिकेसाठी कधीही तयारी केल्याचे आठवत नाही. त्यामुळेच आपण तिथे अद्याप एकही मालिका जिंकू शकलेलो नाही.
हे सगळे ठाऊक असताना भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धची संपूर्ण मालिका रद्द करण्याची विनंती भारतीय क्रिकेट बोर्डाला करायला हवी होती. निदान श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यांची संख्या तरी कमी करण्यास सांगायला हवे होते. जेणेकरून दक्षिण आफ्रिकेच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी भारतीय संघाला तीन आठवडे आधी तिथे जाता आले असते. पण भारतीय क्रिकेट बोर्डाने श्रीलंकेच्या दौऱ्याला महत्त्व दिले आणि दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी भारतीय संघाच्या हाती तयारीसाठी राहिला तो अवघा एक आठवडा. दक्षिण आफ्रिकेत मोठमोठी स्टेडियम्स नाहीत. त्यामुळे स्वाभाविकपणे वारा अडविला जात नाही. हाच मुद्दा फलंदाजी आणि गोलंदाजी करताना परिणामकारक ठरतो. त्यासाठीच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन आठवडे आधीच जाणे श्रेयस्कर ठरले असते.
हा सर्वात मोठा घोळ आपण घालून ठेवला. तरीही आपल्या वेगवान गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांच्या वेगाशी, उसळीशी झटपट जुळवून घेण्यात यश मिळविले. भारतीय खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करणाऱ्यांना अचानक दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर अचूक दिशा आणि टप्पा मिळवणे कठीणच जाते. पण आपल्या गोलंदाजांचे त्याबाबत कौतुक करावे लागेल. दोन्ही टोकांकडून आपल्या या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव ठेवण्यात यश मिळविले. सातत्याने ऑफस्टम्प किंवा चौथ्या यष्टीच्या रेषेत चेंडू टाकून फलंदाजांना चूक करण्यास त्यांनी भाग पाडले, पण स्लिपमधील आपल्या क्षेत्ररक्षकांनी या मोक्याच्या क्षणी आत्मघातकी चुका केल्या आणि प्रतिस्पर्ध्यांना भागीदारी करण्याची नामी संधी उपलब्ध करून दिली.
आपले क्षेत्ररक्षण हे अत्यंत गचाळ झाले असे म्हटले तर वावगे ठरू नये. क्रिकेटमध्ये एक वाक्प्रचार आहे, जेव्हा तुम्ही एक धाव वाचवता, तेव्हा ती धाव तुमच्या खात्यात जमा झाल्यासारखीच असते. पहिल्या कसोटीत मात्र आपल्या क्षेत्ररक्षकांनी ३० ते ४० धावा प्रतिस्पर्ध्यांना बहाल केल्या. यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने आलेल्या सर्व संधींचे सोने केले, पण इतरांनी अशा संधी वाया दवडल्या इतकेच नव्हे तर तळाच्या फलंदाजांनाही महत्त्वाच्या क्षणी धावा काढण्याची मोकळीक दिली.
जगभरात पहिल्या सत्राचा खेळ हा कसोटीचे भवितव्य निश्चित करणारा असतो, हे लक्षात घ्यायला हवे. पण आपल्या खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान खेळपट्ट्यांवर शाळकरी मुलांसारखा खेळ करून दाखविला. ही टीका नाही तर आकडेवारीच्या जोरावर दाखविलेले वास्तव आहे. भारतीय संघव्यवस्थापनाला याची जाणीव होती की, आपल्या फलंदाजीचा आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावण्याची गरज आहे. पण त्याकडे दुर्लक्ष झाले.
संघनिवडीत नसलेला ताळमेळ
पाच खास फलंदाज निवडताना आपण योग्य ताळमेळ राखला का हा प्रश्न आहे. यष्टिरक्षक साहा हा फलंदाजी करू शकतो, ऑफस्पिनर अश्विनही फलंदाजी करतो, पण पंड्याचा गोलंदाजी किंवा फलंदाजी करताना स्वतःच्या मनावर ताबा नाही. रहाणेला त्याची परदेशातील कामगिरी पाहता रोहितपेक्षा प्राधान्य द्यायला हवे होते. रोहितकडे परदेशातल्या कसोटी कामगिरीचा फारसा अनुभव नव्हता. दौऱ्यावर गेलेल्या निवड समितीचा भाग म्हणून कर्णधाराने अजिंक्यला निदान सांगायला हवे होते की, त्याचे संघातील स्थान काय असेल ते ? जर खेळाडूचा फॉर्म हा निकष असेल तर रहाणेची केवळ श्रीलंकेविरुद्धची एका मालिकेतील कामगिरीच का विचारात घेण्यात आली ? त्याने तर परदेशात सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. मग रोहितच्या परदेशातील कसोटी क्रिकेटमधील कामगिरीचा विचार करण्यात आला की नाही ? उपकर्णधार अजिंक्यला दोन कसोटीत वगळून नेमका कोणता संदेश बाकी खेळाडूंना दिला गेला? निवड समितीला हा गोंधळ लक्षात आलं नाही ? या सगळ्या प्रकारामुळे रहाणेच्या आत्मविश्वासाला निश्चितच तडा गेला असेल. अंतिम ११ जणांची निवड करताना आपण कर्णधाराची पसंती असलेल्या खेळाडूंच्या यादीत नाही, असे त्याला वाटणे स्वाभाविक आहे. आता तर या मालिकेचा निकाल स्पष्ट झाला आहे आणि अखेरच्या कसोटीत कदाचित रोहितऐवजी रहाणेला संधी मिळू शकेल. पण नुकसान तर आधीच होऊन गेले आहे.
