अ‍ॅपशहर

रोमहर्षक लढतीत भारत विजयी

भारताने कटक येथे झालेल्या रोमहर्षक लढतीत इंग्लंडवर १५ धावांनी विजय मिळवून तीन सामन्यांची वन-डे मालिका २-० अशा फरकाने जिंकली आहे. भारताने इंग्लंडला ३८१ धावांचे पहाडाएवढे आव्हान दिले होते. मात्र इंग्लंडच्या फलंदाजांनी तोडीस तोड फलंदाजी करून भारताला शेवटपर्यंत झुंजवले.

Maharashtra Times 19 Jan 2017, 10:10 pm
मटा ऑनलाइन वृत्त । कटक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2nd odi india beat england in cuttack thriller to clinch series
रोमहर्षक लढतीत भारत विजयी


भारताने कटक येथे झालेल्या रोमहर्षक लढतीत इंग्लंडवर १५ धावांनी विजय मिळवून तीन सामन्यांची वन-डे मालिका २-० अशा फरकाने जिंकली आहे. भारताने इंग्लंडला ३८१ धावांचे पहाडाएवढे आव्हान दिले होते. मात्र इंग्लंडच्या फलंदाजांनी तोडीस तोड फलंदाजी करून भारताला शेवटपर्यंत झुंजवले. ४९ व्या षटकात इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन बाद झाल्यानंतर खऱ्या अर्थाने भारतीय संघाने आणि हा सामना पाहणाऱ्या करोडो चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

युवराज सिंगचं दीडशतक आणि धोनीचं शतक याच्या जोरावर भारताने ३८१ धावा कुटल्या होत्या. हे लक्ष्य पाहता भारतासाठी विजयाचा मार्ग सोपा असल्याचे वाटत होते. मात्र इंग्लडने कडवी झुंज दिली. ठरविक अंतराने इंग्लंडचे फलंदाज बाद झाले तरी धावांची सरासरी मात्र त्यांनी घसरू दिली नाही. जेसन रॉय आणि जो रूट अर्धशतकी खेळी करून बाद झाल्यानंतर कर्णधार मॉर्गनने डावाचं स्टेअरिंग हाती घेतलं आणि मोइन अलीच्या जोडीने भारतीय गोलंदाजीची पिसं काढली.

भारत वि. इंग्लंड: दुसऱ्या वनडेचं संपूर्ण स्कोअरकार्ड

मॉर्गनच्या तुफान फटकेबाजीमुळे भारताला हा सामना गमवावा लागतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र ४९व्या षटकात स्ट्राइक आपल्याकडे राखण्यासाठी धडपडणाऱ्या मॉर्गनने घात करून घेतला. प्लंकेटने टोलवलेला चेंडू बुमराहने अडवला आणि मॉर्गनला रनआऊट करून पॅव्हेलियनची वाट दाखवली. मॉर्गन बाद झाल्यानंतर इंग्लंडला ३६६ धावांपर्यंतच मजल मारता आली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज