वृत्तसंस्था, बेंगळुरू
पहिल्या कसोटीतील विजय आणि दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताला १८९ धावांत उखडल्यानंतर सलग दुसऱ्या विजयाची स्वप्ने पाहणाऱ्या ऑस्ट्रेलियाला चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताकडून पराभवाचा जबरदस्त धक्का सहन करावा लागला. लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांची अर्धशतके यामुळे घेतलेली महत्त्वपूर्ण आघाडी आणि नंतर आर. अश्विनने घेतलेले ६ बळी यामुळे भारताने पाहुण्यांना अवघ्या ११२ धावांत गारद करून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. विजयासाठी ठेवलेल्या १८८ धावांच्या आव्हानाखाली ऑस्ट्रेलियन संघ दबला गेला.
एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या या लढतीतील चौथा दिवस कमालीचा नाट्यमय ठरला. चेंडू कधी खाली राहत होता, तर कधी उसळी घेत होता. मंगळवारी भारताच्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने ४ बाद २१३ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. दिवसाच्या चौथ्याच षटकात पुजाराविरुद्ध नॅथन लायनने पायचीतचे अपील केले. मैदानावरील पंचांनी त्याला बाद ठरविले. पुजाराने रिव्ह्यू घेतला आणि त्याला त्याचा फायदा झाला. पंचांना निर्णय मागे घ्यावा लागला. रहाणेने स्टार्कला चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर रहाणे बाद झाला. रहाणेने ५२ धावा केल्या. त्याने पुजारासह ११८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. पुढच्याच चेंडूवर स्टार्कने करुण नायरचा त्रिफळा उडविला. स्टार्कला हॅटट्रिकची संधी होती. वृद्धिमान साहाविरुद्ध पायचीतचे अपीलही झाले. पण साहा सुदैवी ठरला.
पुढच्याच षटकात जोश हॅझलवूडने पुजाराला बाद केले. पुजाराचे शतक आठ धावांनी हुकले. याच षटकात हॅझलवूडने अश्विनला माघारी पाठवले. अश्विनचा ज्या पद्धतीने त्रिफळा उडविला, ते पाहता ऑस्ट्रेलियासाठी धावांचा पाठलाग करणे सोपे नसेल हे स्पष्ट झाले होते. साहा-इशांत शर्माने १६ धावांची भर घातली. स्टीफन ओकीफने इशांत शर्माला बाद करून भारताला २७४ धावांपर्यंत रोखले.
लक्ष्याचा पाठलाग करताना मॅट रेनशॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी आक्रमण हाच बचाव हा पवित्रा घेतला. या जोडीने पहिल्या षटकात चार षटकांत २२ धावा फलकावर लावल्या. इशांतने ही जोडी फोडली. मॅट रेनशॉ पाच धावांवर माघारी परतला. नवव्या षटकापर्यंत वॉर्नरने स्मिथच्या साथीने ४२ धावा फलकावर लावल्या होत्या. दहाव्या षटकात वॉर्नरला अश्विनने पायचीत टिपले. वॉर्नरने रिव्ह्यू घेतला; पण त्याचा फायदा झाला नाही. यानंतर उमेश यादवने शॉन मार्शला पायचीत टिपले. वॉर्नरने आधीच एक रिव्ह्यू घेतल्याने मार्शने रिव्ह्यूचा वापर केला नाही; पण त्याने रिव्ह्यू घेतला असता तर निश्चित फायदा झाला असता. कारण चेंडू ऑफ स्टम्पच्या बराच बाहेर जात होता. यानंतर यादवने स्मिथलाही पायचीत टिपले. रिव्ह्यू घ्यायचा की नाही, यासाठी स्मिथने हँड्सकोम्बशीही चर्चा केली. नंतर त्याने ड्रेसिंगरूमकडे बघून रिव्ह्यूचा इशारा केला. ही बाब कोहलीच्या नजरेतून सुटली नाही. तो स्मिथशी बोलणार, एवढ्यात पंचांनी हस्तक्षेप केला.
अश्विनने आपल्या सलगच्या षटकात मिचेल मार्श, मॅथ्यू वेड, मिचेल स्टार्क यांना बाद केले. यात साहाने वेडचा अप्रतिम झेल टिपला. ऑस्ट्रेलियाने अखेरचे सहा फलंदाज अवघ्या ११ धावांत गमावले. चौथ्या दिवशी १६ फलंदाज बाद झाले. पहिल्या डावात ९० आणि दुसऱ्या डावात ५१ धावा करणारा लोकेश राहुल सामनावीर ठरला. मालिकेतील तिसरी कसोटी आता १६ मार्चपासून रांचीत खेळली जाणार आहे.
स्कोअरबोर्ड : भारत १८९ आणि सर्वबाद २७४ (चेतेश्वर पुजारा ९२, अजिंक्य रहाणे ५२, वृद्धिमान साहा नाबाद २०, स्टार्क ७४-२, हॅझलवूड ६७-६, ओकीफ ३६-२) विजयी वि. ऑस्ट्रेलिया २७६ आणि ११२ (वॉर्नर १७, स्मिथ २८, हँड्सकोम्ब २४, शर्मा २८-१, अश्विन ४१-६, यादव ३०-२, जाडेजा ३-१). सामनावीर – लोकेश राहुल.