पुजाराची हाराकिरी
आपण दक्षिण आफ्रिकेला घेऊन गेलेल्या ५ फलंदाजांपैकी दोघांवरच आपली पू्र्ण मदार होती. कारण दोन्ही कसोटीत आपले सलामीवीर सपशेल अपयशी ठरले. पुजाराने तर दुसऱ्या कसोटीत दोन्ही डावात स्वतःला धावचीत करत हाराकिरी पत्करली. गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असतानाही सामन्यात आवश्यक असलेले प्रसंगावधान राखण्यात पुजाराला अपयश आले. दोन्ही वेळा धावचीत झालेला पुजारा युसेन बोल्टचे व्हीडिओ तर पाहात नाही ना, अशी शंका माझ्या मनात आल्यावाचून राहिली नाही. त्यामुळे अर्थातच सारे दडपण कोहलीवर होते. साहासारख्या अननुभवी फलंदाजासह धावफलक हलता ठेवण्याची जबाबदारी विराटवर येऊन पडली.
पहिल्या कसोटीत पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ इतका निराश झाला होता की, चौथ्या दिवशी कसोटी संपूनही ज्या खेळपट्टीवर ते खेळले तेथे सराव करण्याचेही त्राण या संघात राहिले नाही. त्यांनी थेट आपल्या कुटुंबियांसह फिरायला जाण्याचा पर्याय निवडला, जो क्रिकेटपासून त्यांचे लक्ष विचलित करण्यास पुरेसा होता. खरे तर, अशा दौऱ्यात खेळाडूंना अखरेच्या १० दिवसांतच आपल्या कुटुंबियांसह राहण्याची परवानगी द्यायला हवी.
त्यानंतर दुसऱ्या कसोटीच्या आधी स्थानिक वर्तमानपत्रात दक्षिण आफ्रिकेच्या माजी खेळाडूंनी न्यूलँडसपेक्षाही वेगवान खेळपट्टी सेंच्युरियनला असेल, असा अंदाज बांधला. प्रत्यक्षात तेथील खेळपट्टी ही भारतीय बनावटीचीच होती. पहिल्या दिवशी चेंडू खाली राहात होता आणि नंतर चेंडूला असमान उसळी मिळत होती. फिरकीपटूंना पुढे वाव मिळाला. पण या खेळपट्टीवर अश्विनच्या साथीला जाडेजाला खेळविण्याची संधी भारताच्या हातून निसटली. ही जोडी प्रतिस्पर्ध्यांसाठी घातक ठरली असती.
यष्टीरक्षकांचा शोध घ्या!
भारतात अस्सल यष्टीरक्षक मिळणे कठीणच. आपल्याकडे तो नाहीच किंबहुना. साहा दुखापतग्रस्त झाल्यानंतर निवड समिती पार्थिव पटेल किंवा दिनेश कार्तिकचा विचार करते. दोघेही तिशीपलीकडे गेलेले. धोनी भारताला खेळण्यापूर्वी या दोघांमध्ये स्पर्धा होती. त्यानंतर १० वर्षे धोनी क्रिकेटच्या सर्व प्रकारात खेळला पण भारताची युवा यष्टीरक्षकांची फळी तोपर्यंत संपुष्टात आली. त्यातच आयपीएलच्या फ्रांचाईझीकडून मागणी होत होती ती फलंदाजी अधिक यष्टीरक्षण करणाऱ्या खेळाडूंची. १७ व्या वर्षी भारतीय संघातून खेळलेला पार्थिवाच्या यष्टीरक्षणाचे कौशल्य हळूहळू लयाला गेले आणि तोदेखील फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यावर भर देऊ लागला. आणखी ४ महिन्यांनी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाईल. पण त्यावेळी भारतीय संघासोबत जाऊ शकेल असा राखीव यष्टीरक्षक आपल्यापाशी नाही. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) निवड समिती आणि माजी यष्टीरक्षक किरण मोरेसह अस्सल यष्टीरक्षकांसाठी एका शिबिराचे आयोजन त्वरित करावे आणि त्यांना तयार करावे. यष्टीरक्षकांचे महत्त्व लक्षात घेऊन एनसीएने हे काम हाती घ्यावेच.
तारतम्य बाळगा
निर्विवादपणे संघाच्या कर्णधाराकडे सर्वाधिकार असतात, पण कोहलीने संघनिवड करताना तारतम्य बाळगावे. रहाणेसारख्या खेळाडूला वगळून कोहलीने संघात असुरक्षिततेची बीजे रोवली आहेत. त्यामुळे संघाच्या आत्मविश्वासावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. कोहलीने संघप्रशिक्षक रवी शास्त्री आणि इतर प्रशिक्षकांसह बसून शांतपणे संघाच्या रचनेविषयी विचार करायला हवा. त्याने लक्षात घ्यायला हवे की, अनुभव ही सहजासहजी मिळणारी गोष्ट नाही. या वाटचालीतील खाचाखोचा त्याने लक्षात घ्यायला हव्यात. क्रिकेटवेड्या भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पराभव चाहत्यांच्या जिव्हारी लागतो. ते एवढे भावनिक होतात की, ते खेळाडूंवर वैयक्तिक टीका करू लागतात. क्रिकेटमधील ही वाटचाल किती खडतर असते, हे या चाहत्यांच्याही लक्षात आलेले नसते, हेही तेवढेच खरे आहे.
शब्दांकन : महेश विचारे