पहिल्या कसोटीतील विजय आणि दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताला १८९ धावांत उखडल्यानंतर सलग दुसऱ्या विजयाची स्वप्ने पाहणाऱ्या ऑस्ट्रेलियाला चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताकडून पराभवाचा जबरदस्त धक्का सहन करावा लागला. लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांची अर्धशतके यामुळे घेतलेली महत्त्वपूर्ण आघाडी आणि नंतर आर. अश्विनने घेतलेले ६ बळी यामुळे भारताने पाहुण्यांना अवघ्या ११२ धावांत गारद करून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. विजयासाठी ठेवलेल्या १८८ धावांच्या आव्हानाखाली ऑस्ट्रेलियन संघ दबला गेला.
एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या या लढतीतील चौथा दिवस कमालीचा नाट्यमय ठरला. चेंडू कधी खाली राहत होता, तर कधी उसळी घेत होता. मंगळवारी भारताच्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने ४ बाद २१३ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. दिवसाच्या चौथ्याच षटकात पुजाराविरुद्ध नॅथन लायनने पायचीतचे अपील केले. मैदानावरील पंचांनी त्याला बाद ठरविले. पुजाराने रिव्ह्यू घेतला आणि त्याला त्याचा फायदा झाला. पंचांना निर्णय मागे घ्यावा लागला. रहाणेने स्टार्कला चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर रहाणे बाद झाला. रहाणेने ५२ धावा केल्या. त्याने पुजारासह ११८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. पुढच्याच चेंडूवर स्टार्कने करुण नायरचा त्रिफळा उडविला. स्टार्कला हॅटट्रिकची संधी होती. वृद्धिमान साहाविरुद्ध पायचीतचे अपीलही झाले. पण साहा सुदैवी ठरला.
पुढच्याच षटकात जोश हॅझलवूडने पुजाराला बाद केले. पुजाराचे शतक आठ धावांनी हुकले. याच षटकात हॅझलवूडने अश्विनला माघारी पाठवले. अश्विनचा ज्या पद्धतीने त्रिफळा उडविला, ते पाहता ऑस्ट्रेलियासाठी धावांचा पाठलाग करणे सोपे नसेल हे स्पष्ट झाले होते. साहा-इशांत शर्माने १६ धावांची भर घातली. स्टीफन ओकीफने इशांत शर्माला बाद करून भारताला २७४ धावांपर्यंत रोखले.
लक्ष्याचा पाठलाग करताना मॅट रेनशॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी आक्रमण हाच बचाव हा पवित्रा घेतला. या जोडीने पहिल्या षटकात चार षटकांत २२ धावा फलकावर लावल्या. इशांतने ही जोडी फोडली. मॅट रेनशॉ पाच धावांवर माघारी परतला. नवव्या षटकापर्यंत वॉर्नरने स्मिथच्या साथीने ४२ धावा फलकावर लावल्या होत्या. दहाव्या षटकात वॉर्नरला अश्विनने पायचीत टिपले. वॉर्नरने रिव्ह्यू घेतला; पण त्याचा फायदा झाला नाही. यानंतर उमेश यादवने शॉन मार्शला पायचीत टिपले. वॉर्नरने आधीच एक रिव्ह्यू घेतल्याने मार्शने रिव्ह्यूचा वापर केला नाही; पण त्याने रिव्ह्यू घेतला असता तर निश्चित फायदा झाला असता. कारण चेंडू ऑफ स्टम्पच्या बराच बाहेर जात होता. यानंतर यादवने स्मिथलाही पायचीत टिपले. रिव्ह्यू घ्यायचा की नाही, यासाठी स्मिथने हँड्सकोम्बशीही चर्चा केली. नंतर त्याने ड्रेसिंगरूमकडे बघून रिव्ह्यूचा इशारा केला. ही बाब कोहलीच्या नजरेतून सुटली नाही. तो स्मिथशी बोलणार, एवढ्यात पंचांनी हस्तक्षेप केला.
अश्विनने आपल्या सलगच्या षटकात मिचेल मार्श, मॅथ्यू वेड, मिचेल स्टार्क यांना बाद केले. यात साहाने वेडचा अप्रतिम झेल टिपला. ऑस्ट्रेलियाने अखेरचे सहा फलंदाज अवघ्या ११ धावांत गमावले. चौथ्या दिवशी १६ फलंदाज बाद झाले. पहिल्या डावात ९० आणि दुसऱ्या डावात ५१ धावा करणारा लोकेश राहुल सामनावीर ठरला. मालिकेतील तिसरी कसोटी आता १६ मार्चपासून रांचीत खेळली जाणार आहे.
स्कोअरबोर्ड : भारत १८९ आणि सर्वबाद २७४ (चेतेश्वर पुजारा ९२, अजिंक्य रहाणे ५२, वृद्धिमान साहा नाबाद २०, स्टार्क ७४-२, हॅझलवूड ६७-६, ओकीफ ३६-२) विजयी वि. ऑस्ट्रेलिया २७६ आणि ११२ (वॉर्नर १७, स्मिथ २८, हँड्सकोम्ब २४, शर्मा २८-१, अश्विन ४१-६, यादव ३०-२, जाडेजा ३-१). सामनावीर – लोकेश राहुल.